ऋतू कोवळा येऊन जाता आठवतो तू
ऋतू सोहळा आटपतांना आठवतो तू

सहा ऋतूंच्या स्मरणांच्याही पडता गाठी
ऋतूत एक होऊन ऋतू मग आठवतो तू

उधळून देता इंद्रधनुचे रंग नभाशी
तांबडं फुटता आकाशी बघ आठवतो तू

पाऊस धारा खिडकी मधुनी ओघळताना
तुषार उडता गाली अलगद आठवतो तू ...

तू आठवता मनात भरते घन व्याकुळ
नजरेमध्ये ओल दाटता आठवतो तू   ...

रश्मी मदनकर
१३.०३.१८ 

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय