Posts

Showing posts from April, 2020

हिरवे भान -

(वृत्त - महाराष्ट्र वृत्त) बकुळीखाली निजून आहे उन्हकेशरी हिरवे भान मुग्धफुलांची पखरण होता थरथर झाले सारे रान पहाटसमयी किलबिल झाली वनी पसरले गीत अजाण दवांत न्हाले उन्ह कोवळे बहकत गेले सारे रान फांद्यांवरती हिंदोळ्यावर फुले डोलली पानोपान अंगांगावर रंग उधळले बहरून आले सारे रान श्वासाश्वासा मधे पेरला गंधगारवा पाऊस छान माती भिजली अत्तर झाली मृद्गंधीले सारे रान थोडी सळसळ थोडी हळहळ नदीकाठच्या वाटेवरती पानगळीच्या ऋतुत कातर अधीर झाले सारे रान ... ©रश्मी

मै तुम्हे फिर मिलूंगी..

Image
खरं सांगू का अमृता तू म्हणजे देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी एक अवर्णनीय जादू..ती जादू आम्ही सगळ्यांनी कधीतरी अनुभवली आहे किंवा ऐकीव तरी आहे, किंवा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून लालसेने किंवा कधीच न अनुभवल्याने एकदा तरी अनुभवायला मिळावी या अपेक्षेने.. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे, जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण अश्या आनंदाच्या अनुभूतीच्या ओढीने सतत तुझ्याकडे ओढले जात असतो. जगण्याचा खूप गुंता होत राहतो अधून मधून. आणि मग त्यापुढला बराच काळ गुंता सोडवण्यात निघून जातो. मनात हे असं काही काहूर माजतं कि, प्रापंचिक आन्हिकं, जबाबदाऱ्या निभावताना वेदना सहन करणाऱ्या भौतिक शरीराची कात भिरकावून द्यावीशी वाटते, कधीकधी तर बाईपण बोजड वाटायला लागतं..वाटतं परंपरेतून, संस्कृतीतून, प्रपंचातून, साचेबद्ध जगण्यातून या रोजरोजच्या धावधावपळीतून एवढंच काय या शरीरातूनही बाहेर पडावं; मोकळं व्हावं आणि दूर दूर जाऊन बघत राहावा आपणच घालून ठेवलेला घाट... जमलंच तर मोडून पाडावा, बंद करून घ्यावे परतीचे सगळे रस्ते.. हा आंतरिक मनाचा कल्लोळ शांतावताना का कुणास ठाऊक तू आठवत राह...

कोण्या एका संध्याकाळी ..

(वृत्त - लवंगलता वृत्त) कोण्या एका संध्याकाळी  भलते घडले होते  रविकिरणांना अलगद कोणी  हाती धरले होते हाती धरल्या किरणांना मग  अर्पण केले कोणी  नदीकाठच्या कडेकपारी  उजळत गेले होते त्या मातीचा गंध पसरला  गंधित झाला वारा  रानोमाळी हर्ष दाटला  रंग पसरले होते आकाशाशी सलगी केली  परतून पक्षी गेले  सांजसावळ्या नभ वेलीवर  चैत्र कोरले होते अंधाराच्या पटलावर का  थरथर झाला चंदा चांदण ओले कवेत घ्याया  मन व्याकुळले होते मिठीत घेण्या दिठीत यावे  अवघे एकच व्हावे  शुभ्र फुलांचा शेला ओढत  नभ पांघरले होते ©रश्मी पदवाड मदनकर

Book Review - सुरेश आकोटकर

Image
सुरेश आकोटकर यांची प्रतिक्रिया आणि केलेल्या काही सुचना. माझ्या शिकण्याच्या प्रवासात या अनुभवी आणि जाणकार माणसांचे शब्द खुप महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. मन:पुर्वक धन्यवाद सर ! 🙏🙏 Suresh Akotkar रश्मी, नमस्कार . बीट्स अँड बाईट्स वाचलं .द्वादशीवार दादांनी थोडक्यात एकूणच लेखांच्या संदर्भात छान प्रस्तावना लिहिली .आपल्या मनोगतातूनही आपण या लेखांबद्दलची आपली भूमिका मांडली .जगभरातल्या स्त्रियांच्या शोषणाच्या कथा आणि व्यथा आपण अतिशय तळमळीने मांडल्या आहेत .बहुतेक अनुभव मन विषण्ण आणि विदीर्ण करणारे आहेत .आणि हे शोषण थांबावे असे बहुतेक लेखांच्या शेवटी आपण इच्छा व्यक्त केली आहे .परंतु कितीही निर्मळ मनाने आपण या प्रार्थना केल्या तरी पुढील काळात असे घडेल याची शाश्वती नाही .हजारो वर्षापासून हे घडते आहे .आपण अनेक देशातले संहारकतेचे हिंस्र स्वरूप अनेक लेखातून दाखवले आहे , ते आणखी कोणते आणि कसे संहार घडवून आणतील हे सांगणे अशक्य आहे .वाघासारखे हिंस्र पशू पोटासाठी बळी घेतात पण माणूस नावाच्या जातीला लागलेली ही माणसाच्याच हत्येची भयावह भूक कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही .कितीही कायदे आले आणि आजच्या युगात...

काही गाण्यांचे किस्से बनतात, काही किस्स्यांची गाणी.

Image
काही गाणी किती मनाचा ठाव घेतात... नाही ? इतके आत आत उतरतात की दिवसाच्या-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी ते कितींदाही ऐकता येतात आणि फक्त ऐकता येत नाहीत तर त्यात गुंग होऊन तादात्म्य प्राप्तीच्या स्तरापर्यंत जाता येतं. तुम्हाला आलाय कधी असा अनुभव ?? मला आलाय .. येतो आजही कितीदातरी.  काही गाण्याच्या धून नुसत्या वाजायला लागल्या की आपण वेगळ्याच विश्वात तरंगत पोचतो. अशीच एक धून आहे जॅकी आणि मीनाक्षीच्या हिरो सिनेमातली बासरी (फ्ल्यूट मेलोडी) आठवते ? ह्याच बरोबर त्यातलच 'निंदिया से आई बहार ऐसा मौसम देखा पहेलीबार' या धून लागल्या की आजही मनात काहीतरी कालवाकालव होते. ह्याच्याच उलट काही गाणी आहेत जी ऐकावीच वाटत नाहीत.. ती लागलीत कि तिथून पळून जावंसं वाटतं. अर्थपूर्ण शब्दांची गाणी ही माझी पहिली पसंती, त्यानंतर गायक संगीत किंवा इतर सगळ्या गोष्टी. दिवसभरातला माझा आवडता वेळ कुठला असतो सांगू, ऑफिस संपल्यानंतर ऑफिसमधून निघून घरी पोचेपर्यंतचा ५०-६० मिनिटांचा वेळ. कुठेतरी खूप घाईत पोचायची धावपळ नसते काम संपवून निघाल्याच समाधान असतं म्हणून रिलॅक...

यह कैसी माया है....

Image
दोन दिवसाआधी 'माया मेमसाब' मुद्दाम शोधून काढून अर्ध्या रात्रीपर्यंत पाहत बसले होते. खूप भावभावनांचा विचारांचा कल्लोळ या सिनेमाने पुन्हा एकदा मनात निर्माण केला. मला वाटतं प्रत्येक कलाकाराची ठरली असते तशी प्रत्येक कलाकृतीची देखील एकेक नियती ठरलेली असते. एखाद्या कलाकृतीचा तिच्या चाहत्यांच्या मनातले स्थान-आदर किंवा प्रसिद्धीच्या झोतात कुठवर जाणार कि मग तशीच विरून जाणार, अडगळीत फेकली जाणार हे कुणालाही सांगता येत नाही. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचे उद्देश वेगळे त्याचा आशय वेगळा त्यातून निघणारा अर्थही वेगळा पण रसिकांना गवसलेला किंवा त्यांनी काढलेला अर्थ वेगळा होतो आणि निर्मात्याच्या मनातली कलाकृती लोकांपर्यंत पोचतच नाही. 'माया मेमसाब' बद्दल मला असेच वाटले. फार पूर्वी एकदा ओझरता पाहिला होता कुठे कसा फारसं आठवत नाही. पण त्यातली गाणी गाण्यांचे शब्द खोलवर आत उतरले होते. खयाल चलते है आगे आगे मै उनकी छांव में चल रही हूं… न जाने किस मोमसे बनी हूं जो कतरा कतरा पिघल रही हुं मै सहमी रहती हूं नींद में भी कही कोई ख्वाब डस न जाये….. मेरे सरहाने जलावो सपने मुझे जरासी तो नींद आये...
Image
माझ्या फाटक्या छताच्या पलिकडे मला दीसायचे असंख्य ‌तारे .. विस्कटलेले, सैरावैरा, भरकटलेले भटकून लढून रडून थकले की  स्वतःला लोटून देणारे .. अथांग अफाट अंधार्या अवकाशाच्या डोहात मला ते ठीबकताना दिसायचे... ओघळत येऊन हळूच मिटून जायचे .. एखादाच तारा फाटक्या छतापर्यंत येऊन डोकावायचा .. भटकून लढून रडून थकलेल्या मला अजूनही लखलखताना पाहून प्रेरीत व्हायचा.. आणि मिटून जाण्याचे विचार सोडून अंगणात पडून रूजायचा.. त्याची जिजीविषा तग धरून अंकुरायची दिवसागणिक अंगणात ताऱ्यांची पखरण होऊ लागायची.. आता अवकाशाचे सारे तारे रूजून बहरले आहेत.. आणि आणि .. वर अवकाशाच्या फाटक्या छतापलिकडे आता दिसतात असंख्य तारे .. © रश्मी पदवाड मदनकर