Posts

Showing posts with the label नाद-अनाहद

वाईब्ज -

Image
एक मराठी चित्रपट येऊन गेलाय ''अगंबाई, अरेच्चा'' या चित्रपटातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला येत असे. बरेचदा हे असे काहीतरी विचित्र माझ्याबाबत घडतं असं मला नेहमी फार स्ट्रॉन्गली वाटतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचे वाईब्ज माझ्यापर्यंत फार थेट आणि  प्रखरपणे पोचतात आणि ते फार स्पष्ट मला जाणवतात. म्हणजे पुढला व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, वरवर काहीही दाखवत असला तरी मनात काय भावना काय विचार बाळगतो.. समोर हसून बोलणारा आपल्या मागे गेल्यावर काय बरळतो ते आपोआप माझ्यापर्यंत पोचतं. याचे अनेक उदाहरण आहेत.. आश्चर्यात पाडणारे, अचंभित करून सोडणारे अनुभव आले आहेत. म्हणतात ना ''Actions can be seen, but vibes are felt; and what is felt stays longer than what is seen.'' म्हणजे एखाद्या नात्यात-मैत्रीत फार चांगलं चाललेलं असतं.. एखाद्या काळात त्या नात्यात काहीतरी जाणवायला लागतं. इथे आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं नाहीये, काहीतरी चुकीचं घडत असल्याचा आभास होतो. पुढला मात्र सगळं आलबेल असल्याचा दिखावा करण्यात अधिक चांगला वागू लागतो.. काळ पुढे सरक...

ऑफिस दारातलं झाड ..

Image
काही गोष्टी फार साध्या असतात पण का कुणास ठाऊक फार फार जिवापासच्या वाटतात. ओंजळीत साठवून ठेवाव्या कायमच्या इतक्या भावल्या असतात... भावल्या म्हंटल्यापेक्षा जीव गुंतलेल्या असतात. असे का व्हावे ह्याला मात्र उत्तरं नसत. असाच माझ्या मनातला एक हळवा कोपरा आहे, ऑफिस दारातलं झाड. फार चमत्कारिक वगैरे नसलं तरी विशेष मात्र आहे. त्याला सहसा पानं नसतातच, फक्त फांद्यांचा पसारा दिसतो.. पसारा कसला काळोख वारीत आकाशाकडे पसारलेला पिसाराच असतो जणू. त्याला सावली देता येत नाही.. उन्हाच्या काहिलीची वर्णी देणाऱ्या अगणित बाहू पसरून तो सताड उभा असतो.  त्याच्या आसपासची झाडं बहरून उमलून, पुन्हा कात टाकून, पुन्हा धारण केलेलं रूप मिरवीत डोलताना दिसतात. पण ऑफिस दारातलं झाड मात्र वर्षानुवर्ष सारखंच... पाना फुलांनी लगडलेली इतकी झाडे सोडून मलाही ह्याच झाडाची ओढ का लागावी हे एक गूढच आहे; आणि त्याहून अधिक ह्या वेड्या झाडाने सुद्धा माझ्यासारख्या वेगळ्या वेडपट वागण्याचे अनेकदा साक्षीदार होत राहावे हि कुठल्या ऋणानुबंधाची अंतःस्त अवस्था असेल हा प्रश्नच आहे.  मग रोजरोज हे असं होतं.. ऑफीसमधून रोज अंधार पडल्याव...

निघून गेलेली माणसे

Image
सदर- नाद-अनाहद ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता ! ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ...  कवी ग्रेसच्या या मार्मिक कवितेचं गाणं झालं नसतं तर कदाचित ती कित्येकांपर्यंत पोचलीच नसती. आपल्या जवळच्या कुणाचेतरी आयुष्यातून असं अचानक नाहीसं होणं...या वेदनेच्या तळाशी नेणारी ही कविता आहे. आपल्या माणसाच्या जाण्याचे ग्रेसांना जाणवले तसे दुःख सगळ्यांनाच जाणवतं खरतर, पण त्या भावना  ग्रेसांसारख्या उत्कटतेने प्रत्येकाला मांडता येतातच असे नाही. अशीच काही नाती असतात, रक्ताने जुळलेली, जवळची दिसणारी या नात्यांनी तशी लेबलं लावून घेतलेली असतात पण त्या नात्यांना जन्मतःच चिकटून आलेली कर्तव्य किंवा हक्क ते निभावू शकलेले नसतात, आयुष्यभर हवं असलेलं न देऊ केलेलं प्रेम, बालपणात घ्यावयाची.. न घेतलेली काळजी, गरजेच्या वेळी भासलेली त्यांची उणीव, संकटात न मिळालेला सहारा  ...एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि आशीर्वादासाठी डोक्यावर कधीच न ठेवलेला हात या गोष्टी मनात रुतून बसलेल्या असतात, या अपेक्षा असणाऱ्या नात्यातली माणसंं नाहीशी झाली की खूप आठवू...

प्लेटॉनिक लव्ह ..

Image
सदर - नाद-अनाहद आपण जागृत अजागृत अवस्थेत असतांनाही आपल्या मनाला भावणाऱ्या विषयांशी घट्ट जुळलेले असतो. रोज उल्लेख होत नसला तरी ते मनात सदैव तरळत राहतात आणि अचानक कुणीतरी संथ पाण्याला स्पर्श केल्यावर पाणी डुचमळतं आणि तरंग उठून ते विषय पुन्हा मनःपटलावर येऊन ठाकतात. अमृता -साहिर- इमरोजच्या विषयाएवढाच राधा-कृष्ण-मीरेचा किंवा कृष्ण-राधा-अनय हे विषय माझे अत्यंत आवडते विषय आहेत. रोज रोज बोलावे, वाचावे, लिहावे, चर्चावे असेच. 'एक सुरत दिवानी,एक मूरत दिवानी,एक प्रेम दिवानी,एक दरस दिवानी' हे असो किंवा  'सावरे की बन्सी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूही बदनाम' हे. अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या, चिंतन स्तरावर आणून सोडणाऱ्या काही कल्पनातीत भक्तीच्या अनोख्या रूपातील कहाणीच्या अध्यात्मिक अंगाचा शोध घेतांना आत्मपातळीवर प्रेमाच्या अनुभूतीची कंपन अनुभवायला लावणाऱ्या मीरेबद्दल मी पामराने काय लिहावे ... मला तर वाटतं मीरा लिहायची नसते, मीरा संवेदनेच्या तरल स्तरावर, अलगद शिरकाव करून अंतर्मनाच्या खोल तळाशी मिटल्या डोळ्याने ध्यान-साधनेच्या शारीरिक - मानसिक अवस्थेत जाऊन ठिबकत ठिबकत आत आत डोहात स...

केमिकल लोचा

Image
काही गोष्टी दिसतात, भिडतात...सरळ आत शिरतात अन् दबकून बसतात तिथंच..सलत राहतात. तगमग करतात जीवाची. धड आत राहत नाहीत अन बाहेरही पडत नाहीत. कुठूनही कसंही अगदी गर्दीतूनही अलगद निघून जाता यायला हवं.. काहीही न पाहता, न लावून घेता, न जुळवून-भिनवून घेता, न भिडता ...कुठेच,कुणीच, काहीच अडकून न पडलेलं. स्वच्छ- निर्मळ शरीर मन घेऊन. आयुष्य कसं ना आत बाहेर ट्रान्सपरंट असायला हवं. कसलंच ओझं नसलेलं आयुष्य जगणं अन सोडूनही जाणं सोप्प असतं मग .. असं सगळं कळतं पण वळत मात्र नाहीच. तो एमबीबीएसचा मुन्नाभाई 'केमिकल लोचा' आहे असं म्हणाला होता तेव्हा ती गम्मत वाटली होती. पण केमिकल लोचा काय असतो ते कळायला लागण्याआत आपल्या डोक्यातच केमिकल लोचा झाला हे लक्षात आले. गम्मतच वाटते कधीकधी, आणि प्रश्नही पडतो.. आपल्यालाच हे असं होतं का? मनात शिरलेले पण नकळत बुद्धीच्या कुठल्याश्या कोपऱ्यात वर्षानुवर्षे अडकून पडलेले, अडगळीतले असे कित्तेक जुने विचार त्याचा गुंता अजून सुटत नसतांना नव्या विचारांच्या धाग्यावर गाठी सोडवण्याचा प्रयत्न करत बसतो आपण. हे काही विचार पुसता आले तर किती बरे ? कोरी करकरकरीत पाटी काळीकभीन्न...
Image
मुळातून येऊन पुन्हा मुळाकडे जाण्याची ओढ संवेदनशील माणसांना खुणावत असली पाहिजे. निव्वळ मुळाकडे परत जाणे हा इतका उथळ विषय नाही. ह्या विषयाची व्याप्तीच अत्यंत खोल आणि गंभीर अशी आहे. सगळ्यांना आकलन होईल असा हा विषयही नाही.. पण तरीही या गोष्टीच आकर्षण मात्र अनंत काळापासून आहे ह्याची अनेक उदाहरणं दिसतात. मुळापर्यंत म्हणजे शुन्याकडे, जेथून निर्मिती झाली तेथवर म्हणजे त्या अनुभवाच्या अवस्थेपर्यंत जाणे असे काहीतरी किंवा त्याहून अधिक गहिरे वगैरे. "कथाकार दि.बा मोकाशी यांची 'जरा जाऊन येतो' नावाची एक कथा आहे. या कथेतील नायक गणेश ओक कुटुंब वत्सल असूनही एकदिवस अचानकपणे नाहीसा होतो. मग सर्व संबंधित मंडळी त्याचा अटीतटीने शोध घेतात. पण त्याचा शोध लागत नाही. खरंतर अवतीभोवतीच्या यंत्रप्रधान-अर्थनिष्ठ, एकसुरी, चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळून त्यातून सुटण्यासाठी, तुटलेपणातून वाचण्यासाठी काही क्षण गणेश 'औदुंबराला' जाउन आला असतो. औदुंबराला गणेशला गर्भाशयातील शांतता लाभते. निर्भर प्रसन्नता, अतीव शांतता, आणि स्वतःतल्या माणसाची ओळख त्याला तिथेच मिळते. चिरंतर प्रसन्नतेच्या शांततेचा ठेवाही...

आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतो तो ...

Image
आजा मै हवाओ में बिठा के ले चलूं .. तू हि तो मेरी दोस्त है .. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर येतोच तो आयुष्यात.. दुरून तुमची तगमग बघत अस्वस्थ होतो नकळत मदतीला धावून येतो. आधाराचा हात देतो, रुसलेले हसू परत खुलवतो, तुम्हाला अलगद त्या तात्पुरत्या आलेल्या कष्टातून संकटातून बाहेर काढतो अन हळूहळू पुन्हा आयुष्यातून नाहीसाही होतो. त्याचं आपल्या आयुष्यात तेवढंच औचित्य असतं. आयुष्यातून निघाला तरी आठवणीतून, मनातून मात्र निघू शकत नाही.. आयुष्य जगण्याचे अनेक धडे शिकवून, आयुष्याला नवे आयाम देऊन गेला असतो..मनात कायमची जागा ठेवून गेला असतो. तो ..'प्रेमरोग'च्या मनोरमाला भेटलेल्या देवधरसारखा असतो..नियतीच्या नाकावर टिच्चून, प्रस्थापितांच्या हुकूमास न जुमानता मनोरमाच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा.. किंवा 'सदमा'च्या सोमप्रकाशसारखाही  बालिशपणावरही निरपेक्ष निरलस प्रेम करणारा, सुरक्षा देणारा.  'इंग्लिश विंग्लिश'च्या शशीला अनोळख्या नवख्या देशात भेटलेल्या विंसेंट सारखा असतो तो कधी... तिच्या भांबावलेल्या आयुष्याला मार्गावर आणून सोडणारा, तिच्या दुर्गुणांना दुर्लक्षित करून तिच्या गुणां...