Posts

Showing posts from December, 2022
 कोणता तो तीर होता जो मनाच्या पार गेला  कोण होते आपले ज्यांनी विषारी वार केला  आटली ती ओलमाया खुंटला सारा जिव्हाळा  कोरड्याशा भावनांचा का फुका आधार केला  आसवांच्या वाहण्याला बांध टाकावा म्हणाला  घाव झाला खोल तेव्हा का तमाशा फार केला   जिंकणे ना हारणे हेतू सुखाने खेळणे हा  जे मिळाले ओंजळी त्याचा सुखे स्वीकार केला पावसाची वाट होती तो सुगीचा काळ होता  घात केला प्राक्तनाने वादळाने मार केला  झाड होते डवरले, होते नभाशी उंच गेले वादळाने पाडले मी त्या फुलांचा हार केला काल रात्री काय झाले कोण जाणे का पळाले  त्या बिचाऱ्या मांजराला का असा बेजार केला बेरजेला भागले अन् गुणेला जोडले मी शून्य झाल्या भावनांचा मी मनोव्यापार केला रश्मी पदवाड मदनकर