Posts

Showing posts from October, 2016

मिसाल-ए-हिम्मत - नादिया मुराद

Image
  ब्रि टनने इराकवर युद्ध लादले तेव्हा 'ती' केवळ 8 वर्षांची होती. देशावर संकट कोसळलंय पण आपल्यासाठी पुढे आणखी काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही तेव्हा तिला आला नसावा. 2014 - दिवसेंदिवस अस्थिर होत कोलमडून पडलेल्या इराकी शासन व्यवस्थेचा सोयीस्कर गैरफायदा घेत धर्माच्या भ्रामक कल्पनेवर जगणाऱ्या 'इसिस' सारख्या खुंखार आतंकवादी संघटनेने तेथे आपले पाय पसारायला सुरुवात केली. हळूहळू कित्तेक भागावर जोम बसवला, तेथील दुर्बल घटकांवर विशेषतः गैरमुस्लिम याझिदी वंशाच्या लोकांवर अत्याचार होऊ लागले. अनेक यजिदी देशोधडीला लागले, अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. अजूनही इराकमध्ये रक्ताचे पाट वाहतच  आहेत. ज्या लोकांनी जीव वाचवून पळ काढला ती नशीबवान ठरली, पण जी माणसं त्यांच्या तावडीत सापडली  ती एकतर जीवे गेली किंवा या अतिरेक्यांच्या क्रौर्याचे शिकार झाले. २०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना आयसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. अश्याच इसिसच्या तावडीत सापडलेल्या आणि नरकयातना भोगून परत आलेल्या एका 23 वर्षांच्या साहसी तरुणीची नादिया मुरादची हि चित्तथरारक कथा! ती ऐकतांना कुठल्याही पापभिरू...
काही नाण्यांची खणखण अन काही नोटांची फडफड खिशात होत राहावी म्हणून अक्ख आयुष्य वनवन करतो माणूस सगळं जग भटकून अखेर हातात उरतं काय ... तर निव्वळ ओंजळभर रान  

शब्द ..

मनाशी मनाचं बोलत राहतात शब्द इकडे तिकडे डोलवावेत तसे डोलत राहतात ..... गच्चं रानात आढळावी एखादी अनवट पायवाट आणि वाटेचे शेवटचे टोक शोधत अंधारात चाचपटत चालत जावे सरळ,  तसे चालत राहतात विचार रात्रभर बरसत राहतात, अनंत जुने संदर्भ आठवणीच्या सरींनी भिजून पाझरत राहतात आत बाहेर थेंब थेंबाने ओथंबून वाहू लागतात दूर कुठेतरी क्षितिजावर शुक्रतारा चमकत राहतो तसा मग एखादाच विचार गहिवरून येतो स्मृतीपटलावर तरंग उठवतो मनाच्या तळ्यात अन अखंड लुकलुकत राहतो तेथेच रात्रभर …. डोळे टक्क उघडे नजर छताकडे ध्यान शून्यात …. अपरिहार्य …. अटळ हा विचारांचा डोलारा…. मनभर रात्र सरते ... हळूच मग विचारांना पंख फुटतात,  अन भिरभिरतात ... शब्द मनाशी मनाचं बोलत राहतात इकडे तिकडे डोलवावेत तसे डोलत राहतात …शब्द !!

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||

बघ, वाच, ठरव ! माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन. 01) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या. 02) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार. 03) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय. वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर! 04) माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी काय...

Rj Shubham We will miss u ..

Image
'हाय नागपूर' अशी हाक मारणारा शुभम अकस्मात नाहीसा झालाय, त्याचा आवाज गहाळ झालाय आता तो कधीच ऐकायला येणार नाही हि बातमी सर्वच नागपूरकरांसाठी धक्कादायक आहे. सकाळी सकाळी 7 वाजता  ‘रेडिओ मिरची ९८.३’ ट्यून केले कि नागपुरी लहेजा असणारा एक बिंदास आवाज ऐकायला यायचा हा आवाज म्हणजे कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि सवयीचा भाग झाला होता. हा आवाज होता आरजे शुभमचा. 'लाईफ में हो झोलझाल तो शुभम को बोल डाल' असं ठणकावून सांगणारा 24 वर्षांचा शुभम, . रोज नागपूरकरांच्या हृदयाचे स्पंदने वाढविणारा शुभम इतक्या कमी वयात हृदयआघाताने जाईल अशी कल्पनाही करवत नाही. Shubham We will miss u .. शुभमच्या दुःखातून सावरण्याची ताकद त्याच्या परिवाराला दे प्रभू. इतकेच मागणे

महाश्वेतादेवी कि कविता

Beautiful lines by Mahadevi verma !           आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..! जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..! बाहर किलोलते बच्चों से, थोड़ी शरारत माँग लाना..! वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है.. तोड़ कर पहन आना..! लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो.. तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..! देखो, शाम बिछाई है मैंने, सूरज क्षितिज पर बाँधा है, लाली छिड़की है नभ पर..! प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है, घूँट घूँट पीना..! सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

सोंग

जगण्याचाच शाप झालाय मृत्यू पावलय सगळंच संवेदनेचा मृत्यू सहिष्णुतेचा मृत्यू जगण्यासाठी लागणाऱ्या संभावनेचा मृत्यू मृत्यू पावलाय माणूस माणसातलं माणूसपण मरण पावलंय जगणं जगण्यातलं मीपण विचार मेलेत, आचार मेलेत मेलेत सगळे संस्कार मेलीय ओळख, मेलाय संवाद उरलाय केवळ अंधार मेली मैत्री मेलंय प्रेम नातीही मृत्यू पावली मेला जिव्हाळा नि मेली माया उरलीय केवळ काया आता जगतायेत अर्थहीन सुरावटी रंगरंगोटी चढवलेला मुखवटा आयुष्य सरकत राहते  जिवंतपणाची खून शोधत उंची गाठता गाठता हरवलेली खोली शोधत उडण्याचे स्वप्न पाहत मरण्याआधीची कन्हती आत्मा त्याच त्याच वर्तुळात भटकत राहते वांझोट्या अपेक्षांचे बोचके कोंबत प्राणहीन शरीर सोंग वठवत राहते Rashmi  / 19/10/2016

कहो - अमृता प्रितम

वह कहता था, वह सुनती थी, जारी था एक खेल कहने-सुनने का। खेल में थी दो पर्चियाँ। एक में लिखा था *‘कहो’*, एक में लिखा था *‘सुनो’*। अब यह नियति थी या महज़ संयोग? उसके हाथ लगती रही वही पर्ची जिस पर लिखा था *‘सुनो’*। वह सुनती रही। उसने सुने आदेश। उसने सुने उपदेश। बन्दिशें उसके लिए थीं। उसके लिए थीं वर्जनाएँ। वह जानती थी, 'कहना-सुनना' नहीं हैं केवल क्रियाएं। राजा ने कहा, 'ज़हर पियो' *वह मीरा हो गई।* ऋषि ने कहा, 'पत्थर बनो' *वह अहिल्या हो गई।* प्रभु ने कहा, 'निकल जाओ' *वह सीता हो गई।* चिता से निकली चीख, किन्हीं कानों ने नहीं सुनी। *वह सती हो गई।* घुटती रही उसकी फरियाद, अटके रहे शब्द, सिले रहे होंठ, रुन्धा रहा गला। उसके हाथ *कभी नहीं लगी वह पर्ची,* जिस पर लिखा था, *‘कहो'*। -Amrita Pritam