Posts

Showing posts from May, 2026

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

Image
  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ******** *कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी* कायांतर ही पद्मगंधा प्रकाशनची निर्मिती असलेली आणि पुणे येथील पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालेली रश्मी पदवाड मदनकर यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी आहे. एका देहातून दुसरा जन्म घेतलेल्या तृतीयपंथीय आंचल वर्मा या ट्रान्सजेंडर महिलेच्या जिवंत, ज्वलंत आणि अंतर्मुख करणाऱ्या संघर्षाची ही कहाणी आहे. स्त्री-पुरुष या चौकटींपलीकडील ‘तिसरे लिंग’ आपल्या समाजाला अजूनही सहज स्वीकारता आलेले नाही. त्यांच्या अस्तित्वाकडे पाहताना समाज आजही कचरतो; बोलताना, समजून घेताना, अगदी त्यांच्या शेजारी उभे राहतानाही. निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवांना मात्र समाजाने उपेक्षेची शिक्षा दिली आहे. लाज, अवहेलना, टाळले जाणे, पावलोपावली करावा लागणारा स्वाभिमानाचा संघर्ष, पोटापाण्यासाठी शोधावे लागणारे खाचखळग्याचे मार्ग आणि केवळ अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची लढाई....हे सगळे अनुभव या कादंबरीत अत्यंत दाहक आणि अस्सलपणे उल...

नसरापूर घटनेच्या निमित्ताने...

  ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली. गेल्या महिनाभर झालेल्या घटनांनी खूप उदास, खूप अस्वस्थ वाटतं आहे… एवढं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं असं मनात येतं. या कुठल्या जगात राहतो आहे आपण ? हे जग आपल्यासाठी नाहीच, किंवा आपणच इथे राहण्याच्या लायकीचे नाहीयोत.. पण प्रश्न असा की जावं तरी कुठे? जिकडे पाहावं तिकडे माणसं… आणि त्यांच्या मनातल्या विचारांची-विकारांची गुंतागुंत... जितकी माणसे तितक्या वृत्तीच नाही; तर तितक्या विकृती. त्या विचारांना, त्या मानसिकतेला बदलणं आता जणू अशक...