Posts

Showing posts from December, 2020

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे  कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात  आणि कवितेतच माणसं शोधलीस  माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा ..  इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास ..  माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस ..  अरे कविता अश्रू पुसत नाही तिच्याजवळ खांदा नसतो रडायला  ती कुशीत घेऊन जोजवत नाही  मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही  कवितेला आई होता येत नाही  तिला बहिणीची माया देता येत नाही  प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही  तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही .. तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास  ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास  तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते  आत आत हेलावून क्षणभर सुखावते  सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते..  तिच्याकडून घेता येत नाही रे काही  तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी तिला सतत देत रहावं लागत असतं.. सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या न...
 आला आला रे डोंबारी त्याच्या हाती काठी दोरी पोरीसंगे तो दाखवतो फुटक्या जगण्याची लाचारी दोर टांगतो आकाशाला   तालावर पोरं नाचवतो टिचकीभर या पोटासाठी जीव दावणीला आंथरतो एकाएका पैशासाठी हात पसरतो दारोदारी  चिंध्यांचा संसार मांडतो उघड्यावरती भर बाजारी किती यातना सोसत जातो भोग कशाचे मोजत जातो सोस कशाचा नसे बापुडा बिनबोभाटा भोगत जातो रश्मी पदवाड  २३.११.२०