Monday 31 August 2015

जन्मदिन कि बधाई अमृताजी...

अमृता प्रीतम उत्कृष्ट लेखिका पण त्याहून अधिक एक हळव्या मनाची स्त्री स्वप्न बघणारी आणि ते तसेच जगून दाखवणारी. स्त्री म्हणून तिच्यात असणाऱ्या प्रेम, ममता, जिव्हाळा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराची नुसतीच मैत्रीण म्हणून किंवा तिच्या मनात वसलेल्या पण कधीही तिचा न झालेल्या प्रियकराची प्रेयसी म्हणून या सगळ्या उत्कट भावनांतून अनुभवलेल्या जीवन घटना आणि त्यातून निर्माण झालेली हि संवेदनशील कवियित्री. तिचे सारेच रूप मला फार आकर्षित करतात अन प्रभावितही. आज तिच्या जन्मदिनी तिला आदरांजली म्हणून तिच्या मला अतिशय आवडणाऱ्या या दोन कविता.



मैं तुझे फिर मिलूँगी

कहाँ कैसे पता नहीं

शायद तेरे कल्पनाओं

की प्रेरणा बन


तेरे केनवास पर उतरुँगी

या तेरे केनवास पर

एक रहस्यमयी लकीर बन

ख़ामोश तुझे देखती रहूँगी

मैं तुझे फिर मिलूँगी


कहाँ कैसे पता नहीं


या सूरज की लौ बन कर

तेरे रंगो में घुलती रहूँगी

या रंगो की बाँहों में बैठ कर

तेरे केनवास पर बिछ जाऊँगी


पता नहीं कहाँ किस तरह

पर तुझे ज़रुर मिलूँगी


या फिर एक चश्मा बनी

जैसे झरने से पानी उड़ता है

मैं पानी की बूंदें

तेरे बदन पर मलूँगी

और एक शीतल अहसास बन कर

तेरे सीने से लगूँगी


मैं और तो कुछ नहीं जानती

पर इतना जानती हूँ

कि वक्त जो भी करेगा

यह जनम मेरे साथ चलेगा

यह जिस्म ख़त्म होता है

तो सब कुछ ख़त्म हो जाता है


पर यादों के धागे

कायनात के लम्हें की तरह होते हैं

मैं उन लम्हों को चुनूँगी

उन धागों को समेट लूंगी

मैं तुझे फिर मिलूँगी

कहाँ कैसे पता नहीं


मैं तुझे फिर मिलूँगी!!





मैं- एक निराकार मैं थी

यह मैं का संकल्प था, जो पानी का रुह बना
और तू का संकल्प था, जो आग की तरह नुमायां हुआ
और आग का जलवा पानी पर चलने लगा
पर वह पुरा-ऐतिहासिक समय की बात है .....

यह मैं की मिट्टी की प्यास थी
कि उस ने तू का दरिया पी लिया
यह मैं की मिट्टी का हरा सपना
कि तू का जंगल उसने खोज लिया
यह मैं की माटी की गन्ध थी
और तू के अम्बर का इश्क़ था
कि तू का नीला-सा सपना
मिट्टी की सेज पर सोया ।
यह तेरे और मेरे मांस की सुगन्ध थी -
और यही हक़ीक़त की आदि रचना थी ।

संसार की रचना तो बहुत बाद की बात है ......

अमृता प्रीतम



सच तू -सपना भी तू
गैर तू -अपना भी तू

खुदा का इक अंदाज तू
और फज्र की नमाज़ तू
जग का इनकार तू
और अजल का इकरार तू

फानी हुस्न का नाज़ तू
रूह की इक आवाज़ तू
जोग की इक राह तू
इश्क की दरगाह भी तू

आशिक की सदा भी तू
अल्लाह की रज़ा भी तू
सारी कायनात तू
खुदा की मुलाकात तू

वाह सजन ...वाह सजन !!
वाह सजन ...वाह सजन !!

अमृता प्रीतम

Thursday 13 August 2015

स्वगत .. डेस्टीनेशन !

पावसाळ्याचे दिवस अतिशय देखणे, ओले-गार अन हिरवाईने नटलेले असतात पण कधी लक्षात आलंय का तुमच्या ह्याच दिवसात अनेकदा एक अनामिक उदासीनता जाणवते. जसजसे वातावरण आर्द्र होत जाते उन्ह गळून पडतं अन भरदिवसा अंधारून येतं. घरातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेले असतात आणि खिडकीत बसून सारख्या पडणाऱ्या पावसाकडे पाहण्याचाही कंटाळा येतो. घरात दडून बसावं वाटत नाही आणि बाहेर पडणेही शक्य नसते अश्यावेळी मरगळ येते. इकडे आकाशात ढग अन मनावर मळभ एकत्रच दाटून येऊ लागतात. विचारांचे वारे वाहू लागतात आणि आपण आपल्याही नकळत आयुष्याचे वादळ आपल्याच पुढ्यात मांडून बसतो. काय चाललंय आपलं नेमकं आपल्यालाच कळत नाही. प्रचंड आवडणारा पाऊस; हवाहवासा वाटणारा, वर्षभर वाट बघायला लावणारा पाऊस आज असा उदासवाणा का वाटतोय ह्याचं उत्तर आपलंच आपल्याकडे नसतं. मग आणखी बऱ्याच गोष्टी आठवू लागतात. आयुष्यात कधीपासून आपल्याला काय काय 'इगरली' हवं होतं. आयुष्याकडून आपली हट्टाची मागणी काय होती? ह्याची यादी मनात-डोक्यात जागा घेऊ लागते. एक एक मागणी एक एक गरज.. अश्या गोष्टी ज्याशिवाय मला जगणे शक्य नाही किंवा जगायचेच नाही असे वाटायचे.. ते ते सगळे मिळाले का ? सगळ्या नसतील झाल्या मागण्या पूर्ण पण..पण बऱ्याचअंशी झाल्यातच कि .... ज्या नाही झाल्यात त्या शिवायही आज जगता येतयच ना आपल्याला. मग ते 'न' मिळवून असं काय गमावलंय? नाहीच काही... मग का त्रास करून घेतला आपण मनाला-जीवाला त्या त्या वेळी. कित्तेक महिने कित्तेक काळ दुःखात काढले ....आणि 'त्या' न मिळालेल्या गोष्टींशिवायाही आज सुखी असू तर तो तेव्हाचा त्रास ती जीवाची तगमग सारं फुकटच गेलं म्हणायचं का ??
 
आणि ज्या गरजा ज्या मागण्या पूर्ण झाल्यात त्याचं काय केलं आपण ?? 'त्या' मिळवून असा काय तीर मारून घेतलाय किंवा 'जे' मिळालंय त्या मागे लागलेली धावपळ, केलेले कष्ट, तीव्र इच्छाशक्ती या सर्वांना प्रामाणिक जागतोय का आपण. 'ते' मिळवण्यासाठी आयुष्याचा वेळ, श्रम अन एनर्जी घालवलीय त्याची आजही तितकीच Value आहे का आपल्या लेखी ? कि जी काही धडपड होती, जीवाची तगमग होती, जेवढे दिवस कष्ट घेतलेत जेवढ्या रात्री काळजीत काढल्या ते सगळं सगळं केवळ अन केवळ 'हवं ते' मिळेपर्यंत / मिळवेपर्यंतच होतं. ते मिळाले अन तत्क्षणीच त्याचे पूर्वी असलेले महत्व, ती गरज आपल्यालेखी संपुष्टात आली होती. मग पुन्हा नवी मागणी, नवी इच्छा, नवी गरज घेऊन आपण नव्याने आतुर झालो. नव्याने बेचैन होऊन कामाला लागलो. पुन्हा रात्र जागल्या अन दिवसा दगदगीत काढू लागलो. कष्ट उपसु लागलो... तहान भूक विसरलो.

हो ... होतंय खर असंच ना ?? जे आता या क्षणी आहे जे मिळालंय ते मिळाल्याचं सुख तर त्या त्या वेळी उपभोगायचं राहूनच गेलं. ज्या सुखासाठी तडफडत होतो ते सुख दारात असतांना आपण एक पायरी ओलांडून व्हरांड्यातून पुढे निघून गेलोत. ते प्रचंड हवं असलेलं, गरजेचं, आवडीचं  आपल्या दारात आलंय एवढंच कसकाय पुरे होतं आपल्याला. एवढी जीवाची तगमग बस एवढ्याचसाठी होती...असं कस? ह्याचा विचार केलाच नाही कधी. जे मिळालंय त्याचा आनंद उपभोगायचा नव्हताच तर कशासाठी जीवाला एवढा त्रास दिला? आपण नुसतेच धावतोय का? कुठे जातोय, कशासाठी, कुठे पोचणार ह्याचा विचार न करता पळतोय नुसते. डेस्टीनेशन माहितीच नसेल तर धावण्याचाही उपयोग काय ?  जे मिळालं नाही त्यासाठी भोगलेलं दुःख अन जे मिळालंय त्यासाठी उपसलेले कष्ट सारंच कसं पाण्यात जातंय आपलं का ?

ऊम्म्म्हं ! असं नाहीये खरतर ..जे मिळालं नाही त्याशिवायही जगता आलं सर्व्हाइव केलं हीच आपण त्या क्षणांतून मिळवून घेतलेली 'स्ट्रेन्थ' आहे... जीवन जगण्यासाठी शिकलेला एक नंबरी 'फोर्मुला' जो आयुष्यभर कामी येणारेय. अन जे मिळवलंय त्याचा आनंद घेताच आला नसेल तर मिळवूनही स्वतः स्वतःच्या हातानं स्वतःच सुख आपण घालवलंय, मिटवून टाकलंय . म्हणजेच मिळवणे हे नेहेमी मिळवणे असतेच असे नाही आणि गमावणे म्हणजे मिळवणे नसतेच असेही नाही. किंवा अगदी ह्या उलट देखील.

हे सगळं असंच आहे कि मी उगाच बडबडतेय ... बापरे ...  वेडगळ विचार ऐकून पाउसही थांबलाय आता. निघायला हवं खूप कामं पडलीत ... बाकी पुन्हा कधीतरी

क्रमशः          


रश्मी / 12-08-15       

दैनंदिनी !!

रंग उडालेल्या काळपटलेल्या टेबलच्या
खिळखिळ्या झालेल्या ड्रॉवरच्या आत
अस्ताव्यस्त पसरलेल्या जुन्या बिनकामाच्या वस्तूंच्या
भाउगर्दीत , धुळीने माखलेल्या अवस्थेत पडलेय मी
टाचण्या पिना टोचल्यात, पेपरवेट, वस्तू येऊन आदळलेत अंगावर
कुणाला सोयर सुतक नाही ...आतातर तुलाही नाही …

कधी बैठकीतल्या काचेच्या कप्प्यातली शोभा वाढवायचे मी …
येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच कौतुक ऐकायचे मी
कधीतरी इथली माणसं प्रेमानं हाती घ्यायचे
अंगावरची धूळ पुसून काळजाशी लावायचे
पान पान पालटतांना हळवी होऊन सुखावायचे मी
अन रात्र होताच उशाशी तुझ्या विसावायचे मी

तासंतास माझ्याशी बोलायचीस तू
शब्द शब्द पेरतांना किती गुंतायचीस
तुझ्या भावनांचा ओघ ओंजळीत सामावून घेतांना मीही मग रमून जायचे
तुझ्या अनुभवांची निर्जीवी पण एकमेव जिवंत साक्ष ठरायचे.

तुझे अश्रू अंगावर झेलतांना उर भरायचा माझाही
तू दुःखात असतांना क्षणभरही साथ सुटायचा नाही तुझाही
तुझे मन हलके व्हायचे माझ्याशी बोलून
मीही मग धन्य व्हायची तुझे हसू बघून

तुझे दिवस सरले अन माझेही
तू सुखी झालीस तुला हवं ते मिळवून
अन मला विसरलीस असे अडगळीत सोडून
आता दैनंदिनी लिहायची गरज नाहीये ना तुला
जीवाचा सखा मिळालाय असं ऐकलंय परवाला

मी मानेन समाधान तुझ्या जुन्या आठवणीत
क्षण ठेवेन जपून तसेच साठवणीत
ये एकदा भेट मला एवढीच इच्छा आहे सखे
तू सदा सुखी रहावीस हेच मागणे अखेरचे …

हेच मागणे अखेरचे …




Wednesday 12 August 2015

अज्ञानात सुख

कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या कलेची आवड असायला हवी त्याबद्दलची जाण असायला हवी पण त्याचे ज्ञान मात्र असायला नको. फार ज्ञान असले कि कलेतील उणीवा, खाणा-खुणा आणि चुका आधी नजरेला, कानाला अन स्पर्शाला जाणवतात. आस्वाद घ्यायचे दूरच राहते. बघण्या, ऐकण्या अन वाचण्याच्या बाबतीत एक हमखास होतं अधिक चांगल्या गोष्टी बघत वाचत ऐकत गेलो की आपल्या अपेक्षा आपल्या आवडी-निवडीपेक्षाही जास्त वाढतात. दर्जेच्या उद्देशाने नसलेल्या अगदी शुद्ध मनोरंजनात्मक गोष्टी सुद्धा आपण ज्ञान आणि दर्जा अश्या कसोटी वर घासून बघतो. आपले ज्ञान आपली आवड आपल्यालाच मुक्त गोष्टींचा मुक्तपणे आस्वाद घेऊ देत नाही. पुन्हा पुन्हा असे घडत राहिले कि मिळेल तिथून आनंद मिळवण्याच्या स्वभावात कमी येते अन रुक्षपणा वाढत जातो. ह्याची परिणीती काहीही न आवड्ण्यामध्ये होते. अन कुठेतरी मानसिक एकाकीपण जाणवू लागते. अज्ञानात सुख असते म्हणतात ते हेच.  

Sunday 9 August 2015

स्मिता



स्मिता = सावळ्या (offbeat) भूमिका बजावणाऱ्या या गोऱ्यांच्या चाहत्या दुनियेतल्या सावळ्या अभिनेत्रीचे विचारही असे सावळे (out of crowd) असावेत ....हा निव्वळ योगायोग नाही हा तर सावळा योग ... नाही ??




Saturday 1 August 2015

पिंड



पु.ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलय
शेवटी संस्कॄती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत... गणपतीबाप्पाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी... दुस-याचा पाय चुकुन लागल्यावरदेखील आपण प्रथम केलेला नमस्कार.... दिव्या दिव्या दीपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी.... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे.... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श. कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तस ह्या अदॄश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा....
शब्द फार छानं आहेत. परिटघडिचे शर्ट घातलें की मलाही आवडतील पण हे असं झालं माझ्या दरिद्री आयुष्यात.
बाजरीच्या भाकरी उरल्या तर आई त्याचे तुकडे करुन पुन्हा एकदा कडक भाजायची. सकाळच्या न्याहारीत चहाबरोबर बटरसाठी रोज दहा पैसे कुठले असायला? मगं हिचं आमची बिस्किटं. गणपतीबाप्पाची आरोळी आम्हीही ठोकली असती जर शाळा जेंव्हा मंदिरात भरायची तेंव्हा बाहेर न बसविता आत येउ दिले असते तर. मारुतीच्या देवळात नारळ फोडणारे हात आमचे नसायचे, पण खोबर्‍यासाठी पसरलेले लाचार हात आठवाल तर ते आमचेच होते. पाय लागुन आपआपसांत पाया पडणारे आम्हाला मात्र लाथाचं मारायचे. संध्याकाळ झाली म्हणजे आज धान्य आहे की नाही याच्या चिंता करायचो आम्ही, दिव्या दिव्या दीपत्कारला वेळ नसायचा. आमची आजी मजुरी करुन दमुन जायची. गोष्ट सांगत बसणे तिला परवडायचे नाही. मेलेली माणसे गाडण्याऐवजी जाळणे परवडायला लागल्यापासुन आम्हीपण दिवंगत आप्तांच्या अस्थी घेउन नाशकाच्या नदीवर जातो पण पुजेचं थोतांड बघवत नाही. पंढरपूरच्या चोखोबाच्या दगडाला बाहेर पाहुन आगोदर कससं वाटायचं आता रागं येतो. नाकारला असता विठ्ठलं त्या चोखोबाने तर असा दगड व्ह्यायची वेळं आली नसती.
हा असा पोसला गेलायं आमचा पिंड. हो हो छान विदेशी कपबशीचा आकार आलाय. मंदिराच्या पायरीवर पडुन रहाण्याच्या भानगडीतचं न पडता बाहेर थांबुन मोठं जगं पहायचं ठरवलयं आम्ही.


Rahul Bansode 

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...