Posts

Showing posts from 2017

सोन्यासारखा जीव !!

भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना , .पाणी पाणी जीव होतांना  काळवंडलेली-कृश पारो...  कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात  पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कण कण शोधणारी.... हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.

आमच्या संवेदना न मरो ...

Image
नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्तेक ठिकाणी लहान मुले भिक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा जखमा झालेले अंग..वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलीकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले हि माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भिक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली, स्वतः पळून आलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?? कि रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही? कित्तेक आई-बाबा याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत.. पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना ..  https://www.facebook.com/rashmi.madankar/posts/1618222901531916?pnref=story # बच्चेबचाओ # Save...

#बच्चेबचाओ #SaveChildBeggars

# बच्चेबचाओ # SaveChildBeggars गेल्या १०-१२ दिवसांपासून फेसबुक अकाउंट डिऍक्टिव्हेट केले होते... त्या दिवशी अस्वस्थ होऊन ज्या कारणाने गेले आज त्याच कारणाने परत आले. एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणार काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं....बाराएक दिवसाआधीची गोष्ट असेल रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठ 'मुख्य' पोलीस स्टेशनही आहे. ७ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत पूर्ण कट झालेला हात दाखवत पंधराएक वर्षाचा मुलगा पुढे आला, हिला औषधाला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती दहा-वीसची एक नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर येत राहिला. काय झालं असेल.. का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ६ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेल...

बाप

#बाप गेला कि मुलांना बाप खूप खूप आठवू लागतो .. तो खरा बापमाणूस असेल तर आठवतोच ... पण आयुष्यभर स्वतःच्याच विश्वात जगलेला बाप असला कि जास्तच आठवतो. बापानं आयुष्यभर न देऊ केलेलं प्रेम बालपणात बापानं घ्यावयाची.. न घेतलेली काळजी गरजेच्या वेळी भासलेली बापाची उणीव संकटात न मिळालेला बापाचा सहारा  ... एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि बाप म्हणून डोक्यावर कधीच न ठेवलेला हात बाप गेला कि हे अधिकच गडद होत जातं...खूप आठवतो न मिळालेला हक्काचा बाप प्रेम आधार सगळं बाहेर शोधता येतं..  ..बाहेर मिळत नाही तो ..'बाप' बापाला ऑप्शन नसतं... बाप असला तरी आणि गेला तरी बाप मिळत नाही दुसरा. अख्या जन्मात बापाचं प्रेम न मिळणं आयुष्यभऱ्याचं मोठं दुःख होऊन बसतं बाप गेल्यावर ते अधिकच सलत राहतं....जन्मभर बाप्पांनो आपल्या विश्वात हरवू नका ... मुलांचा बाप हिरावू नका मुलांना वेळ द्या, प्रेम द्या.... त्यांना त्यांच्या हक्काचा बाप द्या. #बाबांचीआठवण :(

कथांची व्यथा..

तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघता येत नाही  आणि अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा मांडताही येत नाही मनात खूप दाटल्याहेत तुला सांगावयाच्या गोष्टी कोंबल्या गेल्या आहेत..काचताहेत न बोलताच गिळून टाकलेले किती हुंदके .. कित्तेक शब्द पचतही नाही आणि ओकवतही नाही. अडकले आहेत मनात-बुद्धीत, घश्यातही आत आत चर्वण करीत राहिले ... तरी त्यांना कंठ फुटत नाही अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही आपणच जन्म घातलेले त्या कथेतले काही पात्र त्या पात्रांना स्वप्नांचे क्षितिज दाखवून आपणच वाढीस लावले होते त्यांना पंख फुटाण्याआत तू भिरकावून लावलेस अन निघून गेलास ते भटकताहेत अनवाणी - तडफडताहेत तुझ्या येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय त्यांचा त्यांना मुक्ती हवीय रे ... कसं सांगू त्यांचे हाल आताशा बघवत नाही अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही आता मलाही वाटू लागलंय तू यावंसंच एकदा ... फक्त एकदा ये अन स्पर्शाने पुनर्जीवित कर त्यां स्वप्नांना स्वप्नातील विरक्त पात्रांना अन तृप्ततेचा श्वास देऊन पुन्हा समाधानाने मरणाला मार्ग मोकळा करून दे ये अन मोक्ष मिळवून दे त्यांना ...

अंतर

मागे गेलेल्या काळाच्या कुठल्याश्या त्या क्षणी एकाच जागी उभे असूनही वाढत गेले अंतर तुझ्या माझ्यातले कुठल्याश्या एका नात्याने जुळले असूनही पायापासून जमिनीवर पसरत गेलेल्या लांबच लांब होत जाणाऱ्या सावल्यांसारखे लांब होत राहिलो आपण .. वेगवेगळे होत गेलो .. सोबतीने चालत असूनही सोबत नसणारे दोन वेगवेगळ्या समांतर मार्गाने पुढे चालत राहायचं आलेला दिवस ढकलायचा नाते जपतोय कि ओढतोय आपण .. कुठला क्षण होता तो दोघांच्या मध्ये लांब आडवी रेष ओढणारा रेषेइतकेही अंतर निर्माण व्हावे अशी परिस्थिती निर्माण व्हावी हे प्राक्तन का यावे तुला नाही वाटत का खंत कशाचीच ती रेष पुसायलाही किती लांबचा प्रवास करत मागे चालत जायला लागणार आहे हातातला सुटलेला हात धरायला परतीच्या रस्त्यावरही सोबत चालायला लागणार आहे दोघांचीही तयारी हवी पार केलेला प्रवास सोडून द्यायची प्रवास महत्वाचा कि साथ हे दोघांच्याही बाबतीत सारखेही असायला हवे साथ महत्वाची असेल तरच आलो त्या रस्त्याने पुन्हा सोसवत निघण्याची तयारी करता येईल हे सगळं करत आलोच त्या मध्याला तर ... ? सोडला होतास हातातून हात तो क्षण खोडून टाकता येईल का रे पुन्ह...

उदात्तीकरण भाग - २ - सोशल मीडिया आणि असहिष्णुता

Image
का ही दिवसांआधी सोशल नेटवर्किंग वरून फिरणारी एक व्हिडीओक्लिप घरोघरी दारोदारी चर्चेचा विषय ठरली होती. ''अभ्यास घेतांना शुल्लक प्रश्नासाठी मारणारी आई'' ( ती आईच होती का? असा प्रश्न विचारू नये ते गृहीतच  धरायचं आहे ).....तर, फार फार बिचाऱ्या मुलाला ( मूल बिचारं होतं का? :O  अहो काय विचारताय .. हा काय प्रश्न झाला होय ? मूल बिचारच असतं...सरळमार्गी, आईचं सगळं सगळं ऐकणारं, अजिबात बदमाशी न करणारं, खोड्या-बिड्या नावालाही न करणारं अन अजिबात जराही शिक्षा करण्यास पात्र नसलेलं असंच मूल ते होतं असंच गृहीत धरायचंच आहे) मारणारी  हि आई फार फार 'क्रूर' होती ( दोन चापट्यात हे कसं कळालं हे विचारूच नये .. ते पण गृहीत धरायचंच आहे)   तर अश्या बिचाऱ्या मुलाच्या क्रूर आईची कहाणी शिव्यांच्या वाखोलीत गावभर-शहरभर-जगभर पसरली. .. त्या आईचा थाटात शालजोडतला उदो उदो झाला सगळीकडे...त्या एकट्या बिचाऱ्या लेकरासाठी कित्तिजन कळवळले वगैरे ... आणि मला काय काय आठवलं म्हणून सांगू ( हो हो मी पण पाषाणहृदयीच आहे ... हळहळ व्यक्त नाही केली म्हणून ना .. बरं... मानलं ) तर प्रथम कोण आठवली सांगू ... . श्य...
कुणीतरी लिहीत असतं.. मन रितं करायला, मोकळं व्हायला..कल्पकता म्हणून . आवड म्हणून..कलाकृती साकारायला वगैरे वगैरे असा तो/ती लिहीत असते स्पष्ट किंवा पुसटसं.. पारदर्शक किंवा गूढ असं.. उत्सुकता शमवणारं किंवा प्रचंड वाढवणारं.. लिहिणारा लिहीत जातो आतलं आतलं खंदून काढत जातो वाचकाच्या मनात ते भरत राहतं .. आत आत खोलात शिरत राहतं हा लिहून मोकळा.. तो वाचून गंभीर, स्तब्ध, भावुक वगैरे म्हणजे काय, पैसे खर्च करून एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक घ्यायचे आणि आपण आपले बसायचे खिसा मोकळा आणि कंठ भरून घेऊन .. भावुक बिऊक होऊन हे चांगले लेखक बिखक ना वाइट असतात फार ...

पत्र - ५ आतल्यामास्तरीणबाई - नात्यांचा गुंता

परवा सुवर्णा भेटली मार्केटमध्ये, सुवर्णा हो .. ती नाही का फेसबुकवर फेमस असलेली. चारेक हजारतरी मित्र असतील तिचे. तशी लिहितेही भन्नाटच...साऱ्या जगावर सूड उगवणारं.. फोटो कसले छान छान टाकते. दिवसाला कित्ती पोस्ट आणि कित्ती कित्ती फोटो. किती लोकं निव्वळ तिच्या वॉलवर पडलेली असतात...कित्येकांना तिच्याशी नाते जोडावे वाटते कित्येकांना मैत्री करावी. तिला भेटायची ओढ जशी सर्वांना तशी मलाही होतीच जरा .. तशी तिची माझी हि पहिलीच भेट...पण  भेटून जरा दचकायला झालं...बोलणंही उदासवाणं वाटलं तिचं.. एकटी होती ती फार एकटी ... ४००० मित्र असणारी गर्दीत वावरणारी व्यक्ती इतकी एकाकी .... विचार करून करून रात्रभर झोपच लागली नाही आणि पहाटे पहाटे मास्तरीण बाई आल्याचं मग भेटायला. सखे, माणसं सोबत दिसणं आणि माणसं आपली असणं यात फार फरक आहे राणी. गोतावळ्यात दिसणारी सगळी माणसं आपली असतातच असे नाही.....आणि या गोतावळ्यात न दिसणारी आपली नसतातच असेही नाही. आपल्या अवती भोवती दिसणारी माणसं मनाने किती जवळ असतात आपल्या याचा अंदाज त्यांच्या बाह्य रुपावरुन लावताच येत नाही....गर्दीतली माणसं हरवलेली असतात कुठेतरी, कशाच्यात...

हळूच स्फुरते कविता .. !

अश्रूंचा सागर आटला कि कंठात हुंदका दाटला कि सुखाचा सदरा फाटला कि हळूच स्फुरते कविता बिविता हळवं कातर मन ढवळून आतलं आतलं हलवून बिलऊन वेदनेचा बांध फुटला कि हळूच स्फुरते कविता बिविता मनाची घालमेल थांबली कि विरहाची दुःखे लांबली कि तगमग तगमग वाढली कि हळूच स्फुरते कविता बिविता जगणं बिगण फुलवून नितळ भावना खुलवून शब्द शब्द कुरवाळले कि हळूच स्फुरते कविता बिविता गर्द आभाळ निवून जावा पाऊस थोडा पिऊन घ्यावा मृदगंध पसरून वीरला कि हळूच स्फुरते कविता बिविता .. Rashmi M.   

मुक्ती ..

Image
दु सरा वरीस उजाडला, यंदाच्या पारी दगा देणार न्हाई, कारल्याचा वेल लगलगून भरून येईन अन मागच्या वक्ताचं समदा गाऱ्हाना धुतला जाईन .. म्हणून मुक्तानं आस सोडली नोहोती .. गेल्या वक्ताले सोयाबीन कहाडला अन् बजार झाल्यावर माहेराहून धनधान धाडला, तवा माह्या बाबानं शेतातल्या माळावरच्या  कारल्याच्या जराश्याक बियाबी धाडल्या व्हत्या. पुरा ऐवज कपाटात कोंबून ठेवताले कारल्याच्या बियावरून 'भिक्कार माहेर' म्हनूनस्यान वाकडं तोंड दाखवू दाखवू सासूबाईन मले केवढाला दुषना लावला होता. मामंजींनंत बाप्पा, सप्पा बिया देल्त्या टाकून पडवीतल्या कोपऱ्यात....जाता जाता पच्च्चकन! पिचकारी मारली तंबाकूची टमरेटवर, आन खाकरत निंगून गेलते चकाट्या हाकाले ... तिच्या डोळ्यात भस्सकन पानीच आलन  ... पहासाठी व्हतच कोण ? गडी तं गेल्ता सहरात..नोकरीपाण्याचा बंदोबस्त कराले. अर्ध्या रातचाले तिनं जाऊन बिया वेचल्यान अन पदराले गाठ बांधून ठेवून देल्त्या. समदी रात्र इचाराचाच भूत सवार रायला तिच्या डोस्क्यावर. गावचा हिरवाकंच मळा, कारल्याचा चौफेर साजरा मांडव, घराचं मोकड-ढाकळं आंगण आन बिनमायच्या लेकीचा सुखाचा संसार पाहा...

झुंडीची झुंझ आणि जात-धर्माच्या अस्मिता !!

Image
धार्मिक अस्मितेची गोंदणं आम्ही आणखी किती वर्ष स्वतःच्या मेंदूवर गोंदून घेणार आहोत हा न सुटणार प्रश्न मला मागल्या काही आठवड्यापासून जरा जास्तच भेडसावू लागला आहे. शिक्षणानं माणसाच्या विचारांची कुंपण अधिक खुली व्हायला हवी, बऱ्या वाईटाचे धडे मिळाल्याने मन मोठी होऊन संवेदनेच्या जाणिवा जागृत व्हायला हव्या खरतर. पण होतंय काहीतरी विपरीतच. शिक्षणानं वैचारिक ब्लॉकेज खुलली नाहीच पण वेगवेगळ्या अस्मितेच्या नावाखाली आम्ही स्वतःला अधिकच जखडून घेतो आहोत, भोवतालची कुंपण शिथिल करायची सोडून ती अधिक करकचून बांधून घेतो आहोत आणि एवढे कमी कि काय त्याचा अभिमानही बाळगत हिंडतो आहोत. जातीच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी 'लिबरल' हा शब्दप्रयोग बुद्धिवंतांमध्ये फेमस झाला होता. लिबरल म्हणजेच उदारमतवादी, पण आजच्या मतवाद्यांमध्ये खरंच तेवढं विचारांचं औदार्य आहे का हा संशोधनाचा वेगळाच विषय ठरेल. तर लिबरल होता होता आम्ही कधी संकुचित विचारधारेच्या विळख्यात अडकलो कळलेच नाही आणि त्याचे परिणाम बघून भोगुनही आम्ही आमच्यात बदल करून घ्यायला तयार नाही. मागल्या आठवड्यात समूहानं घडवून आणलेल्या धार्मिकतेच्या दांभिकतेचं...

मला ना एकदा नदी व्हायचंय..!!

Image
मला ना एकदा नदी व्हायचंय.. !! प्रवाही. अवखळ तरीही निस्सीह, शांत. संयमी..जन्मापासून हजारो मैल प्रवास करत न थकता न दमता चैतन्याचे तुषार उडवत.. मार्गात येणाऱ्या मोह माया त्यागत.. एखाद्या ऋषीकन्येचा संयत तेजस्वी भाव लेवून, जुनाच वेष धारूण, वेग आवेगही पांघरून. एकाच दिशेनं, जुन्याच वळणानं लयबद्ध ताल धरत, डोंगर दर्या कपारी पार करत, एखाद्या रणरागिणीप्रमाणे खोल दरीत स्वतःला झोकून देऊनही पुन्हा निश्चयाने कणखर होणारी. अविश्रांत धावत प्रवाहात स्वतःला सामावून घेत अधीक प्रगल्भ होत असोशीनं वाहत राहणारी. सदैव त्याच जागी भेटुनही तीथे न साठणारी रोज दिसणारी तरीही नवी भासणारी..लावण्य सुंदरी...भर दिवसा तळपत्या सुर्याची किरणं आत आत शोषून घेणारी..संध्याकाळी तांबड्यात न्हावून निघणारी अन चंद्राची शितल काया अंगभर लपेटून दिवसभराचा दाह शमवून घेणारी..पिढ्यांच्या रितीभाती..प्रथा परंपरांना मोठ्या मनानं पोटात घालून मायेचा डोंगर पेलणारी..गर्भातल्या जिवांना अंगाखांद्यावर खेळवत.. जागवणारी-जगवणारी ममतामयी मानीनी..सर्व विश्वाचा रंग तिच्यात येऊन मिसळूनही ती तीचा रंग मात्र बदलत नाही. रंगुनी रंगात सार्या रंग माझा व...

आतल्यामास्तरीणबाई ... पत्र - 3

# आतल्यामास्तरीणबाई आतल्या मास्तरीण बाई - रश्मी पदवाड मदनकर पत्र - 3 होऊन जाऊ दे .. परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं का वाटलं बरं, स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच पन्नास वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेलं पुरण सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं .... अरेरेरे हे एवढं आलंच मनात अन मास्तरीण बाई जाग्या झाल्या .... ********************************** सोन्या आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्यांच निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद ना...

जाणिवांची रात्र !

आसमंतभर पसरून वाट बघत राहिली, दमली अन अखेर कलली संध्याकाळ दिवसभर मनभर साठलेली उन्हं उतरणीला तळमळत राहिली पश्चिमेला फुटलेल्या तांबड्यात न्हाऊन निघण्याची इच्छा विरली काळोखात दिवेलागणीला तेवत राहण्याचे स्वप्नही भंगत गेले संध्यासमयी. अन अंधारून आले सारे ... दिन दिन रात्र रात्र पालटत राहिले  पुढे चंद्रही कले कलेने आवस होत गेला  नेणिवेचा एक कोपरा उजळावा म्हणून जाणीव झाली अन् कित्तेक भावनांची अशीच रात्र होत गेली ?? रश्मी मदनकर
निरंतर वाचन सुरू असतं..मिळेल तिथे मिळेल तसं, दिवसभरात कितीतरी विषय वाचनात येतात..एखादा प्रगल्भ विषय भावनिक स्पंदनं निर्माण करतो. एखादा संवेदनशील लेख अंतर्बाह्य हलवून जातो. एखाद वाक्यातली कोटीही विचार करायला भाग पाडते... एखादी कथा अंतर्मुख करते. एखादी कविता घोळत राहते मनात. त्यातून अनेक विषय सुचत जातात..आतल्या आत वैचारिक आंदोलनं..लाटांवर लाटा..आवर्तनं.. एकावर एक गाळ साचतो, अख्खा लेख तयार होतो..आतल्या आतच घुसमटत राहतो.. .. काठाशी येतो..बाहेर पडायला तडफडत राहतो...तगमग तळमळ !!!!! वेळ हवा असतो एकांत हवा असतो..उतरवून टाकायचं असतं सारं शब्दात, मोकळं व्हायचं असतं...नाही जमत...दिवसभरात धावधाव धावून दमून भागून शिणलो कि लेखणीशीच हक्कानं प्रतारणा करता येते. लेखणी रूसत नाही ...लेखणी समजून घेते. विचार मात्र हटखोर असतात. आपण हात टेकले की सुचलेले विचार मान टाकतात... मग पुन्हा नवा दिवस उगवतो, नवे वाचन सुरू होते.... नवे मनाचे मांडे मांडले जातात .. पुन्हा खेळ सुरु होतो. काही विषय काही विचार लिखाण होण्याआधीच असे संपुष्टात येतात...कत्तल होतात...गाडले जातात. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक मिथ' आहेय .....

पत्र - १ - आतल्या मास्तरीण बाई

Image
जीवाचा आकांत होतो कधी कधी. नेमकं काय हवंय आपल्याला हेच कळत नाही. सगळं असूनही अस्वस्थता पिच्छा का सोडत नसेल बरं ? प्रश्न आलाच होता डोक्यात कि आतल्या मास्तरीण बाई येऊन ठाकल्या. अलगद हसल्या अन बसल्याच सांगायला, म्हणाल्या  : मने.. प्रश्न जगायचं कसं हा असतो आणि आपण अगदी जन्म झाल्यापासून जिवंत कसं राहायचं हेच शिकत असतो. जगायचं कसं हे शिकलोच नाही तर जिवंत राहण्याला अर्थच काय ?? नुसतच तगत राहायचं ..मरण ढकलत राहायचं पुढे पुढे? ... कि मग समरसून जगायचं मरण येईपर्यंत न धास्तावला न थांबता ... आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात ... अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही आपल्याला नेमकं काय आवडतं, काय आवडत नाही, काय केलं कि आनंद मिळतो हे आधीच स्पष्ट कळलं तर सगळं कसं निवडून घेता येईल ना गं? खर सांगू ते कळतही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाला फार फार काय लागतं? पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं ग कसंही,कुठ...

पत्र - 2 - आतल्या मास्तरीण बाई

Image
आज सहज मोकळीक मिळाली म्हणून माझ्या आवडत्या खिडकीत येऊन बसले..खुश होते पण एकांत हवा होता, तंद्री लागली. चिंतन करता करता अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरु झाली आणि माझ्याच प्रश्नांच्या गुंत्यात मी गुंतत गेले..थोडी असहज होऊ लागले. अस्वस्थता वाढली. असे व्हावे आणि आतल्या मास्तरीण बाई अवतरणार नाही असे होणे नव्हतेच..त्या आल्या अन न लिहिलेले एक पत्र माझ्या हातात ठेवले. **************************************** ए वेडे, एखादा काळ मधून मधून येत असतो आयुष्यात जेव्हा गोतावळा नकोसा होतो. स्व-सहवास आवडायला लागतो. काही गुंते, काही बोचके असतात साठलेले त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ द्यावा असं जाणवायला लागतं. मग आपण सारं या ओढून घेतलेल्या एकांतात उकलून पुढ्यात मांडून बसतो. कधी कधी या गाठोड्यातून किती प्रश्न बाहेर पडतात ना? कधीचे, कुठले-कुठले पत्ता नसतो. गाठोड्यातून पुढ्यात आणि पुढून मनात आलेले हे प्रश्न कुणा कुणाला विचारावे असं वाटत राहतं. पण फक्त विचारावं वाटतं, म्हणजे मला असे प्रश्न पडतात, पडू शकतात ही अशी माहिती म्हणून पुढल्याला द्यावी वाटते. प्रश्नांना अपेक्षित अशी उत्तर नकोच असतात. ...
(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) कथा हा एक प्रवास असतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा. मधल्या काळात जे घडते ते कथानक असते. प्रत्येक लेखकाची लेखनशैली वेगळी असते, असावी. कथेची मांडणी कशी करावी, कशी असावी? या बद्धल रूढ नियम नाहित. कथा सहजगत्या उलगडत गेली तर ती वाचकांपर्यंत लवकर पोहचते. काही कथा वेगळ्या धाटणीच्या असतात, त्या पहिल्या वाचनात लवकर कळत नाहीत. त्यामधील ओळीमागचं, न लिहलेलंही समजून घ्यावं लागतं, काही जागा वाचकांसाठी सोडायच्या असतात. वाचकांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यात रंग भरता येतात. एकच कथा अनेक वाचकांना वेगवेगळी अनुभूती देत असते. आकाशातल्या ढगांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसतात, तसंच हे. कथा लेखन हे उस्फुर्त अंत:प्रवाही असावे. शब्दांचा कच्चा माल घेवून कथेची इमारत जरूर उभी राहू  शकते पण ती साहित्यकृती होवू शकत नाही. इकडची वीट तिकडे, तिकडचा दगड इकडे करून कथेचा तोल सावरला जाईलही पण ते शब्दांचे बांधकामच ! एका तंद्रीत कविता सुचते. एका तल्लीनतेत चित्रकार रेषांचे फटकारे मारत चित्राला जिवंत करत असतो. समाधी अवस्थेत जावून मुर्तीकार छिन्नी हाथोड्याने मुर्ती घडवत असतो. लेखनाचेही तसेच आ...
Image
काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, माग े सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि एक क्लिक.. गाणी सुरु होतात काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. गीतातल्या एखाद्या शब्दाने खपली पडते तर एखाद्या ओळीने विस्मरणात गेलेला माणूस आठवणीत जागा होतो…एखाद्या आलापात आपण भूतकाळाचा प्रवास करून येतो..… गाण्याची एखादी अर्थपूर्ण ओळ कानी पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं... रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. एक एक सूर स्पर्शत जातो, तन्मयतेचा षड्ज लागतो. जुने भास होऊ ल...

तिघींची घोडदौड साकारतेय 'वूमनविश्व'ची वाटचाल

Image
प्रत्येक पिढीत होणारी स्थित्यंतरे ही त्या-त्या जनुकांवर प्रभाव टाकणारी असतात. आजच्या पिढीच्या अपेक्षा अन्‌ आकांक्षा बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. अन्‌ याच अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत असतात. परिस्थिती, बदलत जाणारे वातावरण आणि त्यानुसार घडत जाणारी माणसे उमलत्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आजच्या तरुणाईपुढे अमर्याद संधी, तेवढीच स्पर्धेमुळे निर्माण झालेली आव्हाने आहेत. ती पार पाडायला वेळ मात्र मर्यादित. मग निव्वळ धक्कातंत्र सुरु असतं. एकमेकांशी तुलना करून मार्क्‍स आणि ग्रेडच्या गणिती चक्रव्युव्हात गरगर फिरत राहणं. वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सुद्धा ठाम माहिती नसणारे किशोरवयीन मुलं-मुली पालकांनी बोट दाखवल त्या दिशेने प्रवाहात वाहत राहणं, एवढच पसंत करतात. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्या सांस्कृतिक गरजा काय हे कळेस्तोवर पाणी डोक्‍यावरून गेलेलं असतं. मग काय..? आहे त्यात समाधान मानून केवळ तडजोड करत जगणे इतकंच काय ते हाती उरतं. आपण कोणत्या विषयाचे शिक्षण घेतोय तेवढेच फोकस करून त्यातच करीअर करायचे एवढेच चौकटीतले ध्येय राखून आजच्या त...

शब्दांचे पसारे !

Image
एकांतातल्या शब्दांना कंठ असतो त्या शब्दांना डोळे असतात ओघळणारे त्या शब्दांना मन असते. भावनाही असतात  पण मिळत नाहीत ते कान त्यांना ध्येय असते पण गंतव्य नसते... ज्यांना ऐकवायचे त्यांच्या पर्यंत जायचे रस्ते नसतात दारं बंद करून टाकली असतात सगळीच म्हणून तर ते एकांतात फुटतात धुसफुसतात... मुसमुसतात, क्वचित किंचाळतातही कंठातून बाहेर पडले कि त्यांचे प्राक्तन त्यांना कुठवर घेऊन जाईल सांगता येत नाही असं म्हणतात, शब्दांना मरण नाही. ते हवेत विरत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत अवकाशाच्या पोकळीत तरंगत राहतात ... भटकत राहतात एकांतातल्या शब्दांच्या आरोळ्या कुठवर ?? ऐकून घेणारे कान अन समजून घेणारे मन मिळत नाही तोवर ज्या शब्दांना आस मिळते त्यांची वाफ होते ... पाऊस होऊन बरसते, मातीत विरते उरलेल्यांचे दगड होतात.. कुणी ग्रह म्हणतात .. कुणी तारे न काढता न गिळता आलेले आवंढेच तर असतात सारे जिकडे तिकडे शब्दांचेच पसारे  !!! रश्मी पदवाड मदनकर 23.6.17

“SMITA AND I” : Deepti Naval

Image
सतत धावपळीच्या आयुष्यात असणाऱ्या ह्या दोन्ही अभिनेत्री एकदा विमानतळlवर एकमेकींना भेटल्या, दीप्ती स्मिताला म्हणाली हे काय आयुष्य आहे सतत धावपळ , आयुष्य जगण्याची काही दुसरी रीत असली पाहिजे स्मिता थोडा विचार करून ठामपणे म्हणाली "नाही" त्यावर दीप्ती नवल ने केलेली ही इंग्रजी कविता “SMITA AND I” : Deepti Naval Always on the run Chasing our dreams We met each time At baggage claims VIP lounges Check- in counters Stood a while together Among gaping crowds Spoke, unspoken words Yearning to share Yet afraid, afraid Of ourselves All around us People cheering, leering And we, like spectacles Amidst all the madness Trying to live a moment Of truth A glance, a touch A feeling to hold on to And move on… The last time we sat together Waiting for a flight I remember I’d said, ‘There must be another way Of living this life!’ For a long time You remained silent Then, Without blinking Without turning Said, ‘There isn’t’ Today You are gon...

मी आहे ना सांग?’

कुठेतरी  वाचलेली एक सुंदर कविता मी आहे ना सांग?’ मुग्धमानसी | ’आताच दमू नकोस फार जायचं आहे लांब’ म्हण एकदा तरी हात धरून मला ’थोडं थांब’ म्हण... माझं गुर्‍हाळ तक्रारिंचं कुरकुर करु लागलं की जवळ बसवून मला फक्त ’ऐकतो मी तू सांग’ म्हण... कधी चिडेन जगावरती कावून जाईन, त्रासून जाईन हसून माझी धग सोसून ’जगाच्या नानाची टांग’ म्हण... कधी माझ्या डोळ्यांमधून निसटून जाईल काहितरी तेही पकडून शिताफीनं ’याचा पत्ता सांग’ म्हण... मी हसताना उधाणलेले मी रडताना गहिवरलेले अश्रू माझे टिपून ठेव अन् ’जपून ठेवलंय वाण’ म्हण... मोठेपण सोसणार नाही पायांत त्राण उरणार नाही तेंव्हा कुशीत घेऊन मला ’बाळ माझी छान’ म्हण... फार काही मागत नाही माझी तहान भागत नाही हरलेच कधी मी तर हसून ’मी आहे ना सांग?’ म्हण...
Image
आयुष्यच एक कोडं आहे. कधीही न उलगडणारं. किंवा उलगडतांनाच अधिक गुंतत जाणारं.. आयुष्यभर चाललेली सगळी वनवन कशासाठी असते सांगू ...कशाचातरी शोध...कशाचा, कशासाठी..माहीती नाही..अस्वस्थता सतत..रात्रंदिवस.. कुठेतरी आत आत एक भिती समांतर ...जी दोरी पकडून पुढे सरकतोय त्याचं शेवटचं टोक लागलंच नाही तर...सापडलोच नाही आपणच आपल्याला..तर?? प्रश्नाला उत्तर हवंय हे शंभर टक्के माहीती आहे..पण प्रश्न काय आहे हेच कळले नाही तर....उत्तरं शोधता येतात पण प्रश्नच हरवली तर??अंधारात चाचपडतोय आपण...स्वतःल ा शोधतोय...आपण ओळखतो का स्वतःला..जाणतो?? होय..हा उगाचाच confidence   स्वतःला स्वतःचे नेमके चित्र साकारता येत नाही..हे चित्र शोधण्याचा प्रयत्न मग आतबाहेर सुरु होतो... आरश्यातल्या प्रतिमा न्याहाळत स्व चा शोध लागत नाही....आपल्या आवडीतून-निवडीतून आपणच आपल्याला उमगतो काय...कुठेतरी झळकतो काय ..हे बघण्याचा प्रयत्न चालू असतो.... बरेचदा आपल्या अस्तित्वाचे अंश अंश सापडत जातात.....पण आपल्याला हवा असलेला नेमका 'मी' सापडायची कवायत मात्र जन्मभर संपत नाही.....त्याचा कानोसा ऐकायला येतो आणि आभास तेवढे होत रा...

झेंडा...

..(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) 2004 मध्ये काही महिने योगेशच्या(माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले.           आम्ही सहा जण ह्या छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो. पॅटचा पार्टनर एरिक(तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता.त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ...       माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात.. पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं!आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला .     टेबलवर  रंगलेल्या गप्पांच्या ओघात  मी एरिकला विचारले कि -तो काय काम करतो ? ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले  तो म्हणाला, "मी स्टेशनवर झेंडा दाखवतो".... मी आणि योगेश नि:शब्द, कारण  प...

शितल तुझं चुकलंच..निषेध तुझ्या निर्णयाचा

21 वर्षाच्या तरूण मुलीनं आत्महत्या करावी आणि आपण तीला 'बिचारी' ठरवून सरकारला दोष देऊन चर्चा घडवून आणाव्या..तिची एक प्रतिमा तयार करावी मग सहानुभूती, प्रसीद्धी....आणि काय काय.. पुन्हा एकदा आत्महत्यांचे उदात्तीकरण करतोय आपण.....कोणी कितीही चुकीचं असलं तरी आत्महत्या करणं समर्थनीय कसं असू शकतं.. तरूण वयात संघर्ष न करता कल्टी मारणं कसकाय पटतं राव...तरूण वय, अंगात रग असताना गरीब बापाचा हातभार बनून मेहनत करून त्याचे पांग फेडणं जास्त यथोचीत ठरले नसते काय?? 'लग्न' हा जिवनमरणाचा प्रश्न आहे काय ?? आयुष्याच्या कसोटींना तोंड देण्याचे सोडून मरण जवळ करणं जास्त सोपा मार्ग निवडणं नाहीये का ? हा असा पळपुटेपणा आदर्श ठरवायचा का?? सरकार लाख चुकीचे असेल..समाज वाईट असेल नाहीतर रूढी चूकीच्या असतील पण यातलं काहीच 'आत्महत्या'करण्यापेक्षा चूक असू शकत नाही..आपण कशाचं समर्थन करतोय?? हे असं चुकीचं करूनही जन्मभर न मिळालेली सहानुभूती, प्रतीष्ठा..प्रसिद्धी आपल्याकडून त्यांना मिळणार असेल तर आणखी तरूण त्याकडे आकर्षित नाही होणार का??चूकीला चुक न म्हणता त्यांना 'बिचारे' पालूपद लावून सोशल ...
मुलाच्या सुस्थितीतल्या केवळ तोकड्या झाल्या म्हणून कित्तेक दिवसापासून आटाळ्यावर ठेवून दिलेल्या चपला, सॅंडल, बूट वगैरे गेल्या महिन्याभरापासून बाहेर काढून, स्वच्छ करून ठेवल्या आहेत. रोज एक-दोन जोड पॉलिथिनमध्ये डिक्कीत टाकून घेऊन जायच्या आणि जाता-येता निखाऱ्यासारख्या धगधगत्या उन्हात पाय भाजत चालणारी गरजू मुलं दिसली कि त्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं. गम्मत अशी कि फक्त एक जोड देता आला आतापर्यंत. तेव्हापासून म्हणजे जवळ जवळ मागल्या 12 दिवसांपासून रोज वेगवेगळ्या रस्त्याने जाऊनही गरजू मुलं दिसत नाहीत. जी दिसतात त्यांच्या पायात पायताणं असतात. पण हि मुलं शोधण्याच्या नादात रस्त्यावरून चालत जाणाऱ्या जरा हलाकीची परिस्थितीत दिसणाऱ्या सगळ्या माणसांच्या पायाकडे आपसूक लक्ष जाऊ लागले आहे. यात भरदुपारी सामानाचा भारा, भाजीच्या टोपल्या डोक्यावरून वाहून नेणाऱ्या खेड्यातल्या बायका, ढोरं चरायला घेऊन जाणारे गुराखी, रोडसाईड्ला बसलेली काही विक्षिप्त मंडळी, हमाल, रिक्षा चालक अशी मोठी (अगदी शब्दशः मोठी) माणसेच विनाचप्पल या आग ओकणाऱ्या उन्हात भरदुपारी पाय भाजत चालताना दिसतायेत.मन चरचरतं पाहून. त्यातल्या त्यात मुलं...

बघ जमतंय का?

नुसताच वरवर चाचपडतोस चेहेऱ्यावरच्या खाणाखुणांत भाव शोधतोस रीतभात जपून भौतिकाचे पडसाद उमटलेला मुखवटा असतो रे चेहेरा हा दिसणारा चेहेरा विसरावा लागेल अंतःकरण वाचावं लागेल जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल बघ जमतंय का ? खरे भाव समजायचेत तर आत्म्याच्या गर्भाला स्पर्षाव लागेल मनाच्या अथांग अंधाऱ्या डोहात खोल खोल उतरावं लागेल स्वतःला विसरून माझ्यात सख्या रे अलगद हरवावं लागेल जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल बघ जमतंय का ? आत असतील काही अडगळी जपलेल्या जुन्या जखमांचे व्रण, दुखऱ्या भावनांचे पापुद्रे ठसठसणारे ओले ओघळते ... जराश्या धक्क्याने भळभळणारे जाणिवांचा डोह खंगाळून काढून  घट्ट जीर्ण दार उघडाव लागेल आत्मीयतेची फुंकर घालत हळुवार जीव ओतावा लागेल हळवे मन जिंकावे लागेल...  जोखीम तर आहेच ... पत्करावी लागेल बघ जमतंय का ? काठावर बसून नुसतेच न्याहाळण्यापेक्षा अंतःकरणाच्या गाभ्यात भावना शोधल्या तरच दिसतील .. तुझ्यात गुंततील भावभावनांच्या कल्लोळातही मग तुझ्याच मनात घर करतील पण ते होण्यासाठी ....
जातांना तो म्हणाला.. 'तुला मोकळं केलंय, जा जग तुझं जिनं … तू तुझं बघून घे' ती थांबली गहिवरली, मुसमुसली सावरून, डोळ्यातले अश्रु आवरून दोन्ही हाताचे तळवे समोर धरून म्हणाली " हे हात बघतोस ? तुझ्या हाती दिले तेव्हा तू घट्ट धरलेस तुझ्या मुठीत…. अन ओढून घेतलेस मिठीत ती मुठ म्हणजे माझं जग होतं आणि ती मिठी म्हणजेच जगणं …तुझ्यावर प्रेम कमी होऊ नये हि काळजी घेणं हेच एवढ्या वर्षात 'मी माझं बघणं' मुठ सोडलीस मिठी तोडलीस तरी तुलाही मोकळं होता येणार नाही …… माझ्याशिवाय तुला सख्या रे बघ जगताच येणार नाही
उसे आईलाइनर पसंद था, मुझे काजल। वो फ्रेंच टोस्ट और कॉफी पे मरती थी, और मैं अदरक की चाय पे। उसे नाइट क्लब पसंद थे, मुझे रात की शांत सड़कें। शांत लोग मरे हुए लगते थे उसे, मुझे शांत रहकर उसे सुनना पसंद था। लेखक बोरिंग लगते थे उसे, पर मुझे मिनटों देखा करती जब मैं लिखता। वो न्यूयॉर्क के टाइम्स स्कवायर, इस्तांबुल के ग्रैंड बाजार में शॉपिंग के सपने देखती थी, मैं असम के चाय के बागानों में खोना चाहता था। मसूरी के लाल डिब्बे में बैठकर सूरज डूबना देखना चाहता था। उसकी बातों में महँगे शहर थे, और मेरा तो पूरा शहर ही वो। न मैंने उसे बदलना चाहा न उसने मुझे। एक अरसा हुआ दोनों को रिश्ते से आगे बढ़े। कुछ दिन पहले उनके साथ रहने वाली एक दोस्त से पता चला, वो अब शांत रहने लगी है, लिखने लगी है, मसूरी भी घूम आई, लाल डिब्बे पर अँधेरे तक बैठी रही। आधी रात को अचानक से उनका मन अब चाय पीने को करता है। और मैं...... मैं भी अब अक्सर कॉफी पी लेता हूँ किसी महँगी जगह बैठकर। 😊 (Poet - Bhaskar (Not sure))
बुज़ुर्गों के कमरे से होता हुआ सीढ़ियों से गुज़र के , दबे पाँव छत पे चला आया था मैं , मैं आया था  तुमको जगाने चलो भाग जायें , अंधेरा है और सारा घर सो रहा है, अभी वक़्त है सुबह की पहली गाड़ी का वक़्त हो रहा है !! अभी पिछले स्टेशन से छूटी नहीं है ! वहाँ से जो छूटेगी तो गार्ड इक लम्बी सी कूक देगा !! इसी मुँह अंधेरे में गाँव के "टी-टी"से बचते बचाते , दोशालों की बुकल में चेहरे छुपाये निकल जायेंगे हम मगर तुम बड़ी मीठी सी नींद में सो रही थीं,दबी सी हँसी थी लबों के किनारे पे महकी हुई , गले पे इक उधड़ा हुआ ताँगा कुर्ती से निकला हुआ, साँस छू छू के बस कँपकपाये चला जा रहा था , तर्बे साँसों की बजती हुई हल्की हल्की, हवा जैसे सन्तूर के तार पर मींढ लेती हुई, बहुत देर तक मैं सुनता रहा बहुत देर तक अपने होंठों को आँखों पर रख के तुम्हारे किसी ख़्वाब को प्यार करता रहा मैं, नहीं जागीं तुम और मेरी जगाने की हिम्मत नहीं हो सकी लौट आया !! सीढ़ियों से उतर के बुज़ुर्गों के कमरे से होता हुआ मुझे क्या पता था कि मामू के घर से उसी रोज़ , वह तुमको ले जायेंगे तुम्हें छोड़कर ज़िन्...

किताबें झाँकती हैं...

Image
किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से बड़ी हसरत से तकती हैं महीनों अब मुलाकातें नहीं होती जो शामें उनकी सोहबत में कटा करती थीं अब अक्सर गुज़र जाती है कम्प्यूटर के पर्दों पर बड़ी बेचैन रहती हैं क़िताबें उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है जो कदरें वो सुनाती थी कि जिनके जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधरे-उधरे हैं कोई सफा पलटता हूँ तो इक सिसकी निकलती है कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो अल्फ़ाज़ जिनपर अब कोई मानी नहीं उगते जबां पर जो ज़ायका आता था जो सफ़ा पलटने का अब ऊँगली क्लिक करने से बस झपकी गुजरती है किताबों से जो ज़ाती राब्ता था, वो कट गया है कभी सीने पर रखकर लेट जाते थे कभी गोदी में लेते थे कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुक्के किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा वो शायद अब नही होंगे!! *गुलजार*🍃

आओ की कोई ख्वॉब बुने...!

शेखर पाटिल यांचा एक आवडलेला लेख... *************************** आज साहिरचा जन्मदिवस. आपले आयुष्य समृध्द करणार्‍यांपैकी हा एक. कविता आणि गीत या दोन्ही प्रकारांमध्ये समान ताकदीने सृजन करणारा अन् याहूनही महत्वाची बाब म्हणजे आयुष्य आपल्याच धुंदीत जगणारा एक मनस्वी, कलंदर. उर्दूतील ‘तरक्कीपसंद’ अर्थात प्रगतीशील लेखकांच्या चळवळीत साहिरचे नाव कधी काळी आघाडीवर होते. अर्थात विचारांमधील मार्क्सवाद हा त्याच्या सृजनात नक्कीच उमटला तरी तो पोथिनिष्ठ नव्हता. प्रचारकी थाटाचे काव्य कधी त्याने स्त्रवले नाही.  मात्र ‘जला दो इसे, फुंक डालो ये दुनिया...’ सारख्या जळजळीत शब्दांत शोषितांविषयीचा कळवळा त्याच्याइतक्या समर्थपणे कुणी मांडलाही नाही. त्याने जीवनाचे विविध रंग आपल्या सृजनातून इतक्या कुशलतेने चित्रीत केलेय की कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. गुरूदत्त हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले एक स्वप्न होते. त्यांच्या यशात साहिरचा वाटा कुणी नाकारू शकणार नाही. साहिरच्या जन्मदिवसालाच ‘जागतिक महिला दिवस’ असल्याचा योगायोगही किती अफलातून आहे बघा. पुरूषाच्या जीवनात स्त्री ही माता, भगिनी, प्रेयसी, सहचारिणी आदी...

खुणा

सख्या तू येतोस ... तुझे सळसळणारे चैतन्य शिंपत फिरतोस उत्साहाच्या चंदेरी सुमनांची पखरण करतोस मनमोकळे हसतो ... जीव गुंतवत रमतो अन मन भरण्या आत निघून जातो जातांना तुझ्या येण्याच्या सगळ्या खुणा वेचून नेतोस तुझ्या असण्याच्या खुणा मात्र तिथेच सांडून जातोस तुझ्या असण्यात माझ्या गुंतण्याच्या खुणा लपत नाहीत आणि ... तू येऊन गेल्याचा अंदाजही लोकांचा मग चुकत नाही. 

कुंपण

माझ्या क्षितिजात चंद्राची शीतल काया तेवत असते अंगणात चंदनफुलांचा शिंपावा  गार गंधित वाऱ्याची झुळूक तुला स्पर्शाला हवी असते म्हणून तू  दुपारचे उन्ह अंगभर लपेटून रात्री भेटायला येतोस मला तू पौर्णिमा म्हणतोस उन्हात कोरड्या करपून गेलेल्या तुझ्या भावनांना माझ्या ओलाव्याची उब हवी असते तुझा हात हाती घेते पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरते तू शांत होत हळव्या कुशीत विसावतो मला तू माया म्हणतोस... तुझे बाळबोध उमाळे कुशीत रिचवताना माझ्या मातृत्वाचा पान्हा फूटतो तू तुझे उदरभरण करून घेतोस तृप्तीची ढेकर देऊन कुशीतच गाढ झोपी जातो..... तू मला पूर्णा संबोधतो... पुन्हा उजाडतं... तुला उडायचं असतं दूर गगनात तुझ्या स्वप्नांचं क्षितिज गाठायचं असतं तुझ्या पंखांवर मी माझं आभाळ धरते झेप घेऊन थकलास कि तुला विश्रांतीला पंखांखाली ओंजळही सरकवते तू मला धारिणी म्हणतोस.... जगणं-जागवणं, रुजवणं - निभावणं. तुला देत राहते अखंड  ... तुझे तप्त उन्ह मनभर गोंदून रापल्या जीवाचा दाह सोसून कोंडून घेते आत वरवरच्या कायेवर चंदनाचा लेप देते... शृंगार करते रात्री तुझ्या गरजेची शीतलता दिवसभर पेरत जाते.  मला तू स्वरू...

प्रजासत्ताक आणि स्त्रीस्वातंत्र्य

Image
प्रजासत्ताक दिन जवळ आलाय. १९५० पासून देशात अधिकार आणि कर्तव्य याशिवाय स्वातंत्र्य या विषयांवर प्रचंड उहापोह होत आलाय. अनेक आंदोलनं, संघर्ष उलथापालथी याच काही कारणास्तव घडत गेले.. संपूर्ण स्वातंत्र्य हि अजूनही एक कल्पनाच वाटते. स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट झाली तर इतर अनेक प्रश्नांना आपोआप वाचा फुटू शकेल पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर कधीच स्पष्ट देता आलेले नाही. आपलं आत-बाहेर असलेलं अमर्याद अस्तित्व आणि ते मुक्तपणे स्वीकारण्याची अन तसेच वागण्याची आपली ताकद म्हणजे खरे स्वातंत्र्य असे माझे स्पष्टच मत आहे.  व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय पुढे आला म्हणून स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला. सहज शब्दकोश उचलून बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत. स्त्रियांच्या दृष्टीने पाहायला गेले कि यातला कुठला शब्द तिच्या अनुषंगाने चपखल बसतो हे व्यक्तिसापेक्ष असू शकेल कदाचित प्रतिनिधिकहि असू शकेल. सामाजिक चौकटीच्या...