Posts

Showing posts with the label असंच काहीबाही

गम्मत

 NBT च्या राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात झालेल्या मुलाखतीत विशाखाने एक प्रश्न विचारला...  “तुम्हाला लिखाणासाठी प्रेरित करणारा एखादा गमतीशीर किस्सा सांगा ना. काहीतरी मजेशीर घडले असेल, ज्यातून काहीतरी लेखणीत उतरले असेल?” असा प्रश्न आला की खरतर मीच गोंधळते. कारण मी लिहिते ते बहुतांश गंभीर, वास्तविकतेत घडलेल्या घटनांमधून, आणि त्या अनुभवांतून मनात निर्माण झालेल्या उद्विग्नतेतून व कोलाहलातून जन्माला आलेलं असतं. माझ्या लिखाणाचा संबंध हा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेल्या कामाशी, अभ्यासाशी आणि संवादांशी आहे. त्यामुळे त्या लिखाणामागे गमतीदार किस्सा असण्याची शक्यता फारच कमी. उलटपक्षी गंभीर घटना अधिक असतात.  गम्मत असेल तर ती लिहिण्यानंतर किंवा लिखाणाच्या प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या प्रसंगांत असते. संवेदनशील विषयांवर लिहिल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यात जी गम्मत असते, किंवा गंभीर मुद्द्यांबाबत लोकांच्या उथळ समजुतींशी सामना झाला की जी विडंबनात्मक मजा जाणवते तीच खरी मजेशीर असते. एकाच व्यक्तीत दिसणारे दोन विरुद्ध चेहरे, दोन विरोधी विचार… हे पाहताना मात्र मला खरी गंमत वाटते. अशा अनेक “गंभी...
Image
  एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे परत येतं, याउलट असेही की जे जे मिळवलेलं असतं...स्वतःच्या कष्टाने, कर्माने किंवा ओरबाडून देखील; ते कधीतरी कुठेतरी कोणत्यातरी रूपात तुम्हाला परत करावं लागतं. त्याच व्यक्तीला करावं लागेल असंही नाही; पण ते परतावं लागतं हे निश्चित. कर्माचा सिद्धांत म्हणा किंवा जगण्याचे नियम. आयुष्य जसजसं पुढं जात राहतं आणि जाणीवा प्रखर होतात तसतसे हे अनुभव अधिकच ठळकपणे प्रखर स्वरूपात जाणवायला लागतात. हल्ली मला एक गोड आठवण सतत येत असते, माझा मुलगा ओम आठ महिन्यांचा असताना आम्ही नागपूरहून मुंबईला शिफ्ट झालो आणि तो दोन अडीच वर्षांचा असताना मी मुंबईत जॉब जॉईन केला होता. माझ्या सिनिअर असणाऱ्या मॅडमचा या अडीच वर्षांच्या ओमवर फार जीव जडला होता. त्याचे त्या लाड पुरवायच्या, फोनवर त्याच्याशी बोलत बसायच्या. त्या कुठेही बाहेर गेल्या की त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायच्या. कधी गिफ्ट्स कधी खाऊ. हा सिलसिला काही वर्षे निरंतर चालू होता. त्यावेळी त्यांचा मुलगा टीनेज होता. आता माझा मुलगा ...

माझी शाळा

Image
  शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ...
रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वातावरणात पसरलेले धुके, हवेत पसरलेला गारवा आणि मनात भरून उरलेला आजवरच्या डिसेंबर आठवणींचा मंद मंद गंध. ''जाडो कि नरम धूप और आंगण में लेटकर....'' वगैरे आठवाचे दिवस. यंदाचे वर्ष मात्र अशा स्वप्नील वातावरणाचे नाही. यंदा ऐन थंडीत थरथरत्या हाताने अग्नी द्यावी लागलेल्या सासऱ्यांच्या स्मृतींचे तर ऐन डिसेंबरमध्ये अचानक झटकन निघून गेलेल्या दोन जिवापासच्या मैत्रिणीना आक्रंदत हाक मारत जाणाऱ्या क्षणाक्षणाच्या हिशोबाचे. गेल्या महिन्याच्या शेवटाला दीर्घ आजारपणाने सासरे सोडून गेले. मागे सोडून गेले भरलेपुरले कुटुंब आणि अनेक छोट्याछोट्या गोष्टी. त्यांची पुस्तके, वेगवेगळ्या रंगाच्या पेनांचे सेट, दैनिक हिशोब लिहिण्याची सवय असल्याने हिशोबाच्या भरलेल्या अगणित डायऱ्या.. त्यांचा पंचा, काही रुमाल, त्यांचे हौसेने शिवलेले सूट आणि पैसे ठेवायची पर्सपेक्षा जराशी मोठी अशी बॅग. सासुआई गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या आठवणीसाठी आम्ही सगळ्या घरातल्या स्त्रियांनी त्यांची ए...

मनातले काही

Image
सासरे जाऊन अर्धा महिना उलटला. खरतर ते गेले हे स्वीकारायला आणि आता ते कधीच दिसणार नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयारच नाही. समस्त कुटुंबाचा आधारवड होते ते. आमच्या कुटुंबातील जुन्या खोडांपैकी हे शेवटचे खोड होते. सासऱ्यांचे सगळे भाऊ, सासूआईंचे सगळे भाऊ याआधीच गेलेत, माझे व माझ्या जाऊचे वडीलही आधीच गेलेत आणि माझ्या नंदांचे सासरेही गेलेत. या सगळ्या घरादारातल्या स्त्रिया मात्र अजून खमक्या आहेत; नातवंडांच्या पतवंडांचा वाढीव संसार सांभाळत जगत आहेत. चाळीशीपार मध्यवयात पोचलेल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एकेक करत निघून जाते आहे; एक पिढी आता संपते आहे. दुसर् ‍ यांसाठी जगत स्वत:चे जीवन संपवणारी पिढी, मान मर्यादा वडीलकीची आब राखणारी, कमी पैशातही तडजोड करून, तरीही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, सोबत घेऊन चालणारी पिढी आता संपते आहे. ते होते.. आहेत तोपर्यंत आपण अजूनही लहान असण्याचे आतून येणारे फीलिंग कायम आहे.. ही डोक्यावर हात ठेवून असणारी माणसे जसजशी जाऊ लागतात तसतशी ही फीलिंग मंदावत जाणार. जबाबदारीची जाणीव वाढत जाणार आणि हळूहळू आपल्याला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे; हे विधिलिखित टळणारे नाही.. पण...

असमाधान आणि अतिमहत्वाकांक्षा हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे..

Image
  सतत चांगल्यातलं वाईट शोधण्याची सवय एकदिवस स्वभाव होत जातो. एकदा हा स्वभाव बनला की आयुष्याने कितीही चांगले केले तरी त्यात वाईट शोधण्याची सवय काही जात नाही. जेव्हा आपण असमाधानकारक, तक्रारयुक्त जगणं दीर्घकाळ जगायचं चालू ठेवतो, तेव्हा काय होतं? हा आपला संपूर्ण इतिहास बनत जातो. कृतज्ञ व्यक्ती समाधानाने समृद्ध असते, आणि त्या उलट कृतघ्न मनुष्य अनंत असंतोषाच्या दारिद्र्यात यातना भोगत राहतो. महत्वाकांक्षा असावी पण ती पूर्ण होण्याचं सुख भोगता येईल इतकी असावी. स्वप्नवत वाटणाऱ्या इच्छा किंवा इतरांसाठीसुद्धा सहज साध्य नसणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सहज आपल्याला मिळूनही त्याचा आनंद मानता-मनवता येत नसेल आणि ते असमाधानावर अर्धवट सोडून त्यापुढली महत्वाकांक्षा, त्यापुढलें स्वप्न आणि डोंगराएवढ्या इच्छा आपण पुढ्यात मांडून ठेवत असू, जे जे मिळालय, मिळतंय त्यातलं आणि आहे त्यातलं समाधान आनंद कधीच उपभोगता येत नसेल तर आपण या जगातले सगळ्यात दुर्दैवी, गरीब जीव आहे असे समजावे. महात्मा गांधी म्हणतात ना .. We notice that the mind is a restless bird; the more it gets the more it wants, and still remains unsatisfied...
आयुष्यभर धावून धावून दमलेला असतो जीव .. त्यात तुम्ही नोकरी करणारे, घरचं बाहेरचं सगळंच सांभाळणारे असाल तर दमून, कावून, रापून गेलेला असतो जीव.. घरातल्या, गणगोतांच्या, संबंधातल्या, नात्यातल्या, माहितीतल्या, मैत्रीतल्या, भोवतालच्या सगळ्यांच्या फर्माईशी, इच्छा, अपेक्षा.. त्यांच्या त्यांच्या आपल्याबाबतीतच्या आकांक्षा पूर्ण करत राहणे, सगळ्यांची मर्जी सांभाळत जगणे .. अपरिहार्य असतं आॅफिस, तीथली कामं, कामाचा ताण, आॅफिस पाॅलिटीक्स, विवीध प्रकारची वृत्तीची माणसं सगळ्यांना फेस करणं, शिकणं शिकवणं, समजणं- समजावणं-समजून घेणं.. सतत गोतावळ्यात राहणं, सतत सगळं आणि सगळ्यांना ऍडजस्ट-मॅनेज करत राहणं .. पर्यायच नसतो तब्येतीच्या कुरकुरी तर कोपऱ्यातच ढकलायच्या .. या सगळ्यात मन दुखू द्यायचं नसतं .. दुखलं तरी दाखवायचं नसतं.. हसत राहायचं, सतत आनंदी दिसायचं .. या सगळ्यांवर उपाय म्हणून 'सुकून के पल' शोधत चार मित्र-मैत्रिणी शोधायच्या, एकत्र आणायच्या .. पण बरेचदा (नेहेमी नाही) इथंही फार वेगळं काही घडत नाही. माणसं कधी स्वार्थी असतात किंवा फार फार जजमेंटल निघतात.. कुठूनतरी कसेतरी पाठीत वार तरी होतात .. ...
नवीन कोरं करकरीत एखादं पुस्तक हातात येणं अत्यानंद आहे पण पुस्तकाबरोबर माणसंही वाचायची हौस असेलतर त्या त्या माणसाने वाचलेलं एखादंतरी पुस्तक वाचायला मागून घ्यावं.. वाचलेल्या पुस्तकातून माणसाच्या स्वभावाच्या अनेक कथा सांडलेल्या सापडतात .. त्या वेचून एकसंध बांधल्या कि बराचसा माणूस कळायला मदत होतेच. म्हणजे पुस्तक वाचतानाच त्यानं त्या पुस्तकाला दिलेली वागणूक, पानापानावर विशिष्ट जागी केलेल्या खाणाखुणा, कुठे कुठे वाचतांना घेतलेले पॉजेस विशिष्ट पान मुडपून ठेवतांना त्या पानावरचा नेमका मजकूर, पानात मध्ये मध्ये ठेवलेल्या काही वस्तू.. पुस्तकावर पानांना लागलेली पडलेले डाग आणि बरेच काही न्याहाळताना माणूस हळू हळू अवगत होतो.. हळू हळू कळलेली माणसे मग दगा देत नाहीत .. (c)रश्मी मदनकर

लेखकांच्या गोष्टी

Image
#लेखकांच्या_गोष्टी ''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.'' परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं....

ग्रॅव्हीटस रत्न

Image
महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यास...
या दिवाळीत माझं लिखाण वाचा - > विदर्भ 'सकाळ' आवृत्तीच्या दिवाळीअंकात 'सौभाग्याची लेणी' ही कविता - > 'झी मराठी'च्या दिवाळी अंकात 'फुगे' कथा > 'विकासकर्मी अभियंता मित्र' या वार्षिकांकात नागपूर मेट्रो प्रवासावरील लेख. > 'चारचौघी' वार्षिक अंकात 'अंतरीच्या गुढ गर्भी' कथा .. > 'कोकणदिप' दिवाळी अंकात '306' ही कथा..
एरवी टीव्ही पाहायला अजिबात वेळ नसतो .. सलग एखादी सिरीज पाहील्याचं आठवतं ते एपीक चानलवर ठाकुरजींच्या कथांवर अनुराग बासूनं दिग्दर्शित केलेली संपुर्ण सिरीज झपाटून गेल्यासारखी पाहीली होती दोन वर्षांपूर्वी... त्यानंतर दोनचार चुटूक पुटूक चित्रपट सोडले तर टीव्ही पाहणं फारसं शक्य होत नाही. पण अलिकडे मस्त सरप्राईज मिळालं काही दिवसाआधी नवरयानं तुझ्यासाठी छान काहीतरी सुरू झालंय बघ सांगत एक चानल सबस्क्राईब करून दिलं... टाटास्कायवर काही दिवसांपासून 'टाटास्काय थीएटर' हे स्पेशल पेड चानल सुर ू झालंय. देशातल्या सर्व प्रांतात सर्व भाषेत गाजलेली नाटकं ते अत्यंत कसदार कलावंतांनी अभिनय केलेल्या नाटकांच्या खास फिल्मस बनवून थीएटर रूपात हिंदी भाषेत आपल्यासाठी सादर करीत आहेत.. यात वैचारीक नाटक आहेत, संस्पेन्स, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री, चाईल्ड अब्युज, मनोरंजन, विनोदी असे सगळेच प्रकार आहेत विशेष म्हणजे ड्रामा मेकींगच्या त्याच्या कंसेप्टबद्दल अभिनय करताना आलेला अनुभव, पात्रांची वैशिष्ट्ये, परदे के पिछे का ड्रामा यावर मधून मधून चर्चा होते.. दिवसाला एकतरी नाटक यावर पाहायचं असं ठरवलं होतं पण वेड...
Image
पहाटसमयी अंगणात नेत्राकर्षक पखरण दिसते खरी .. पण रात्रीच्या अंधाराचे गुपित तुला माहित नाहीत रे .. गळताना प्राजक्ताच्या हुंदक्यांचे रंग लवंडले असतात  .. खुडतांना अबोलीच्या चित्कारण्याचे फवारे उडाले असतात  .. आणि तुला .. तुला मात्र सूर्योदयाच्यावेळी आसमंतात पसरलेल्या लाल-केसरी रंगाची भूल पडते ... मग मला सांग, मला आवडतो तो काळा रंग अधिक प्रामाणिक नाहीये का रे ? रश्मी पदवाड मदनकर २४ जुलै १८
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते .. आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो .. पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ... चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो .. दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो .. सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
दिवसभर केसात माळून ठेवलेला गजरा तू येईपर्यंत वाट पाहून दमला, चिमला आणि तू येता येता.. तसाच पायवाटेवर गळून पडला . . . तू येतांना त्याच फुलांवरून चालत आलास . . एवढंच काय ते त्यांनी पाहायचं बाकी होतं मग काय .. कायमचे डोळे मिटूनच घेतलें त्यांनी ...

भास !

जेव्हा फार एकटे असतो तेव्हा एकटे नसतो आपण गोतावळा होतो.. कोलाहल झोंबतो जीव गुदमरतो खूप गर्दीत असतो तेव्हा गर्दीत कुठे असतो आपण ? फार एकटे असतो .. आतली हाक पोचतच नाही कुणापर्यंत आतच विरते .. जीव चडफडतो असल्या नसल्या जाणिवांचे सगळे नुसतेच भास असतात. आहे तसे नसतेच काही नसलेले असते पण बरेच काही असल्या-नसल्या वाटण्याचे सगळे भास ठरतात शेवटी. ध्यानीमनी दिसते ते भास असतात किंवा नुसतीच आस असते. सगळी दुनियाच जगते आहे एकतर आस लावून किंवा भास ओढून .. मग ..वस्तू दिसतात, माणसे दिसतात, रस्ते दिसतात हे सगळं खरंच आहे .. की हेही सगळे भास ? की मी निर्मनुष्य एखाद्या बेटावर भासमयी विश्वाच्या पसाऱ्यात एकटी जगते आहे ? मी दिसणारी मी तरी आहे का की आहे एखाद्याचा भास .. की ..मग, मी माझाच भास कुणाच्याही विश्वात नसणारा तात्पुरता मनःपटलावर उमटलेला .. भास आहे तोपर्यंतच जगून घेऊ का एकदिवस पाण्यावरचा बुडबुड्याप्रमाणे विरून जाईन मग बुडबुडा - खरंच असतो ? (c)रश्मी पदवाड ...
शेवटी काय ना सगळ्यांचेच पाय मातीचे असतात. आदर्शवत वगैरे असं काही नसतच..म्हणूनच व्यक्तीपुजा मुर्तीपुजेइतकीच फसवी असते. नकोच करायला कुणाचीही.
कानावर पडणारे आणि मनाला भिडणारे स्वर हे खूपदा वेगवेगळे असतात. खरं तर मनाला भिडणाऱ्या गोष्टी व्यक्त स्वरूपातल्या असव्यातच असेही नाही. त्या सोन ओळींमधल्या रिकाम्या जागेसारख्याही असू शकतात, ज्या ना सांगताही कळतात-भिडतात मनात ठाण मांडून बसतात. व्यक्त केलेल्या गोष्टीही बरेचदा दिसतात तश्या असतात कुठे?? ओठांची एखादी तिरकी रेषा, डोळ्यातली चमक किंवा मलूल दिसणारे डोळे, आर्त स्वर, कातर झालेले शब्द, पडलेला-फुललेला चेहेरा, दिलेलं-न दिलेलं स्मित अश्या किती किती गोष्टी असतात पुढच्याच्या मनातलं समजून घ्यायला.. पण मनातलं समजून घ्यायला आधी मन दिसायला हवं आपलं वाटायला हवं, त्यासाठी ते आपलं करून घ्यावं लागतं त्यासाठी आयुष्यातला वेळ-ऊर्जा इन्व्हेस्ट करावी लागते ..दोन्ही बाजूने..ते न देताच फक्त मिळत राहण्याची अपेक्षा फोल ठरणारच. म्हणूनच तर मैत्रीचे नाते असे व्याख्येपलीकडे असते कारण इथे दोन्ही बाजूने समान देवाण घेवाण झालेली असते.....साऱ्याच नात्यात हि इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी ... ती ती नाती जपायची असेल तर ...  खरया समाधानासाठी....
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते .. आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो .. पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ... चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो .. दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो .. सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
अंतर्यामाच्या सागरडोहात ..अथांग खोलात उतरत जाते. तेव्हा आठवणींच्या गडद प्रतिबिंबाशी भेटी होतात. प्रेमाचं हतबलतेशी फार गहिरं नातं आहे म्हणतात, त्या क्षणांशी आत्म्याचे मिलन होतांना अंतरात्म्याची होणारी तडफड थांबवण्याचे धारिष्ट्य कुणातच नसते. या क्षणांचा गंध झिंग रूपात चढत जातो. आत्म्यात झिरपत देहात पसरतो..रोम रोम गंधावत नेतो. त्याक्षणात - गंधात तादात्म पावणार काहीतरी खास असतंच ना ?  काही क्षणांच्या आठवणींचं व्यसन जडतं रे ... Rashmi. (एका दीर्घ ललितलेखाचा छोटा भाग)