Posts

Showing posts from April, 2016

लाडका सोनचाफा ..

Image
एकेक क्षण महत्वाचा असतो पण एखादा क्षण किती खास असतो ना ? आज ऑफिस मध्ये मोठ्या बहिणीसारख्या असलेल्या एका जवळच्या मैत्रिणीने तिच्यासाठी नवऱ्याने मुंबईहून खास आणलेल्या फुलांतून माझ्यासाठी निवडून जपून आणलेला 'सोनचाफा' हातात दिला आणि काय सांगू काय वाटलं.... सोनचाफा .. अतिशय आवडतं फुल . म्हणतात हे स्वर्गीय फुल आहे. देवांच लाडकं…  सोनचाफ्याशी काही आठवणी निगडीत आहेत. मुंबईच्या... मला आठवतं, तशी सोनचाफ्याशी माझी ओळख फारशी नव्हतीच. त्याचं कारणही तसं होतं. नागपुरात हा फारसा दिसतंच नाही. चाफ्याचे सगळे प्रकार आढळतात पण सोनचाफा क़्वचितच दिसतो....तर मुंबईत सोनचाफ्याची ओळख तेव्हाच्या तिथल्या ऑफिसातल्या एका मैत्रिणीने दादरच्या स्वामींच्या देवळात दर्शनाला जातांना करून दिली आणि मी वेडावून प्रेमातच पडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा सोनचाफा दिसला तो ओंजळीत भरून घेऊन तासंतास त्या सुगंधानं तल्लीन होऊन तादात्म पावत राहिले. सोनचाफा स्वामींच्या पायाशी वाहिल्यावरही हाताला त्याचा मंद सुगंध घट्ट धरून असायचा. त्या हातांना लाभलेला तो सात्विक स्पर्श अन जीव प्रसन्न करणारा सुगंध इतका हवाहवा वाटायचा क...

झंझावती नेत्या तृप्ती ताई देसाई ह्यांना खुले पत्र

 झुंझार प्रवृत्तीच्या, अथक परिश्रमी, सळसळत्या रक्ताच्या, तळमळीच्या समाजसेविका, लढवैय्या, आक्रमक आंदोलनकर्त्या, जगतजननी- जगन्माता कळकळीच्या महिला कार्यकर्ता ...अर्रर्र नाही नाही (नुकतच) पुढारलेल्या झंझावती नेत्या तृप्ती ताई देसाई ह्यांना खुले पत्र बाई गं  ... महादेवाने तिसरा डोळा उघडावा तसे अचानक तुझे डोळे उघडले अन तुझ्यातली दुर्गा जागृत झाली. धार्मिक स्थळांतून महिलांवर होणारे अत्याचार तुला आजच दिसू लागले आणि तू मां कालीचे रौद्ररूप धारण केले. शनीच्या चौथऱ्यापर्यंत ठीक होते गं, आम्ही नाही तर नाही तू दर्शन घेतलेस याचाही आनंद कमी नव्हता. पण तू एक एक पाउल उचलत पुढे पुढे जाते आहेस आज मंदिर उद्या मस्जिद जणू धार्मिक स्थळी दर्शन घेणे हे एकमेव ध्येय एकमेव स्वप्न स्त्रियांच्या लेखी उरलंय हे त्यांच्यावतीनेही तुझ तूच ठरवून मोकळी झालीयेस. बायो ! स्त्रियांनी स्त्रीवादी असावं माजुरडी हट्टवादी झालोत तर ते स्त्रीला शोभणारं नाही. स्त्री म्हणून स्त्रीने हळवेपण, ममत्व, नम्रपण जपलच पाहिजे. स्त्रीचे शाश्वत गुण आहेत ते. तेच गमावले तर कसली स्त्री आणि कसला स्त्रीवाद मग. आपण आपले हक्क आपले स्त्रीपण आ...

पिठाचा डबा

खाडकन झोपडीचे दार वाजले. सुंता सनसनतच आत शिरली. रम्या डोळे चोळत उठून बसला. चुलीजवळ जाउन बसलेल्या मायला म्हणाला, 'कशी व तू? सकायपासून गेली मले एकट्याले टाकून, कै खायलेबी करून न्हाई ठिवलं, केवढी भूक लागली मले...मरतो का काय वाटे" सुंता गप्पच होती. मनात काहीतरी भयान जाळ पेटला होता,जवळची चूल मात्र निवांत थंड पडली होती. रमेसची भुकेने कासावीस झालेली बडबड चालूच होती. ती चुलीजवळचा डब्बा हुसकू लागली. पिठाच्या डब्याला काठाशी लागलेलं पीठ काढायला म्हणून डबा जमिनीवर आपटू लागली हाताने खरडून खरडून पीठ पडते का पाहू लागली. "काई बी नाई ना वो त्या भगोण्यात..डाळ-भात कर, मले पोटभर जेवाले पायजे वो माय काल रात्च्याले बी तूनं पिठाचं पाणी प्याले देल्तं तवा पासून कायबि खाल्ल नाई, पोट तोडून रायल मायवाल'' रम्या सुंता तशीच उठली पिशवी उचलली अन बाहेर जायला निघाली तसाच ७ वर्षाच्या रमेशन तिचा पदर धरला. 'माय पयले जेवाले दे ना वो, तू जाशीन मंग कवा येशीन पत्ता नाई तवापरंत म्या कसा राऊ वं .. लई भूक लागली व माय ??" सुंता रागानं डाफरली त्याच्या कानाखाली सटकन दिली. पह...
स्वसंवाद  प्रिय स्व  लक्षात आलंय बघ माझ्या, सगळं कस ना विरोधाभासी असतं माणसाचं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या गोष्टीतून, एखाद्या विचारापासून स्वतःला दूर करून घेण्याचा, विसरण्याचा त्यातून बाहेर पडण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत असतो ना तेव्हा जरा जास्तच अडकले जातो, आत आणखी आत ओढले जातो. नको नको म्हंटले कि त्याच गोष्टींसाठी आसुसतं मन. जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकेच जवळ खेचले जातो. जवळच्या गोष्टींच अप्रूप नसतं अन अख्त्यारीबाहेरील गोष्टींची ओढ लागून राहते. काहीतरी मिळत नाही तोपर्यंत असोशी असते अन मिळाले कि किंमत राहत नाही. जवळची माणसं जवळची वाटत नाहीत आणि जवळ नसणारी खुणावत असतात. वर्तमानात जगता येत नाही आणि भविष्याच्या स्वप्नातले मनोरे बांधत बसतं ..असं कसं ना ??   हे मन नावाचं चाप्टर लैच चाप्टर असतं बघ.      तुझीच स्व ..

स्वगत (प्रवाह)

प्रिय स्व प्रवाहाच्या उलट दिशेने पोहायला आवडतं आपल्याला, आपले स्वतःचे तत्व आहेत, जीवनाविषयी वेगळे असे मत आहे. आणि जगण्याची पद्धतही आहेच पण मग हि आपलीच आवड आणि आपलीच निवड हे सोयीस्कर पणे विसरतो आपण ? उलट दिशेने प्रवास म्हणजे मग वाहत्या प्रवाहाच्या गतीचा सामना करायलाच लागणार ना ... वाटेत येणारा कचरा,गोटे, काचा आपल्यालाच येऊन अडकणार, आपल्यावरच मारा करणार हे गृहीतच धरलेले नसते....आणि चिडचिड होते. म्हणजे मी प्रवाहाच्या विरुध्द पण जाणार आणि गोष्टी माझ्या मर्जीने पण घडाव्या अशा अशक्य अपेक्षा घेऊन चालतोय का आपण ? आपल्या सोयीने आणि आपल्या नियमानुसार चालण्याच्या स्वभावामुळे प्रवासातले भले बुरे अनुभव हि आपली जबाबदारी असते त्याचा दोष प्रवाहाच्या, आणि प्रवाहात स्वतःला सामावून घेऊन मार्गी चालत जाणाऱ्या इतर गोष्टींच्या माथी मारण्यात अर्थ नसतो. हे ध्यानात ठेव आणि पुढे उधे चालत राहा. पुढे शंख शिंपले झालेच तर मोतीही मिळतील आणि नाहीही मिळाले तरी अपनी धून में चलने का मजा तो कुछ और है ही. नै का ?? तो चलते चलो ... तुझीच स्व