कोणता तो तीर होता जो मनाच्या पार गेला कोण होते आपले ज्यांनी विषारी वार केला आटली ती ओलमाया खुंटला सारा जिव्हाळा कोरड्याशा भावनांचा का फुका आधार केला आसवांच्या वाहण्याला बांध टाकावा म्हणाला घाव झाला खोल तेव्हा का तमाशा फार केला जिंकणे ना हारणे हेतू सुखाने खेळणे हा जे मिळाले ओंजळी त्याचा सुखे स्वीकार केला पावसाची वाट होती तो सुगीचा काळ होता घात केला प्राक्तनाने वादळाने मार केला झाड होते डवरले, होते नभाशी उंच गेले वादळाने पाडले मी त्या फुलांचा हार केला काल रात्री काय झाले कोण जाणे का पळाले त्या बिचाऱ्या मांजराला का असा बेजार केला बेरजेला भागले अन् गुणेला जोडले मी शून्य झाल्या भावनांचा मी मनोव्यापार केला रश्मी पदवाड मदनकर
Posts
Showing posts from December, 2022