Posts

Showing posts from April, 2019
मनाला मनाचा कुठे थांग आहे जिवाला दिलासा कसा सांग आहे कुणाला असे भान जगण्यास येथे जयाचे तयाच्या पगी टांग आहे नसे भावना आज नाती फुकाची दगड पूजन्या देवळी रांग आहे तुझी प्रीत चढते नशा ही गुलाबी जशी साथ ऐसी जणू भांग आहे कसे सांग विसरू ग आई दिले तू न फेडू शकत मी असे पांग आहे तुझे वागणे मुखवट्याआड वाटे मला वाटते फार नाट्यांग आहे -रश्मी पदवाड मदनकर 
Image
मुळातून येऊन पुन्हा मुळाकडे जाण्याची ओढ संवेदनशील माणसांना खुणावत असली पाहिजे. निव्वळ मुळाकडे परत जाणे हा इतका उथळ विषय नाही. ह्या विषयाची व्याप्तीच अत्यंत खोल आणि गंभीर अशी आहे. सगळ्यांना आकलन होईल असा हा विषयही नाही.. पण तरीही या गोष्टीच आकर्षण मात्र अनंत काळापासून आहे ह्याची अनेक उदाहरणं दिसतात. मुळापर्यंत म्हणजे शुन्याकडे, जेथून निर्मिती झाली तेथवर म्हणजे त्या अनुभवाच्या अवस्थेपर्यंत जाणे असे काहीतरी किंवा त्याहून अधिक गहिरे वगैरे. "कथाकार दि.बा मोकाशी यांची 'जरा जाऊन येतो' नावाची एक कथा आहे. या कथेतील नायक गणेश ओक कुटुंब वत्सल असूनही एकदिवस अचानकपणे नाहीसा होतो. मग सर्व संबंधित मंडळी त्याचा अटीतटीने शोध घेतात. पण त्याचा शोध लागत नाही. खरंतर अवतीभोवतीच्या यंत्रप्रधान-अर्थनिष्ठ, एकसुरी, चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळून त्यातून सुटण्यासाठी, तुटलेपणातून वाचण्यासाठी काही क्षण गणेश 'औदुंबराला' जाउन आला असतो. औदुंबराला गणेशला गर्भाशयातील शांतता लाभते. निर्भर प्रसन्नता, अतीव शांतता, आणि स्वतःतल्या माणसाची ओळख त्याला तिथेच मिळते. चिरंतर प्रसन्नतेच्या शांततेचा ठेवाही...

आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतो तो ...

Image
आजा मै हवाओ में बिठा के ले चलूं .. तू हि तो मेरी दोस्त है .. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर येतोच तो आयुष्यात.. दुरून तुमची तगमग बघत अस्वस्थ होतो नकळत मदतीला धावून येतो. आधाराचा हात देतो, रुसलेले हसू परत खुलवतो, तुम्हाला अलगद त्या तात्पुरत्या आलेल्या कष्टातून संकटातून बाहेर काढतो अन हळूहळू पुन्हा आयुष्यातून नाहीसाही होतो. त्याचं आपल्या आयुष्यात तेवढंच औचित्य असतं. आयुष्यातून निघाला तरी आठवणीतून, मनातून मात्र निघू शकत नाही.. आयुष्य जगण्याचे अनेक धडे शिकवून, आयुष्याला नवे आयाम देऊन गेला असतो..मनात कायमची जागा ठेवून गेला असतो. तो ..'प्रेमरोग'च्या मनोरमाला भेटलेल्या देवधरसारखा असतो..नियतीच्या नाकावर टिच्चून, प्रस्थापितांच्या हुकूमास न जुमानता मनोरमाच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा.. किंवा 'सदमा'च्या सोमप्रकाशसारखाही  बालिशपणावरही निरपेक्ष निरलस प्रेम करणारा, सुरक्षा देणारा.  'इंग्लिश विंग्लिश'च्या शशीला अनोळख्या नवख्या देशात भेटलेल्या विंसेंट सारखा असतो तो कधी... तिच्या भांबावलेल्या आयुष्याला मार्गावर आणून सोडणारा, तिच्या दुर्गुणांना दुर्लक्षित करून तिच्या गुणां...

कालजयी कुमारगंधर्व

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) कालजयी कुमारगंधर्व रियाज लेखिका - स्वाती हुद्दार इंदुर उज्जैन रस्त्यावर वसलेलं टुमदार देवास. कलेची आराधना करणाऱ्या कलावंतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं आणि म्हणूनच देवाचं वास्तव्य असलेलं देवास. नर्मदेच्या सुजलाम प्रवाहानं माळव्यातल्या भुमीच्या या तुकड्याला सुफलाम केलं. देवासच्या भुमीला संगीताची मोठी परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध संगीतकार बंदे अली, शेवटचे मोठे बीनकार बाबूखॉं , संगीत सम्राट खॉंसाहेब रजब अली खॉं, पुढे कुमार गंधर्व. आणि असे कितीतरी संगीतज्ज्ञ या भुमीनं दिले. चामुंडा टेकडीकडे जाणाऱ्या उतारावरचं एक सुरेल घर भानुकुल. नित्य संगीत आराधनेत रमलेलं. ऋतूचक्राची जाणीव करून देणारी घराभोवतीची वृक्षराजीही स्वरांच्या घोसांनी लगडलेली. त्या वृक्षांवरच्या पक्ष्यांचा चिवचिवाटही एखाद्या बंदीशीसारखा. भानुकुलमधल्या बंगईच्या पितळी कड्यांची किणकिणही सुरेलच. एखादी रागिणी छेडल्यासारखी. कारण साक्षात सात स्वरांचं वास्तव्य या घरात होतं. 30 जानेवारी 1948 एका गंधर्वाची पावलं देवासच्या भुमीला लागली आणि ही भुमी अधिकच संगीतमय झाली. 8 एप्रिल 1924 रोजी बेळगाव इथं जन्मलेला...