Posts

Showing posts from June, 2019

आईपण कसं स्वार्थी असतं ना ..

तसंतर पुर्वीपासूनच आपल्या काही सवयी असतात त्या हळूहळू स्वभाव होत जातात. जित्याची खोड म्हणतात तशा. रस्त्यानं जाताना मध्येच पडलेले दगड उचलून कडेनं फेकून येणं. शाळेत जाणारी मुलं रस्ता क्राॅस करायचा प्रयत्न करताना दिसली की थांबून रस्ता क्राॅस करून देणं. आपल्या येण्याजाण्याच्या रस्त्यात कुणी गरजू दिसलं तर वाटेत शक्य असेल तिथपर्यंत लिफ्ट देऊन सोडणं. अपघात झालेला दिसला की थांबून मदत करणं मी कित्तेकदा भर उन्हात माझी पाण्याची बाटली किंवा कुणी भणंग दिसलं तर डबाही देऊन देते गरजुला.. उन्हाळ्यासाठी चपला अन हीवाळ्यासाठी स्वेटर वर्षभर गोळा करत राहते. पुर्वी हे स्वानंदासाठी असायचं.. मनात स्वार्थाचा लवलेशही नसायचा. पण लेक जसजसा मोठा होतोय पदरा बाहेर वावरू लागला आहे  तेव्हापासूनच ह्याचा मोबदला मिळावा असं वाटू लागलंय आणि ह्याची जाणीव झाली तेव्हापासून वाईटही वाटतंय पण 'आई' असण्याची भावना जागृत होते अन स्वतःच स्वतःला माफ करून घेते. हल्ली रस्यात मध्ये पडलेले दगड बाजुला करताना वाटतं माझा लेकही कधीतरी या रस्त्याने जाणार आहे. त्याच्या सायकलीखाली असा कुठला दगड येऊ नये. तो पोचण्याआधीच क...

ऑफिस दारातलं झाड ..

Image
काही गोष्टी फार साध्या असतात पण का कुणास ठाऊक फार फार जिवापासच्या वाटतात. ओंजळीत साठवून ठेवाव्या कायमच्या इतक्या भावल्या असतात... भावल्या म्हंटल्यापेक्षा जीव गुंतलेल्या असतात. असे का व्हावे ह्याला मात्र उत्तरं नसत. असाच माझ्या मनातला एक हळवा कोपरा आहे, ऑफिस दारातलं झाड. फार चमत्कारिक वगैरे नसलं तरी विशेष मात्र आहे. त्याला सहसा पानं नसतातच, फक्त फांद्यांचा पसारा दिसतो.. पसारा कसला काळोख वारीत आकाशाकडे पसारलेला पिसाराच असतो जणू. त्याला सावली देता येत नाही.. उन्हाच्या काहिलीची वर्णी देणाऱ्या अगणित बाहू पसरून तो सताड उभा असतो.  त्याच्या आसपासची झाडं बहरून उमलून, पुन्हा कात टाकून, पुन्हा धारण केलेलं रूप मिरवीत डोलताना दिसतात. पण ऑफिस दारातलं झाड मात्र वर्षानुवर्ष सारखंच... पाना फुलांनी लगडलेली इतकी झाडे सोडून मलाही ह्याच झाडाची ओढ का लागावी हे एक गूढच आहे; आणि त्याहून अधिक ह्या वेड्या झाडाने सुद्धा माझ्यासारख्या वेगळ्या वेडपट वागण्याचे अनेकदा साक्षीदार होत राहावे हि कुठल्या ऋणानुबंधाची अंतःस्त अवस्था असेल हा प्रश्नच आहे.  मग रोजरोज हे असं होतं.. ऑफीसमधून रोज अंधार पडल्याव...

निघून गेलेली माणसे

Image
सदर- नाद-अनाहद ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता ! ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ...  कवी ग्रेसच्या या मार्मिक कवितेचं गाणं झालं नसतं तर कदाचित ती कित्येकांपर्यंत पोचलीच नसती. आपल्या जवळच्या कुणाचेतरी आयुष्यातून असं अचानक नाहीसं होणं...या वेदनेच्या तळाशी नेणारी ही कविता आहे. आपल्या माणसाच्या जाण्याचे ग्रेसांना जाणवले तसे दुःख सगळ्यांनाच जाणवतं खरतर, पण त्या भावना  ग्रेसांसारख्या उत्कटतेने प्रत्येकाला मांडता येतातच असे नाही. अशीच काही नाती असतात, रक्ताने जुळलेली, जवळची दिसणारी या नात्यांनी तशी लेबलं लावून घेतलेली असतात पण त्या नात्यांना जन्मतःच चिकटून आलेली कर्तव्य किंवा हक्क ते निभावू शकलेले नसतात, आयुष्यभर हवं असलेलं न देऊ केलेलं प्रेम, बालपणात घ्यावयाची.. न घेतलेली काळजी, गरजेच्या वेळी भासलेली त्यांची उणीव, संकटात न मिळालेला सहारा  ...एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि आशीर्वादासाठी डोक्यावर कधीच न ठेवलेला हात या गोष्टी मनात रुतून बसलेल्या असतात, या अपेक्षा असणाऱ्या नात्यातली माणसंं नाहीशी झाली की खूप आठवू...