Friday, 17 August 2018

सांगायचे होते मला जे
ते तुला कळलेच नाही
शब्द होते लाख ओठी
गीत पण जुळलेच नाही

स्पर्शातून का वेदनेचा
दाह हा नडतो कधी
कळवायचे होते तुला जे
कळले पण वळलेच नाही

पेटले विरहात अन
मज वाटले सुटले अता
शांत झाला ताप पण 
पोळले परी जळलेच नाही

का असा आलास अन
अर्ध्यातूनी गेलास तू
पाठ फिरता रे तुझी
मी जगी रुळलेच नाही

रश्मी मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...