Posts

Showing posts from October, 2014

एक क्षण !!

आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला सुटला, आणि पुढ्यात येउन बसला म्हंटला … काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ?? तुही घे विश्रांती एकाच क्षणाची होऊन दे जरा शांती मनाची क्षण हा क्षणाने वाहून जाईल क्षणभर जरी विसावून जाईल दुसऱ्याच क्षणात शिरशील तू वेडे, मला विसरशील तू नव्याने पुन्हा जगायला शिक विसरून मला जगाला जिंक बघेन तुला याच धर्तीवर यशवान होतांना कीर्तीवर मी हळहळले, मुसमुसले हात धरून क्षणाला... म्हणाले क्षणा आयुष्य क्षणांनी जगतेय मी सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी क्षणात सारे विखरून जाईन तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे जगण्याचं गणित मांडणार आहे. आयुष्याचा क्षणही भागला तरी जगणंच माझं थांबणार आहे . (c) रश्मी / ५ जून २०१४ (प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !

Image
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते. ‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता, पण वाती भिजलेल्या नसतील, धुपारतीची वेळ होईल लवकर अन् माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’ असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्...

लव कि जिहाद ?

लव जिहाद - मागल्या काही महिन्यांपासून प्रचंड उहापोह होणारा विषय चावून चावून चोथा झालेला पण अजूनही चर्वित चर्वण सुरूच असलेला. चर्चा, वाद, संवाद आणि काय काय पण अजूनही विषयाला खरा संदर्भ न लाभलेला  गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलं आणि सर्व देशात जरथंड झालेल्या धार्मिक चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. पण प्रश्न निर्माण होतो तो हा कि कुठून पेव फुटलं या विषयाला आणि किती सत्यता आहे त्यात ?  ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि गट यात सामील असल्याचे निदर्शनात आले तसेच ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सॉफ्ट टार्गेट ठरतात . त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. …. यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्ता...