Posts

Showing posts from June, 2016

शिंग फुंकिले रणी

Image
म हिला आंदोलन म्हंटले कि डोळ्यासमोर चितारते ती संघर्ष करणारी, विरोध करीत धरणे देणारी, निदर्शने, उपोषण करणारी महिला. खरेतर रोजच्या जीवनातही  प्रत्येकीचा वेगळा लढा सुरु असतो. आयुष्यभर तगमग करत जगण्याचा संघर्ष सुरूच असतो: पण त्यासाठी ती आंदोलने करीत नाही. धरणे देत नाही किंवा निदर्शनेही करीत नाही, म्हणून बरेचदा तिचा आक्रोश चौकटीपार पोचत नाही. 'जीवना हि तुझी मिजास किती' असे म्हणत सहन करत ती जगत राहते. अशी हि जगातील निम्म्या लोकसंख्येची शोकांतिका. पण आता जग बदलाची नांदी होऊ घातली आहे. एकीकडे भ्रूणहत्या, हुंडाबळी, बलात्कारासारख्या समस्या ..महिलांच्या जगण्याच्या अधिकारावरही प्रश्न निर्माण करणाऱ्या, वर्चस्व गाजवणाऱ्या... नरविविक्षित समाजातील अनेक विकृतींना तोंड देतांना तिला सोसाव्या लागलेल्या वेदना, करावा लागणार संघर्ष आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत लढतांना होणारी घालमेल. अश्या अनेक नकारात्मक बाबी ... त्यासाठी निर्माण केलेले नकारात्मक वातावरण... तर दुसरीकडे महिलांच्या तंबूत आता सकारात्मक निर्णयक्षमतेचे, सर्वक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन मिळालेल्या यशाचे, शिक्षणाने आले...

मेरे घर आना जिंदगी ...

तो उपाशीच निघून गेलाय म्हणून दिवसभर तिचं मन लागलं नाही. आपण फार दुखावलं त्याला विचार करून तिच्या मेंदूचा भुगा झाला होता. तिची संध्याकाळही तशीच धुरकट होत गेली. अक्ख्खा दिवस ओघळता गेला बाहेर आकाशी मेघ दाटलेले अन इकडे मनात मळभ, डोळ्यात ओल साठली राहिली दिवसभर. अश्रूंचा पाऊस कोसळत राहिला. कालरात्री त्याचं अन तिचं असं भांडण झालं. तो सकाळी न बोलताच निघून गेला. निघून जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली. त्यानं एकदाही पाठी वळून पाहिलं नाही. 'रात्रभर माझी अवस्था काय झाली असेल ह्याच्याशी ह्याला कसलेही देणेघेणे नाही' तिला हुंदका आवरला नाही अन मग सगळंच ओसंडून वाहू लागलं. 'माझ्या भावनांची किंमतच नाही याच्या लेखी' तिला पुन्हा भळभळून आले. काल प्रसंगच तसा घडला होता .. त्याला आवडते म्हणून कित्तेक दिवसांनी तिने हातभर मेहेंदी लावली होती. स्वतःच्या हातांकडे अन त्या गडद रंगलेल्या मेहेंदीने खुललेल्या सौंदर्यास बघून तिलाच कसलं अप्रूप वाटत होतं. सकाळी ती कुठली कुठली कारणे शोधून त्याच्या पुढे पुढे करत राहिली पण तो त्याच्या टॅबमध्ये तोंड खुपसून बसलेला. कामात प्रचंड मश्गु...

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

'मन' तसे पाहिले तर छोटासा दोनाक्षरी शब्द. पण आयुष्याच्या आठवणी, कित्तेक घटना, कुठकुठली स्वप्नं, आणि कित्तेक गुपितं ते आपल्या इतकुश्या कुपीत दडवून ठेवत असतं. मन दिसत नाही पण असतं. मनाला स्पर्श करता येत नाही पण पाहिलेल्या अनुभवलेल्या कित्तेक गोष्टी मनाला स्पर्शून जातात. भावनेच्या आहारी जाऊन आपण चुकतो अनेकदा पण मनाला धारेवर धरता येत नाही. मन मात्र कधीही अन कुठेही आपल्याला चिमटीत धरू शकतो. म्हणूनच म्हणतात ना 'मन मनास उमजत नाही, काही केल्या समजत नाही' पण मनात आहे ते मिळवणं किंवा मनासारखे घडतांना बघणं किती आनंददायक असतं. म्हणजे मन हसतं, मन रुसत, मन खट्याळही असतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाला उद्देशून मनाचे श्लोक लिहिले. त्यांनी मनाला अचपळ, नाठाळ, अनावर अशा किती प्रकारांनी संबोधले. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 'मन हे राम जाले'  म्हणजेच संत अन महापुरुषांनाही मनाचे माहात्म्य मान्यच होते. मानसोपचार आपल्याकडे फार महत्त्वाचे मानलेले आहेत. मानसपूजा खरी पूजा मानली जाते. मनासारखं वागावं, स्वच्छंदी मनानं जगावं हा आजच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन आहे. मन जिंकणे, मनीम...

पाव शतकाचा 'आक्रोश'

Image
मा णूस आपला आहे कि परका, मित्र आहे कि वैरी हा विषयच नसतो बरेचदा. तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेतला असेल तर तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी तुमची असते. तुमच्या पुढ्यात उभा असणारा पुरुष  तुमच्या कितीही विश्वासातला वाटत असला तरी त्याच्यातला नर कधी जागा होईल आणि तुम्ही मादी आहात म्हणून तो तुमच्यातल्या स्त्रीचा चुराडा करत माणुसकीला काळिमा फासेल याचा नेम नाही. नवं वर्षाच्या उत्सवात पुरुषांच्या घोळक्यात आब्रू वाचवत पळत सुटणाऱ्या मुली काय किंवा मोनिका घुरडे, आयआयटीएन स्वाथी किंवा पुण्यात इन्फोसिसच्या रसीलाची हत्या काय अशी अनेक उदाहरणे आपण रोज रोज बघत असतो. हल्लीच दिल्लीत झालेली घटना सगळ्यांच्याच स्मृतीपटलावर ताजी आहे. ओळखीच्या मुलाने घरी सोडून देण्याच्या निमित्ताने मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन स्वतःसकट इतर ४ मित्रांच्या हवाली केले. पहाटेच्या सुमारास तिने जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली आणि घडली घटना पोलिसांना सांगितली. माध्यमांनी ती देशभर प्रसारित केली. अनेकदा जवळचा मित्रच 'ती' च्या परवानगी शिवाय तिच्यावर त्याच्या इच्छा थोपवतो, ती नाही म्हणत असतांनाही त्या पूर्ण करून...