मध्ये व्हाटस्आप वर एक विनोद वाचलेला. ' भलाई कर और दरिया में डाल या फिर कुछ भी कर और फेसबुक पर डाल' खरतर विनोदच. पण होतंय असंच ना हल्ली , मानूया कि सोशल नेट्वर्किंग च्या माध्यमाने डोक्यातलं सगळं मांडायला मन हलकं करायला एक छान मंच मिळालाय. कल्पनेतले रंग शिंपडायला केन्वास मिळालाय पण म्हणून रंगबिंग सोडून, काहीतरी छान लिहायचं सोडून उठसूट कुणावरतरी तुटून का पडतो आपण. नात्यांमध्ये तुटलेले बंध साहवत नाही म्हणून एकटेपणा घालवायला येतात कित्तेकजण मग इथल्या लोकांनाही तोडत का सुटतात. एकतर तोडायला नाहीतर सनसनी पसरून लोकांना लाईक अन कॉमेंटसाठी जोडायला हाच हेतू… आपण काय बोलतोय, कशासाठी बोलतोय यातून काय साध्य होणार आहे कशाकशाच भान नसतं. राजकारणाला किती मनावर घेतोय आपण? यापूर्वी परिस्थिती फार काही वेगळी नव्हती पण आपल्या रोजच्या जीवनावर खरच एवढा प्रभाव होता का राजकारणाचा? आपल्या आयुष्यात एवढी खळबळ माजायची का? दिवसरात्र वैचारिक-बौद्धिक खल मांडत बसायचो का आपण? आणि यासर्वातून निर्माण होणारे मानसिक-भावनिक त्रास व्हायचे का इतके? हल्लीतर सोशल नेट्वर्किंग साईट्स...
Posts
Showing posts from July, 2015
सखे … !
- Get link
- X
- Other Apps
बयो … अगं हुंदका अलबत गिळायचा नाही सुख सुख मागून मिळायचे नाही मनास टाचून असंख्य धागे मनातला मेघ काही विरायचा नाही मनातल्या मनात कुढायचं नसतं डोळ्यातल्या पाण्यानं भिजायचं नसतं मुक्याने एकांत जगतांनाही गर्दीत अलगद शिरायचं असतं स्वप्नांचे रंग पुसायचे नाही उगाच हळहळायचे नाही क्षितीज देऊन स्वप्नांना...मग पुन्हा मागे बघायचे नाही रीत जगाची विसरून बघ ओंजळीत घे सारे ढग आनंदाची गाणी गा तुझ्याच मनासारखे जग ... सखे … तू तुझ्याच मनासारखे जग (C) रश्मी २४/०७/१५
स्वगत - आठवणींचे क्षण
- Get link
- X
- Other Apps
तसा स्वतःसाठी म्हणून खास असा वेळ काढणं कठीण असतं जरा,पण स्व-संवाद किंवा चिंतन हा प्रगल्भ होण्याचा उत्तम मार्ग आहे . मनातल्या मनात, मनात येणाऱ्या विचारांचा मनाच्या साक्षीने असा मनोवेध घेता येतो अन रोज स्वतःच्याच बदलत्या विचारांचा आलेख अनुभवता येतो. तुम्ही घेतलाय कधी असा अनुभव ? आपल्याला काय हवंय ? काय आवडतं ? कधी काय नको असतं? काय समोर दिसलं कि गालात हसू खुलतं … कशानं चटकन मूड जातो … अश्या एकनाअनेक प्रश्नांची उत्तर शोधलीय का कधी ? कधी स्वतःच्याच समीप होऊन पाहिलंय ? सुरेश भट म्हणतात 'मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.' तसे बरेचदा मला माझ्याच प्रश्नांनी भन्नावून सोडलंय. मुळात जिज्ञासू प्रवृत्ती आणि सतत काहीतरी शिकण्याची, काहीतरी छान मिळवत राहण्याची हौस. मी माझ्याच जिज्ञासा शमवत शमवत दमते कधी कधी. सतत माझीच माझ्याशी होड लागलीय असं जाणवतं कधी. प्रत्येक विषयाबद्दल कसकाय आपल्याला ओढ असते… प्रत्येक कलेबद्दल आसक्ती कशी… कश्याही आणि कोणत्याही निसर्गदत्त सौंदर्याच आकर्षण का वाटतं? हे माझेच मलाच पडलेले प्रश्न आणि मी अजूनही उत्तर शोधत हिंडतेय. प...
Stories By Rabindranath Tagore .... on Epic !!
- Get link
- X
- Other Apps
दिवसभराचे काम पाहता २४ तास कमी पडतात एक दिवस निदान ३६ तासांचा हवा अस वाटतं. अश्यात कमी पडलेल्या २४ तासात टीव्हीवर चालणाऱ्या फाल्तू सिरिअल बघणे म्हणजे काहीतरी चांगले गमावनेच नव्हे तर काहीतरी वाईट मिळवणे सुद्धा ठरते. त्यामुळे मी बातम्या आणि काही गायनाच्या किंवा हलक्या फुलक्या विनोदी सिरिअल सोडल्या तर शक्यतोर टीव्ही बघतच नाही. आणि म्हणून कुठे कोणत्या चानलवर काय चालू आहे वगैरे (अति)ज्ञान नसतच कधी. हा रोजचा तसा अनुभव पण गेल्या दोन दिवसापासून आजारी आहे. बाहेर येणेजाणे बंद. ऑफिस नाही किंवा घरकामहि नाही. मुलगा काळजी म्हणून स्वतःच स्वतः आवरून घेतोय. नवराही कामात भरून मदत करतोय. अश्यावेळी विश्रांती झाल्यावर मिळणाऱ्या निवांत वेळेत काय करावं म्हणून टीव्ही वर काहीतरी शोधत होते.काहीतरी म्हणजे रोज २४/७ दाखवतात तसलं नाही. काहीतरी छान दर्जेदार...आपल्या टेस्टच आणि मिळालेच ... नवे सुरु झालेले 'एपिक' नावाचे चानल. त्यावर सगळंच्या सगळं युनिक अन दर्जेदार असतं. आपल्या इतिहासाशी आपल्या परंपरेशी आपल्या पूर्वजांशी जुळलेली आपली पाळं -मूळं ते दाखवतात. अगदी सगळे विषय हाताळतात हा गेल्या दोन दिवसाचा अनु...
- Get link
- X
- Other Apps
काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी काही घटना, काही माणसे, काही विचार, काही रिती, काही नावे, काही आवाज, काही स्थळ आणि बरच काही. एक क्लिक आणि काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. एखाद्या शब्दाने जखम ताजी होते तर एखाद्या गंधाने विस्मरणात गेलेला माणूस मनात जागा होतो …… एखादे गाणे कानावर पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं. रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्य ा क्षणात. गाण्याची एक एक ओळ स्पर्शत जाते, जुने भास होऊ लागतात तरल संवेदना जागृत होतात आणि गाण्याला असणारे आपल्या खऱ्या आयुष्याचे संदर्भच मग त्या गाण्याची ओळख होऊन बसतात. हे संदर्भ खूप अवघड अवस्था निर्माण करतात हवेहवेसे तरीही त्रासदायक. काही आठवणी मुठीत गच्च आवळाव्या पण वाटतात आणि तळव्याला चटका साहवतही नाही. आणि अश्या आठवणींशी चिकटून बसतात … कधीतरी ऐकता ऐकता दूर लोटावी वाटतात अन कधी मुद्दाम शोधून ऐकावी वाटतात.… काही गाणी हि अशी काळजाचा ठाव घेणारी ठरतात.