Posts

Showing posts from September, 2018
Image
मी एक अख्खा काळ नेसून घेतलाय स्वतःभोवती..माझा माझ्यापुरतं असलेला एक काळ माझ्या आयुष्याएवढा .. किंवा आयुष्य एका काळाएवढं.. आयुष्यापलीकडचा काळ मला माहीत नाही काळापलीकडचे आयुष्यही ठाऊक नाही... नेसलेल्या काळात मी रंगवलंय माझं एक आकाश माझ्या वाट्याचा उजेड सांडत राहावा म्हणून त्यात टाचलाय एक सुर्य, एक चंद्र थोडे तारे पेरले आहेत काही बियाणे थोडं धनधान्य टीचभर पोटासाठी जन्मभर लागणार्या अन्नासाठी... विदग्ध आत्म्याला विसावा म्हणून टीचभर परिघातल्या चंद्रमौळी घरात अशक्यतेचं अफाट विश्व सामावलंय ते मी माझंच मानून घेतलंय कायमचं जगण्यासाठी मनाच्या रखरखत्या जमिनीवर मारत असते भावनेच्या ओलाव्याचा शिडकावा उगवत राहते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वगैरे जपून ठेवते काही खाणाखुणा जगण्यासाठी विदीर्ण आत्म्याला लावत असते संवेदनेचा लेप वगैरे भिरभिरणाऱ्या अस्तित्वाचा गुंता  सोडवण्यात, आणि विखुरलेल्या स्वप्नांची चुंबड जमवण्यात निघून चाललाय हा जन्म वगैरे हव्या त्या माणसांचे गर्दीतले चेहेरे शोधत धुमसत राहतो जीव अखंड अल्पकाळ परीघ ओलांडून आत येणाऱ्या माणसांनी  दिलेल्या तात्पुरत्या दुःखाचे कढ सोसत आयुष्याला पुरेल ए...

ठरवले आहे ..

तुझा उल्लेख मी टाळायचे ठरवले आहे नियम हा एक मी पाळायचे ठरवले आहे । तुला ते शोधतात मी गायल्या गझलांमधुनी तुझे तर नावही गाळायचे ठरवले आहे ।  नवा चल डाव मांडू मागचे विसरून जाऊ आपला व्याप सांभाळायचे ठरवले आहे । नसे कोणी कुणाचे जीव ओवाळून कळले छबीवर आपुल्या भाळायचे ठरवले आहे । नको आधारही अता कुणाचा शब्दानेही तुझ्या पत्रासही जाळायचे ठरवले आहे । कलेवर आठवांचे अंगणी या पुरुन टाकू उगवेल मोगरा माळायचे ठरवले आहे । रश्मी पदवाड मदनकर जुलै 18 (मात्रावृत्तात लिहीण्याचा एक प्रयत्न)

नक्की कुणाचा दोष आहे ??

Image
चला कोणीतरी बोललं म्हणायचं - न भिता, न घाबरता, कोपऱ्यात बातमी न लावता कुठल्याही राजकारणाचे दडपण न ठेवता - माध्यमाची जबाबदारी बाळगत सत्य ठामपणे उघडावं वाटलं.... हितवाद तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात झालेल्या त्या तीन विद्यार्थिनीच्या अपघाताबाबत शहरभर गदारोळ माजला, राजकारण पेटले, आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि काय काय.. त्या दिवशी पूर्णसत्य माहिती नसल्याने बातम्यांचे पेव उठणे, वाऱ्याच्या वेगाने खोट्या अफवा पसरणे साहजिक होते, त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या .. मान्य. पण नंतर सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आले. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं इतकं सगळं स्पष्ट झालं. प्रत्यक्षदर्शींचे स्टेटमेंट आणि पोलीस तपासणीतूनही अनेक बाबी समोर आल्या. इतकं सगळं खरं-खोटं कळाल्यावर आणि अपघातग्रस्त मुलींची नुसती चूकच नव्हती तर दखलपात्र गुन्हा होता हे लक्षात आल्यावरही कुठल्याच दुसऱ्या वृत्तपत्रांना त्यावर सत्य प्रकाशात आणणारी बातमी करावी वाटली नाही ?? अपघाताच्या दिवशी जे काही राजकारण झाले मृतदेहाला कार्याल...

उजेडाचा मिलन 'स्पर्श' !

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं ) एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहायला आवडतंच त्यात तो जुना आवडत्या अभिनेत्यांचा असेल तर क्या बात .. पण एखाद्या अत्यंत संवेदनशील नजरेने टीपलेले चित्रपटाचे सिन आणि त्याचा उलगडा इतका हळुवार इतका विलोभनीय की चित्रपट पाहील्यावर इतका कळला नसता तो वाचनातून झिरपतोय आपण त्या विश्वात तन्मयतेनं रमतोय असं वाटत राहतं ... एक अत्यंत आवडलेला लेख. ................................................. उजेडाचा मिलन 'स्पर्श'! संजय आर्वीकर उजेड हा मुक्तीचा भावसंकेत असतो. आत्मज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासातला हा एक वाटाड्या असतो. उजेडाच्या प्रकाशात अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती असते. त्यागाच्या आवरणाखाली लपलेले प्रेम सूर्यफुलासारखे उमलण्याची असते. सई परांजपेंचा ‘स्पर्श’ हा सिनेमा उजेडाच्या जादूई मिलनाची गोष्ट सांगतो... नवजीवन अंध विद्यालयाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्धचं घर. तो स्वतः दृष्टिहीन, पण विलक्षण स्वाभिमानी. घरात अनिरुद्ध आणि त्याच्याच विनंतीवरून शाळेत येऊ लागलेली कविता. कविताच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेलं...

बँडवॅगन इफेक्ट !!

Image
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळच्या एका छोट्या गावात तांदूळ आणि खाण्याच्या वस्तू चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना  पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथे घडली होती. नंतरही कधी मोबाईल चोरीच्या संशयावरून तर कधी मुलं चोर समजून, गोहत्या केली म्हणून तर गोरक्षक आहे म्हणून कुठलीही शहानिशा न करता पुढे कुणीतरी दिसतंय म्हणून, संधी मिळालीय म्हणून, गम्मत वाटतेय म्हणून, सगळेच मारताहेत म्हणून गर्दी जमत राहिली आणि मारमार मारून एकट्या तावडीत सापडलेल्या माणसांना गलितगात्र करून, अर्धमेले करून किंवा जीव जाईपर्यंत मारत मज्जा पाहत राहिली. २०१२ मधली दिल्लीच्या निर्भयाशी, मुंबईच्या शक्तीमिलच्या पीडितेशी, काश्मीरच्या आसिफा आणि कितीतरी अश्या केसेस, एकावेळी अनेक माणसांनी मिळून केलेले क्रूर कर्म कुणालाही विसरता येणार नाही. कुठून येत असेल एवढं क्रौर्य हा संशोधनाचा विषय आहे. पण...मला पडलेला प्रश्न अ...