Posts

Showing posts with the label व्यक्तिमत्व

एका जिव्हाळ्याच्या लेखिकेबद्दल…

Image
माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर आधारित पुस्तकात लिहिलेली अर्पणपत्रिका मला खूप भावली होती. त्यात त्या लिहितात.. “मैत्र जे होतं आणि आता नाही त्याला स्मरून आणि जे आहे, असण्याचं आश्वासन आहे त्याचा हात धरून...” बस्स... इतकंच. पण एवढ्याशा तीन-साडेतीन ओळी आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगून जातात. काही माणसं काळाच्या ओघात मागे पडतात, काही नाती विरून जातात; पण त्यांची आठवण मनात कायम राहते. आणि त्याचवेळी, अजूनही सोबत असणाऱ्या, “आहोत” असं शांत ठामपणे सांगणाऱ्या हातांची किंमतही या ओळी शिकवतात. त्यांचं “काळोख आणि पाणी” हे आणखी एक अंतर्मुख करणारं पुस्तक; हे माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. महाभारतातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भावना, त्यांच्या निर्णयांमागचे कारण आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक अपरिचित कथा या पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. “जे महाभारतात नाही ते जगात नाही” असे म्हणतात, त्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. गंगा, भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखा नव्या दृष्टीने समोर येतात...

From wheels to wings ...

Image
  From wheels to wings .... A symbol of freedom beyond limitations; the iconic wheelchair grave in Salt Lake, America. काहीतरी वाचत शोधत राहिलं की काहीतरी सापडत राहतं... कधी मनाला भावणारं, तर कधी बुद्धीला खाद्य देणारं. असच काहीतरी सापडलं आणि शेअर करावं वाटलं. प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते म्हणतात, आणि ते प्रेम अपत्याबद्दल असेल तर ते मर्यादेच्याही पलीकडे कितीतरी व्यापक होऊन बसतं. परवा एका वेगळ्या कारणासाठी काही संदर्भ शोधत होते... तेव्हा एक व्हिडिओ पाहण्यात आला; त्यात अतिशय सुंदर स्मारक शिळा नजरेस पडली. खूप आकर्षित केले त्या मूर्तीने. संपूर्ण स्मशानभूमीत ते एकमेव थडगे किंवा स्मारक (Grave) होते.. जे लक्ष आकर्षित करत होते. आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूनंतर त्या वडिलांनी ज्या भावनेने ते बनवले होते तेही विशेष आहे. ते थडगे आहे मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसन याचे. ते पाहून माहिती काढल्यावाचून राहवले नाही. मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसनचा जन्म २३ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला होता, जन्मतःच गंभीर आणि कधीही बरे न होणारे अपंगत्व घेऊन तो जन्माला आला.. तो जन्मापासूनच अंध आणि पंगु होता. जन्मानंतर तो काही तासच जिवं...

वेड्या माणसांच्या गोष्टी -

Image
  वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत...

#भेटलेलीमाणसे - ८ -वेड्या माणसांच्या गोष्टी

Image
#भेटलेलीमाणसे - ८ खरेतर या निर्मात्याचे आभारच मानायला हवेत कि ही दुनिया अनेक प्रकारच्या वेड्यांनी भरून आहे .. या वेड्यांच्या असण्यानेच तर शहाण्यांच्या जगण्यात रस आहे. शहाण्यांमुळे दुनियेचा व्यवहार नीटनेटका चालतही असेल पण वेड्यांमुळे दुनियेत जिवंतपणा आणि जगण्याची उर्मी सतत पेरली जाते. मी स्वतःला अत्यंत सुदैवी समजते मला सदैव अशी वेडी माणसे वळणावळणावर भेटत राहतात .. आणि माझ्या जगण्याला नवे बळ नवा आनंद देत राहतात. हा फोटोत दिसतोय तोही असाच एक ध्यासवेडा आहे - नाव आहे Santosh Balgir संतोष लातूरचा आहे, एक हुशार मॅथेमॅटिशिअन आहे पण त्याहून अधिक सायकलिस्ट आहे. लातूरहून सायकलने निघून त्याला आज ७३ दिवस झाले आहेत. १४० दिवसांचा ११,००० किमीचा प्रवास तो करणार आहे....त्याला १५ राज्य कव्हर करायचे आहेत त्यापैकी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगनासारखे ७ राज्य आणि ५००० किमीचा सायकलवरून प्रवास पूर्ण करून तो काल १ मार्चला नागपुरात दाखल झाला. हे २-३ दिवस तो नागपूर एक्सप्लोअर करणार आहे म्हणजे नागपूरच्या पुरातन गोष्टी पाहून त्याच्या मेमरीत साठवून घेऊन जाणार आहे. संतोष मला भेटला तेव्हा माझ्या अख्त्यारीतल्या गो...

जयवंत काकडे ‌- व्यंगचित्रकार

Image
 #भेटलेलीमाणसे -७ हे आहेत जयवंत काकडे ‌- अनेक वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यंगचित्रकार, लेखक  असलेल्या जयवंतजींचे व्यंगचित्र यंदाच्या आपल्या 'अनलाॅक' दिवाळीअंकात प्रकाशित केले होते, म्हणून जेव्हा वरोराला जाणं झालं आणि त्यांना प्रत्यक्ष भेटायचा विषय निघाला तेव्हा रात्री उशिर होत असतानाही दहा मिनीटं भेटायचच ठरलं.. दहा मिनीटांचा तासभर कसा झाला ते मात्र कळलंच नाही, पण त्यांना भेटून-बोलून जे समाधान मिळालं त्याला तोडच नाही... त्यांच्याबद्दल जे काही ऐकून वाचून होते त्यावरून माझ्या मनातली त्यांची छबी फार वेगळी होती.. त्यांना प्रत्यक्ष पाहीलं तेव्हा कितीतरी दशकं रसिकांचे मनोरंजन करणारे..एका एका कार्टुनमधुन मोठा आशय मांडत, वैचारिक खाद्य पुरवणारे. महाराष्ट्रभर स्वतःचे लाखो-करोडो चाहते निर्माण केलेला एखादा कलावंत इतका साधा इतका जमिनीवरचा असेल असं वाटलंच नाही. आजवर फक्त ऐकून होते पण 'साधी राहणी उच्च विचार' मी त्या दिवशी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवले.  एखाद्या जुन्या आधारवडासारखा जुना-जर्जर पण खंबीर ठाम उभा असलेला वाडा. आजी-आजोबांनी गोष्टी सांगताना कल्पनेत दिसतो...

टाळीला थाळीची आस - भाग ४ (अंतिम)

Image
लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1 आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी पण फक्त नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्य माणसापेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येतं. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असतांना.. आपलीच झोळी फाटली असतांना देखील ती उरलेली लख्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. म्हणूनच राणीची कमाल वाटते, कामाचा अकाल पडलेल्या कोरोनाच्या काळात स्वतःचे पोट भरत नसताना, उपजीविकेचे माध्यम लॉकडाऊन होऊन बंद पडलेले असतांना दावणीला बांधून ठेवलेली तुटपुंजी सेविंग देखील काढून ती गरीबांमध्ये अन्नदान करत सुटते .... लॉक डाऊन सुरुवातीचा हा काळ होता, अचानक संकट ओढवल्याने अनेक माणसे हवालदिल झालीत. कुणाची नोकरी गेली, अनेकांचा छोटा मोठा व्यवसाय होता तो बंद पडला, रोजंदारीवर जाणाऱ्यांची मजुरी मिळणे बंद झाले, दोन वेळ खाण्याचेही वांद...

टाळीला थाळीची आस - भाग ३

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1 ४ जून २०१९ ची घटना, या घटनेने संपूर्ण नागपूरचा किन्नर समाज हादरला होता. किन्नर समाजात नावारूपाला येणाऱ्या .. शहरात बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्या आणि भविष्यात समाजाची पुढारी म्हणून आशा असणाऱ्या चमचम गजभियेचा भरदुपारी प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. तृतीय पंथियांचा त्यावेळचा सेनापती म्हणजे गुरु मानला जाणारा उत्तम बाबा तपन याने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील आणि किन्नरांची अपेक्षित उदयोन्मुख सेनापती तृतीयपंथी चमचम गजभियेची कळमनातील कामना नगरात तिच्या घरात घुसून हत्या केली होती. खरतर तृतीयपंथीयांमध्ये वर्चस्वासाठीचा आपापसातला संघर्ष हा काही नवीन विषय नाही. सर्वाधिकार असणारी गादी मिळवून नेतृत्व करण्याची इच्छा इथे अनेक जण बाळगून असतात.. त्यातून चालणारी गटबाजी, कुरघोड्या, राजकारण हे नेहमीचेच. आपल्यावर कोणी हावी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त किन्नर आपल्या गोटात राखून शक्तिप्रदर्शनाने नेतृत्व गाजवण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित आणि इच्छुक पुढारी करीत राहतात. त्यातून परस्परांवर हल्ले, हाणामाऱ्या, एकमेकांना धमक्या देणे इत्यादी राजरोसपणे घडत राहतं. प...

टाळीला थाळीची आस - भाग 2

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ? जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात,  हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये ...

टाळीला थाळीची आस - 1

Image
#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे'' आपण फोन केल्यावर ही सुरेख रिंगटोन कानावर पडते. ती ऐकतानाच त्यांच्याबद्दलचा पूर्वाग्रह आपोआप गळाल्यासारखा वाटू लागतो स्क्रीनवर 'राणी किंग' नाव झळकत असते.. राणी किन्नर (राणी ढवळे) फोन उचलतात. 'हा बोलो दीदी' अश्या अत्यंत नम्र आवाजात आपली विचारणा होते . बातमीसाठी भेटायचंय सांगीतल्यावर दोघींच्याही सहमतीने सोयीने भेटीची वेळ आणि ठिकाण ठरते.. खरतर नाही म्हंटले तरी जरा दबकतच आपण वेळेत जाऊन पोचतो, दिलेल्या पत्त्यावर पण जरा बाहेरच रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे राहतो, थोडी वाट पाहावी लागते .. तेवढ्याच वेळात मनात बरेच विचार येऊन जातात. तृतीय पंथीयांना असे पाहिले बोललो असलो तरी स्वतः त्यांच्या राहत्या जागी जाऊन प्रत्यक्ष भेटून बोलायची ही आपली पहिलीच तर वेळ असते. १५-२० मिनिटांचा वेळ जातो आणि राणी किंग त्यांच्या इतर ४ साथीदारांसह गाडीत...

मै तुम्हे फिर मिलूंगी..

Image
खरं सांगू का अमृता तू म्हणजे देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी एक अवर्णनीय जादू..ती जादू आम्ही सगळ्यांनी कधीतरी अनुभवली आहे किंवा ऐकीव तरी आहे, किंवा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून लालसेने किंवा कधीच न अनुभवल्याने एकदा तरी अनुभवायला मिळावी या अपेक्षेने.. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे, जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण अश्या आनंदाच्या अनुभूतीच्या ओढीने सतत तुझ्याकडे ओढले जात असतो. जगण्याचा खूप गुंता होत राहतो अधून मधून. आणि मग त्यापुढला बराच काळ गुंता सोडवण्यात निघून जातो. मनात हे असं काही काहूर माजतं कि, प्रापंचिक आन्हिकं, जबाबदाऱ्या निभावताना वेदना सहन करणाऱ्या भौतिक शरीराची कात भिरकावून द्यावीशी वाटते, कधीकधी तर बाईपण बोजड वाटायला लागतं..वाटतं परंपरेतून, संस्कृतीतून, प्रपंचातून, साचेबद्ध जगण्यातून या रोजरोजच्या धावधावपळीतून एवढंच काय या शरीरातूनही बाहेर पडावं; मोकळं व्हावं आणि दूर दूर जाऊन बघत राहावा आपणच घालून ठेवलेला घाट... जमलंच तर मोडून पाडावा, बंद करून घ्यावे परतीचे सगळे रस्ते.. हा आंतरिक मनाचा कल्लोळ शांतावताना का कुणास ठाऊक तू आठवत राह...

सरिता कौशिक -

Image
#महिलादिन #WomensDay #भेटलेलीमाणसे सरिता कौशिक मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होते. एका रिक्षाचालकाच्या मुलीला (वैशाली वानखेडे) वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मला आठवतं..तेव्हा मी पोलीस आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पाठवले होते. एका अत्यंत हुशार आणि होतकरू मुलीचे भावी डॉक्टर होण्याचे स्वप्न केवळ गरिबीमुळे,पैशांअभावी दुर्लक्षित राहू नये असे मनापासून वाटत होते...वैशालीबद्दल का कुणास ठाऊक खूप जिव्हाळा निर्माण झाला होता, तिला कुठून काही मदत मिळू शकेल का आपला काही हातभार लागू शकेल का म्हणून मी धडपडत होते. तेव्हा सरिता कौशिक ह्यांचा ह्याच विषयाला घेऊन वृत्तपत्रातून चाललेला पाठपुरावा मी वाचत होते...आपल्यासारखंच कुणीतरी या विषयाला गांभीर्याने घेताय म्हणून न पाहता न भेटता सरिता कौशिकबद्दल आपसूक एक ऋणानुबंध वाटू लागले होते. दारोदार भटकणाऱ्या वैशालीची स्टोरी सरिताने ज्या ताकदीने लिहिली त्यानंतर देशभरातून हजारो मदतीचे हात वैशालीसाठी पुढे आले. लिखाणात केवढी ताकद असते हे अश्याच अनेक उदाहरणांमुळे मग मनावर कोरत गेले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्या टीव्हीव...

आसमान छुती लडकीया !!

Image
आ पण एक्केविसाव्या शतकात जगतोय असे सांगतांना अनेकदा उर भरून येतो, हे संगणकाचं युग आहे..तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानानं आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. तरी या युगात अजूनही अनेक क्षेत्र पुरुषी मक्तेदारीचाच भाग असल्याचे दिसणे किंवा कुठल्याही कारणाने का होईना अजूनही स्त्रिया अनेक पैलूंना स्पर्शू शकल्या नाही तिथवर पोचूच शकल्या नाही, हे ऐकून विषन्न व्हायला होतं. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. पण गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय. तिच्या अंगी फार काळ ही ऊर्जा दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. महिलांच्या गोटात आनंद पेरणाऱ्या अश्याच दोन बातम्या याच वर्षात कानावर आल्या मे महिन्यात भावना कांत ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला ऑपरेशनल फाइटर पायलट बनली. जी युद्धाच्या मोहिमेवर जाण्यासाठी आता लढाऊ विमान उडवणार आहे .. तर मागच्याच आठवड्यात सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली, शिवांगी पाळत ठेवणारी विमाने म्हणजे...

लँड ऑफ होप - अंजा रिग्रेन

Image
बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, दलाई लामा इत्यादी प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहेऱ्यांना मागे टाकून डेन्मार्कस्थित सामाजिक कार्यकर्ता अंजा रिंग्रिन लोवेन जगातील प्रेरणादायक लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या 'उम' नावाच्या जर्मन भाषेच्या लोकप्रिय मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून गेला होता. अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवून शेकडो नायजेरिअन मुलांना जीवनदान देणाऱ्या त्यांच्यासाठी त्यांच्याच देशात राहून जीव ओतून कार्य करीत असलेल्या अंजाची या दिशेने जाण्याची जीवनकहाणी तिच्या सुरुवातीच्या काळापासून मी पाहत आले आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या प्रेरणा स्थानांमध्ये अंजाचे नाव माझ्या यादीत अग्रगण्य आहे. हो प आता मोठा झालाय... इतर कुठल्याही सामान्य मुलांएवढाच तंदुरुस्त आणि आनंदी दिसतो. कोण आहे हा होप ? ही एका अश्या दुर्दैवी लहान मुलाची कहाणी आहे ज्याला अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या बेगडी समाजाने मरणासन्न अवस्थेत रस्त्यावरून टाकून दिले होते. दारिद्र्यामुळे जगण्यासाठीचा करावा लागणार संघर्ष, अशिक्षितपणा आणि त्यामुळे समाजातील घसरलेली मूल्य या...