Posts

Showing posts from December, 2018

माणसे ...

माणसे ...  पाळली जातात टाळली जातात चाळली जातात गाडली जातात  माणसे ...  पकडली जातात जखडली जातात अडवली जातात नडवली जातात रडवली जातात माणसे ...  घेरली जातात पेरली जातात  पीडली जातात रेटली जातात माणसे ...  ढवळली जातात खवळली जातात सतवली जातात बधवली जातात माणसे ...  वापरली जातात चाळवली जातात नाचवली जातात नागवली जातात माणसे ...  आवरता येतात सावरता येतात घडवता येतात  स्विकारता येतात..  जपली जाऊ शकतात आपली राहू शकतात ..  माणसे माणसे असतात !! रश्मी मदनकर 21 डीसे. 18
काय कळाले कळले नाही, असेच झाले जगणे नजरी काही भिडले नाही असेच झाले बघणे ! डोहमनाच्या खोलीचा मज थांगच कळला नाही उथळ मोहाच्या खेळामधे असेच झाले फसणे ! गणगोतास देऊन अंतर,जगलो वेड्यावानी चरणस्पर्श मज घडले नाही उगाच झाले तगणे ! चांगल्या  वाईटामधला, भेद आकळला नाही पस्ताव्याचे अश्रू ढाळत उगाच झाले रडणे ! सोबतीची बातच सोडा , कुणीच थांबले नाही प्रताडणेची भोगून पिडा, असेच झाले खचणे ! रश्मी मदनकर. 12 डीसे. 18

चर्चा सेलिब्रेटी मॅरेजेसची ...

Image
जगातल्या सर्व बातम्या देण्यासारख्या घटना संपुष्टात येऊन केवळ डोळ्यांचे पारणे फेडणा-या दिमाखदार विवाह लग्नसोहळ्याच्या बातम्या येऊ लागल्या तर ?? जिकडे तिकडे हि एकमेव चर्चा सुरु असली तर ? सकाळपासून टीव्ही चॅनेल्सवरून छोट्या छोट्या गोष्टींचे लाइव्ह प्रक्षेपण.. गेल्या वर्षभर प्रसारमाध्यमात जेकाही सुरु आहे ते पाहून हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. जणूकाही जगातील सर्व घटना संपल्या आहेत, राजकारण बंद पडलंय, समाजकारण संपुष्टात आलंय, अपघात, चोऱ्या चपाट्या, मृत्यू, गरिबी, भ्रष्टाचार हे सगळं सगळं व्हायचं थांबलंय आणि घडतंय फक्त नं फक्त सेलिब्रेटींचे विवाह असे वाटायला लागावं इथवर या लग्नाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून फिरताहेत.. नुसतं फिरत नाहीयेत तर गल्ली-बोळात, कट्ट्यावर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर ह्याचे चर्वित चर्वण वायरल होतंय. यंदाचं वर्ष म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय इंडस्ट्रीयालिस्ट आणि बॉलिवूडमधील ख्यातनाम व्यक्तींच्या लग्नसराईचं वर्ष म्हणून गाजलं. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश आणि नीता अंबानींच्या मुलाचे लग्न आटोपले आता सुरु आहे लगीनघाई मुलीच्या लग्ना...

वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी ठेऊन द्यावी उशाशी .. कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल भावनांचा उद्रेक होईल, मग ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,  नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी .. कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि .. डोळे पाझरायला लागले कि अन उबेचे शब्दही भिजले कि, डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर आणि डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं पुन्हा ... पुन्हा

कातरवेळ !

हि कविता म्हणजे एका निराशेने ग्रासलेल्या सखीने दुसऱ्या तश्याच हळव्या सखीला उद्देशून केलेला संवाद आहे. अनुभव समांतर असला की ते दुःख आपलं वाटतं. खरंतर समदुःख हे परानुभूती सहजतेनं देत असेल .. म्हणून नभ भरून आलं कि, पाऊस बरसून गेल्यावर, रात्र दाटून आली कि बरेचदा सारखे फीलिंग असतात, म्हणूनतर कविता आवडतात त्या बरचजणांना सारखंच रडवतात कुणीतरी तयार केलेली गाणी ऐकताना , चित्रपट पाहताना डोळ्यातून पाणी वाहू लागतं, मनाच्या घालमेली तश्याच अनुभवताना, जवळून बघत जगताना खूप कठीण आणि त्रासदायक होत जातं, असं मन घेऊन जन्माला येणं प्राक्तनच म्हणायचं..  पण आता आपल्यात बदल होत नाहीच हे समजावून घेउन स्वतःलाच सांभाळून घ्यावं लागतं कारण आपल्या मनाची त्या त्या घटनेला त्या त्या परिस्थितीला होणारी अवस्था समजून घेणारा सहयोगी प्रत्येकवेळी तश्याच मनाचा असतो असे नव्हे, तश्या मनाचा असला तरी त्याचे तुमचे प्राक्तन सारखे असतेच असे नाही आणि म्हणून तो त्या त्या प्रत्येकवेळी सोबत असतोच असे नव्हे..एकसारख्या मनाची माणसं एका विशिष्ट घटनेत विशिष्ट वेळी एकाठीकाणी सेम अनुभवातून जात असणे किंवा निदान मनाने तीथे...

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!

Image
म हिलांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरु करून आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात  समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली.  एक दुर्लक्षित, असहाय जिणे, परिस्थितीचे चटके खात जगणे तिला मान्य नव्हते.. हा लढा देत असतांनाच तिला अनेक संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागले. स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे हे सहज साध्य करणे शक्य नव्हते. सुरुवातीचा काळ कठीण होता खरा पण आता महिलांच्या तंबूतले वारे बदलू लागले आहेत. तीन तिच्या कष्टाने निगुतीने प्रयत्न करून स्वतःसाठी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करून घेतलं आहे. तिला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता येऊ लागलं आहे. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळायला ल...