Posts

Showing posts from August, 2016

न्यायमूर्ती डॉ मंजुला चेल्लुर

Image
http://epaper4.esakal.com/31Aug2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page12.htm

माणुसकीचा बोन्साय ...

Image
जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि काय नेमके काय करून मरायचे हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगतांना येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असणारा माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या 'मृत्यूला' मात्र घाबरतो,. खरतर आयुष्यच  माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग ...  मृत्यू. कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात  'इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  ... पण ज्यांनी जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यासारखे निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही अश्या अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये? मृतदेहाचीही विटंबना व्हावी... स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा हि कसली नियती? सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा अन मृतदेहालाही ठेचकाळत, डुचमळत जावे लागावे.  वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा.  गरिबीच्या झळा माणसाला कुठवर ...

अल्झायमर - एक गंभीर समस्या

Image
अल्झायमर - एक गंभीर समस्या काही मानसिक आजारांवर आपल्या देशात फारशी चर्चा होत नाही. खरतर मानसिक आजारात वेगवेगळे आजार असतात आणि योग्य उपचाराने ते बरेही होतात.  याचेच मुळी ज्ञान आम्हाला कमी आहे. मानसिक आजार म्हंटले कि ती व्यक्ती ठार वेडी असते या एकाच निष्कर्षाप्रत आम्ही पोचतो. म्हणजेच ठार वेडे होणे या टोकापर्यंत पोचेपर्यंत मधल्या काळात रुग्णाला होणार त्रास किंवा त्याच्यातले बदल टिपले सुद्धा जात नाही. मग पुढे त्याचा गांभीर्याने विचार होणे किंवा उपचार करवून घेणे, त्याची सहृदयाने काळजी घेणे या अपेक्षा गौणच राहतात. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होण्याचे कारण फक्त समाज, नातलग किंवा लोकच करतात असे नाही तर मानसिक आजारांवर हवे ते उपाय करता यावे म्हणून संशोधन घडवून आणून नवनवी उपचार पद्धती विकसित करणे किंवा तसे तंत्रज्ञान उपलब्ध करवून देणे यातही फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे 'अल्झायमर' सारखा आजार. काही वर्षाआधी अल्झायमर रोगाचा प्रादुर्भाव फार नव्हता. पण आज 40 लाख लोकांना अल्झायमर सारखा मानसिक आजार असल्याचे आकडे सांगतात. आणि आकडे असेही सांगतात कि आज वाढतोय त्य...

भय इथले संपत नाही ...

Image
मंगला जेधे नावाच्या महिलेच्या खुनाच्या आरोपावरून संतोष पोळ नावाच्या बनावट डॉक्टरला अटक होते आणि एक दोन नाही तर तब्बल 6 खून त्याने केले असल्याचे तपासात उघडकीस येते. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे प्रत्यक्षात उतरलेले प्रकरण, हाहा म्हणता राज्यभरात चर्चेचा विषय ठरते आणि पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेची संतापजनक प्रतिक्रिया सगळीकडे उमटू लागते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मागल्याच आठवड्यात हा सारा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबत एकंदरीतच प्रशासनावर प्रश्न उभे राहिले. हि बातमी वाचली आणि नकळत डोळ्यासमोरून भूतकाळ सरकू लागला. मला आठवतं मी लहान असतांना अमरावतीला आजोळी गेले होते. दर उन्हाळ्यात सुट्ट्यात जायचो. एरवी सतत भटकंती करायला हौसून असणारे मामा-मावशी त्या उन्हाळ्यात मात्र कमालीचे धास्तीत होते. तरुण मुलींनी घरातून बाहेर पडायचे बंद केले होते.1991-92 सालातील ही घटना असावी. रस्त्याने जाणाऱ्या मुलींच्या घोळक्यातल्या बरोबर डाव्या बाजूच्या मुलीवर सायकलने येऊन चाकूने हल्ला करणाऱ्या सीरिअल किलरच्या दहशतीत संपूर्ण अमरावती शहर वावरत होते. पु...

नैराश्यातून आशेकडे (मनाचिये गुंती)

Image
आयुष्यात अनेक घटना घडतात, काही प्रसंग अत्यंत कडवट अनुभव देणारे असतात. ते कुठेतरी मनाच्या तळाशी साठून राहतात. विसरता विसरले जात नाहीत. कधीतरी मध्येच एखाद्या धक्क्याने ते सगळं स्मृती पटलावर येतात असे वारंवार घडत राहते अन आयुष्य त्या घटनेच्याच अवती भवती घुटमळत राहते. हि नैराश्याची स्थिती फार गंभीर असते. यातनामयी भूतकाळात गुरफटला गेलेला माणूस वर्तमान आयुष्यही मातीमोल करतो आणि साऱ्या जगण्याचीच राखरांगोळी होत जाते. कुठलीही दुःखद घटना पचवणे-विसरणे सोपे नसते. काही काळ ती मनात ठाण मांडून बसते हे जरी खरे असले तरी जीवन जगतांना येणारे नवनवीन आव्हान झेलताना, नवीन अनुभव घेतांना ते क्षण त्या आठवणी पुसट होत असतात किंबहुना व्हायलाच हव्या असतात. असे जेव्हा घडत नाही, त्याच त्याच आठवणी उगाळून तेच ते दुःख तो रवंथ करीत राहतो तेव्हा माणूस नैराश्येने ग्रासला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण असे होत नाही, त्याच्या वागण्याचा वैताग येऊन त्रासलेली लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्याशी बोलायचे टाळतात किंवा चिडचिड करतात. त्याचे उलट परिणाम होतात. नैराश्यग्रस्त माणूस अधिकाधिक गुरफटत जातो. मन मोकळं ...

तेजशलाका अरुंधती

Image
ए कविसाव्या शतकात शांतता व शाश्वत समुदायाच्या उभारणीसाठी कराव्या लागणा-या खडतर प्रयत्नांमध्ये जागतिक पातळीवर महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. तश्या जगभरातील विदुषीका पुढेही येत आहे.  हिलरी क्लिंटन यांनी या युगाचे वर्णन ‘सहभागाचे युग’ असे केले आहे. आपण जात, धर्म व लिंगभेद विसरून समाजामधील एक बहुमूल्य घटक बनण्याकडे व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे त्या म्हणतात. आज हे त्यामानाने सहज वाटत असले तरी साठाव्या दशकात राजकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान मिळवून त्यासाठी काम करणं तितकसं सोप्प नव्हतं. तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान भारतातील महिलांना जगभरात कुठेही पुरुषांपेक्षा कमी मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा  प्रवास आजही अचंभित करतो. परराष्ट्र धोरणाच्या कार्यात भारतातून महिलांचा सहभाग अगदीच नगण्य असला तरी, 1963 साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यानंतर पुढले चार दशकं आपल्या बहुमूल्य कार्याचा ठसा या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर उमटविणाऱ्या,  'व्यापक अणुचाचणी प्रतिबंध क...