Posts

Showing posts with the label गझल

मनाचा थांग लागेना

 मनाची ढवळली खोली मनाचा थांग लागेना   मना समजावले थोडे मनाला भाव पोचेना  उन्हाला आर्जवा कोणी उन्हा रे हो जरा सौम्य   फुलांना बाधते ऊन्ह, फुलाला आग सोसेना  प्रिया मी बावरा होतो तुझे का नाव आल्यावर  प्रियाशी जोडले नाते प्रियाची साथ सोडेना  नभावर रंगली नक्षी रवीचा कुंचला होता   अचानक ढग भरू आले नभाला मेघ शोभेना सख्याने भार्गवी गावी सख्याला सूर गवसावा  सुरांना ताल जोडावा, लयी बेताल चालेना

जरा हासून घेते..

 गालगागा*4 मी व्यथांचे गीत गाते अन जरा हासून घेते काळजाची जखम शिवते अन जरा हासून घेते ज्या उन्हाने जाळले ते घेतले झोळीत माझ्या लपवते दररोज चटके अन जरा हासून घेते भेटलेल्या माणसांचे चेहरे खोटे निघाले मुखवटा बघते जगाचा अन् जरा हासून घेते सारखे आरोप करतो हा जमाना का कळेना वागते निर्ढावलेली अन जरा हासून घेते नाचते, ना लाजते मी बाळगत नाही तमा ही वागते स्वच्छंदी ऐसी अन् जरा हासून घेते या जगाशी भांडते अन जिंकते काही हवे‌ ते चिडवते मी प्राक्तनाला  अन् जरा हासून घेते

रात्र झाल्यावर... !

Image
  उन्हाचा दाह शांतवते, जराशी रात्र झाल्यावर जिवाची काहिली होते, सुखाची रात्र झाल्यावर सुन्या रानात पेटवले, उगवत्या आठवांचे तृण तनाला भार सोसेना, मनाची रात्र झाल्यावर शहारा आजही येतो, तुझे का, नाव आल्यावर क्षणाचा गंधही छळतो उराशी, रात्र झाल्यावर मुक्याने का सहावे रे, तुझ्या कढ वेदनेचे मी बळे मग कंठही फुटतो, मलाही रात्र झाल्यावर जगाची का करू चिंता, असे काळीज जखमी हे घराला आग लावी ते, दिसाची रात्र झाल्यावर रश्मी पदवाड मदनकर
 कोणता तो तीर होता जो मनाच्या पार गेला  कोण होते आपले ज्यांनी विषारी वार केला  आटली ती ओलमाया खुंटला सारा जिव्हाळा  कोरड्याशा भावनांचा का फुका आधार केला  आसवांच्या वाहण्याला बांध टाकावा म्हणाला  घाव झाला खोल तेव्हा का तमाशा फार केला   जिंकणे ना हारणे हेतू सुखाने खेळणे हा  जे मिळाले ओंजळी त्याचा सुखे स्वीकार केला पावसाची वाट होती तो सुगीचा काळ होता  घात केला प्राक्तनाने वादळाने मार केला  झाड होते डवरले, होते नभाशी उंच गेले वादळाने पाडले मी त्या फुलांचा हार केला काल रात्री काय झाले कोण जाणे का पळाले  त्या बिचाऱ्या मांजराला का असा बेजार केला बेरजेला भागले अन् गुणेला जोडले मी शून्य झाल्या भावनांचा मी मनोव्यापार केला रश्मी पदवाड मदनकर
गझलकार सतीश दरडी ह्यांनी दिलेल्या मिसऱ्यावरून गझल लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न -  (तुझे स्वप्न जेंव्हा पडू लागले) कसे दुःख सारे झडू लागले  तुझी आस जेथे मनी दाटली   तिथे भास सारे दडू लागले  उगी अडखळू लागली पावले   कळेना असे का घडू लागले  अश्या सांज समयी सुने वाटते  तुझे दूर जाणे नडू लागले  कुणाला पुसू काय हे दाटले  कशाला असे भडभडू लागले

कोण्या एका संध्याकाळी ..

(वृत्त - लवंगलता वृत्त) कोण्या एका संध्याकाळी  भलते घडले होते  रविकिरणांना अलगद कोणी  हाती धरले होते हाती धरल्या किरणांना मग  अर्पण केले कोणी  नदीकाठच्या कडेकपारी  उजळत गेले होते त्या मातीचा गंध पसरला  गंधित झाला वारा  रानोमाळी हर्ष दाटला  रंग पसरले होते आकाशाशी सलगी केली  परतून पक्षी गेले  सांजसावळ्या नभ वेलीवर  चैत्र कोरले होते अंधाराच्या पटलावर का  थरथर झाला चंदा चांदण ओले कवेत घ्याया  मन व्याकुळले होते मिठीत घेण्या दिठीत यावे  अवघे एकच व्हावे  शुभ्र फुलांचा शेला ओढत  नभ पांघरले होते ©रश्मी पदवाड मदनकर
मनाला मनाचा कुठे थांग आहे जिवाला दिलासा कसा सांग आहे कुणाला असे भान जगण्यास येथे जयाचे तयाच्या पगी टांग आहे नसे भावना आज नाती फुकाची दगड पूजन्या देवळी रांग आहे तुझी प्रीत चढते नशा ही गुलाबी जशी साथ ऐसी जणू भांग आहे कसे सांग विसरू ग आई दिले तू न फेडू शकत मी असे पांग आहे तुझे वागणे मुखवट्याआड वाटे मला वाटते फार नाट्यांग आहे -रश्मी पदवाड मदनकर 
कोणी साताचे सत्तर करतो कोणी घामाचे अत्तर करतो ! तावुन सुलाखून आयुष्याला नशिब कोणी बलवत्तर करतो ! चुकली असेल अनेकदा ती, पण प्रेम तिच्यावरी निरंतर करतो ! हरतो,पडतो अन पडून उठतो जगणे माझे बेहत्तर करतो ! शंभर मैलाचा दगड गाठण्या प्रवास माझा मी खडतर करतो ! व्यथा मनाच्या झरू लागल्या की मी या दिलाचाच पत्थर करतो ! - रश्मी मदनकर #गझल
दिन गुमसुम ढलता रहता है। वो खुद को छलता रहता है ।। चार दीवारी छोड़कर घर की । क्यों दर दर फिरता रहता है ।। आस लगी है मन में लेकिन । मन ही मन कुढता रहता है ।। कुछ भी कहता नहीं किसी से । फिर भी सब कहता रहता है ।। कौन से दुःख से करे किनारा। हर गम दिल सहता रहता है ।। चेहेरेपर रख मुस्कान नुमाया। वो अश्क छुपाता रहता है ।। आंख चुराकर मुझसे मेरा । चेहरा वो पढ़ता रहता है ।। रश्मी मदनकर 09 feb 18
काय कळाले कळले नाही, असेच झाले जगणे नजरी काही भिडले नाही असेच झाले बघणे ! डोहमनाच्या खोलीचा मज थांगच कळला नाही उथळ मोहाच्या खेळामधे असेच झाले फसणे ! गणगोतास देऊन अंतर,जगलो वेड्यावानी चरणस्पर्श मज घडले नाही उगाच झाले तगणे ! चांगल्या  वाईटामधला, भेद आकळला नाही पस्ताव्याचे अश्रू ढाळत उगाच झाले रडणे ! सोबतीची बातच सोडा , कुणीच थांबले नाही प्रताडणेची भोगून पिडा, असेच झाले खचणे ! रश्मी मदनकर. 12 डीसे. 18

एक मतला दोन शेर ..

एक मतला दोन शेर .. काय फासे टाकतो तू काय खेळी मांडतो लागल्या वेडापरी का सांग ना तू भांडतो ! आपुलीती माणसे वैरी तुला का भासती गाडले ते ऊखरूनी काढतो अन् कांडतो ! हर्ष ना वाटे तुला ना आस दाटतसे मनी फसवतो खेळात तू नी रडवुनीचं थांबतो !

ठरवले आहे ..

तुझा उल्लेख मी टाळायचे ठरवले आहे नियम हा एक मी पाळायचे ठरवले आहे । तुला ते शोधतात मी गायल्या गझलांमधुनी तुझे तर नावही गाळायचे ठरवले आहे ।  नवा चल डाव मांडू मागचे विसरून जाऊ आपला व्याप सांभाळायचे ठरवले आहे । नसे कोणी कुणाचे जीव ओवाळून कळले छबीवर आपुल्या भाळायचे ठरवले आहे । नको आधारही अता कुणाचा शब्दानेही तुझ्या पत्रासही जाळायचे ठरवले आहे । कलेवर आठवांचे अंगणी या पुरुन टाकू उगवेल मोगरा माळायचे ठरवले आहे । रश्मी पदवाड मदनकर जुलै 18 (मात्रावृत्तात लिहीण्याचा एक प्रयत्न)
सांगायचे होते मला जे ते तुला कळलेच नाही शब्द होते लाख ओठी गीत पण जुळलेच नाही स्पर्शातून का वेदनेचा दाह हा नडतो कधी कळवायचे होते तुला जे कळले पण वळलेच नाही पेटले विरहात अन मज वाटले सुटले अता शांत झाला ताप पण  पोळले परी जळलेच नाही का असा आलास अन अर्ध्यातूनी गेलास तू पाठ फिरता रे तुझी मी जगी रुळलेच नाही रश्मी मदनकर
जुनेच इशारे जुन्याच खुणा त्या पानावर कोरलेल्या जुनीच कपाटे जुनाच खणा त्या पानांनी भरलेल्या तू अजूनही तिथे तसाच आहे जिव्हाळ्याने जपलेला तो थेंब सुना लांघून गुन्हा नयनांमध्ये लपलेला भिजले शब्द जुनेच गाऱ्हाणे, भावुकतेच्या लाटेने एकटीच निघाले मी वेडी मग आठवणींच्या वाटेने ! रश्मी मदनकर ४/०३/२०११
वृत्त:- मंजुघोषा लगावली:- गालगागा गालगागा गालगागा ! -------------------------------------------------------- गोंदलेल्या वेदनेला नाव नाही घाव झाले खोल का ते ठाव नाही हारते हा खेळ जिंकाया नव्याने मी रडीचा मांडलेला डाव नाही ओढ मज आहे नभाची ध्येयवेडी कुंपणा , माझी तुझ्यावर धाव नाही आटले कोठे उमाळे अंतरीचे प्रेम नाही वा कुठे सद्भाव नाही पाडले फासे जरी आता मनाने प्राक्तनाशी खेळण्याला वाव नाही लाख भांडू दे कुणीही दैवताशी होतसे जे व्हायचे बदलाव नाही # मराठीगझल रश्मी पदवाड मदनकर 28 जुलै 18
चांदण्यांचे वर्ख सारे देहभर मी गोंदते, चंद्र असतो साक्षिला अन मी नभाशी बोलते ! पारिजाताच्या फुलांचे रंग घेते ओढुनी, गंध होतो देह सगळा मी अशी गंधाळते ! उंबऱ्यापाशी घराच्या रात्र का अंधारली, ओंजळी घेउन उजेडा काजव्यांशी डोलते ! छेडता जेव्हा कधी मी जीवघेणा मारवा, मखमली आलाप ते मग गीत जन्मा घालते ! सांजवेडे दुःख मग सुर्यास देते अर्पुनी, ध्येयवेडे स्वप्न मी घेउन उराशी चालते ! * रश्मी पदवाड मदनकर - ४ एप्रिल १८ # मराठीगझल
तुलाच बघते तुझाच दर्पण करते आहे तुझेच देणे तुलाच अर्पण करते आहे तुझाच मी राग छेडता शब्दावाचूनी तुझेच गाणे तुलाच तर्पण करते आहे विलीन केले तुझ्यात मी अन झाली कृष्णा तुझीच मीरा तुला समर्पण करते आहे.. *रश्मी - 15.04.18
दुनियेत मुखवट्यांचा सूकाळ फक्त आहे वठवावयास सोंगे तय्यार तख्त आहे l मेंदूत खलबते नी ओठात जप हरीचा बाजार देवतांचा मांडून भक्त आहे भासे अखंड प्रीती भेटीत आर्ततेच्या नाती मनामनाची आतून रिक्त आहे l आहे जरा दिलासा माणूसपण मरेना किमया खरेपणाची अजूनी सशक्त आहे l कोणी म्हणे मनीचे सांगून मोकळे हो जखमा मनातल्या पण, माझ्या अव्यक्त आहे l रपम / 12.5.18 #मराठीगझल
ऋतू कोवळा येऊन जाता आठवतो तू ऋतू सोहळा आटपतांना आठवतो तू सहा ऋतूंच्या स्मरणांच्याही पडता गाठी ऋतूत एक होऊन ऋतू मग आठवतो तू उधळून देता इंद्रधनुचे रंग नभाशी तांबडं फुटता आकाशी बघ आठवतो तू पाऊस धारा खिडकी मधुनी ओघळताना तुषार उडता गाली अलगद आठवतो तू ... तू आठवता मनात भरते घन व्याकुळ नजरेमध्ये ओल दाटता आठवतो तू   ... रश्मी मदनकर १३.०३.१८ 
#मराठीगझल शब्दासाठी शब्द उमटले, भाव कुठे हे दिसेल का मग मौनामध्ये भाव उमटता, वाचून तुजला कळेल का मग ! हुंदक्यामध्ये दडून बसले, दुःख निनावी आतच विरता गालामधल्या हसूत ओझर, डोकवतांना दिसेल का मग ! स्वप्नांमध्ये स्वप्न पेरूनी, उगवेल काही आर्जव करता पहाट प्रहरी स्वप्नच भंगता, नविन काही रूजेल का मग ! रूप देखणे वरवरचे ते, अंतरातला डोह उपसता शुभ्र मनाचे सुरेख कोंदण, मनात तुझीया भरेल का मग ! हातामध्ये हात घेऊनी, नजरेलाही नजर भिडवूनी प्रित तुझ्यावर जडली वेडे, हळूच तो हे म्हणेल का मग ! (C)रश्मी पदवाड मदनकर