Friday 17 August 2018

सांगायचे होते मला जे
ते तुला कळलेच नाही
शब्द होते लाख ओठी
गीत पण जुळलेच नाही

स्पर्शातून का वेदनेचा
दाह हा नडतो कधी
कळवायचे होते तुला जे
कळले पण वळलेच नाही

पेटले विरहात अन
मज वाटले सुटले अता
शांत झाला ताप पण 
पोळले परी जळलेच नाही

का असा आलास अन
अर्ध्यातूनी गेलास तू
पाठ फिरता रे तुझी
मी जगी रुळलेच नाही

रश्मी मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...