सांगायचे होते मला जे
ते तुला कळलेच नाही
शब्द होते लाख ओठी
गीत पण जुळलेच नाही

स्पर्शातून का वेदनेचा
दाह हा नडतो कधी
कळवायचे होते तुला जे
कळले पण वळलेच नाही

पेटले विरहात अन
मज वाटले सुटले अता
शांत झाला ताप पण 
पोळले परी जळलेच नाही

का असा आलास अन
अर्ध्यातूनी गेलास तू
पाठ फिरता रे तुझी
मी जगी रुळलेच नाही

रश्मी मदनकर

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय