रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वातावरणात पसरलेले धुके, हवेत पसरलेला गारवा आणि मनात भरून उरलेला आजवरच्या डिसेंबर आठवणींचा मंद मंद गंध. ''जाडो कि नरम धूप और आंगण में लेटकर....'' वगैरे आठवाचे दिवस. यंदाचे वर्ष मात्र अशा स्वप्नील वातावरणाचे नाही. यंदा ऐन थंडीत थरथरत्या हाताने अग्नी द्यावी लागलेल्या सासऱ्यांच्या स्मृतींचे तर ऐन डिसेंबरमध्ये अचानक झटकन निघून गेलेल्या दोन जिवापासच्या मैत्रिणीना आक्रंदत हाक मारत जाणाऱ्या क्षणाक्षणाच्या हिशोबाचे. गेल्या महिन्याच्या शेवटाला दीर्घ आजारपणाने सासरे सोडून गेले. मागे सोडून गेले भरलेपुरले कुटुंब आणि अनेक छोट्याछोट्या गोष्टी. त्यांची पुस्तके, वेगवेगळ्या रंगाच्या पेनांचे सेट, दैनिक हिशोब लिहिण्याची सवय असल्याने हिशोबाच्या भरलेल्या अगणित डायऱ्या.. त्यांचा पंचा, काही रुमाल, त्यांचे हौसेने शिवलेले सूट आणि पैसे ठेवायची पर्सपेक्षा जराशी मोठी अशी बॅग. सासुआई गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या आठवणीसाठी आम्ही सगळ्या घरातल्या स्त्रियांनी त्यांची ए...
Posts
Showing posts from 2024
मनातले काही
- Get link
- X
- Other Apps
सासरे जाऊन अर्धा महिना उलटला. खरतर ते गेले हे स्वीकारायला आणि आता ते कधीच दिसणार नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयारच नाही. समस्त कुटुंबाचा आधारवड होते ते. आमच्या कुटुंबातील जुन्या खोडांपैकी हे शेवटचे खोड होते. सासऱ्यांचे सगळे भाऊ, सासूआईंचे सगळे भाऊ याआधीच गेलेत, माझे व माझ्या जाऊचे वडीलही आधीच गेलेत आणि माझ्या नंदांचे सासरेही गेलेत. या सगळ्या घरादारातल्या स्त्रिया मात्र अजून खमक्या आहेत; नातवंडांच्या पतवंडांचा वाढीव संसार सांभाळत जगत आहेत. चाळीशीपार मध्यवयात पोचलेल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एकेक करत निघून जाते आहे; एक पिढी आता संपते आहे. दुसर् यांसाठी जगत स्वत:चे जीवन संपवणारी पिढी, मान मर्यादा वडीलकीची आब राखणारी, कमी पैशातही तडजोड करून, तरीही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, सोबत घेऊन चालणारी पिढी आता संपते आहे. ते होते.. आहेत तोपर्यंत आपण अजूनही लहान असण्याचे आतून येणारे फीलिंग कायम आहे.. ही डोक्यावर हात ठेवून असणारी माणसे जसजशी जाऊ लागतात तसतशी ही फीलिंग मंदावत जाणार. जबाबदारीची जाणीव वाढत जाणार आणि हळूहळू आपल्याला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे; हे विधिलिखित टळणारे नाही.. पण...
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...
- Get link
- X
- Other Apps
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले. इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला. मी म्हणाले, अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती बाग बघा कशी ओकीबोकी झाली परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली दादा म्हणाले ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका.. तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे... तशी माझी नजर पारखी आहे बरे निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे हिऱ्यांना पेहेलू पाडल्याशिवाय चमक येते होय? आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ?? वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो.. आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो. काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते उभे राहून झाड थकले...
चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -
- Get link
- X
- Other Apps
खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे. या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे. गिफ्ट म्हणजे त...
जगातील सर्वात घाणेरडा माणूस-अमो हाजीचा आंघोळ केल्याने मृत्यू -
- Get link
- X
- Other Apps
#IntrestingStory #worldsdirtiestman #Iran सध्या थंडीचे दिवस आहेत आणि फेसबुकवर अनेकदा अनेकजण आंघोळ न करण्यावरून जोक करताना दिसतात. म्हणजे या दिवसात रोज रोज आंघोळ केली नाही तरी फार फरक पडत नाही अशी जवळ जवळ मान्यता असल्यासारखे लोक बोलतात. कुणी गमतीने म्हणतात आज आंघोळीची गोळी घेतलीय. कुणी म्हणतात अंगावर चार थेम्ब शिंपडून घ्यावे. बर्याच लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ देखील अनुभवली असेल जेव्हा आंघोळ करणे हे सर्वोच्च प्राधान्य नव्हते. त्याहून महत्वाची कामे होती, आजारपण वगैरे. आंघो ळीशिवाय काही दिवस चालूही शकत असेल पण जेव्हा तुम्हाला एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आंघो ळीशिवाय होतो तेव्हा गोष्टी थोड्या चिंताजनक आणि दुर्गंधीयुक्त होऊ लागतात, आणि अश्यात एखाद्याने वर्षभर आंघोळ केली नाही तर काय होईल ? अनेक वर्ष ? किंवा अगदी 67 संपूर्ण वर्षे? #अमोहाजी या नावाने ओळखल्या जाणार्या इराणी माणसाची ही जीवनपद्धती होती, ज्याला “जगातील सर्वात घाणेरडा माणूस” म्हणूनही ओळखले जाते. अमो हाजी (20 ऑगस्ट, 1928 - 23 ऑक्टोबर, 2022) यांनी आपले संपूर्ण आयुष्य इराणमधील देझ गाह गावात व्यतीत केले. त्याचे...