Monday 29 January 2018

सख्या रे ...

श्वास तुझा अन पाश मला का सांग सख्या रे
प्रीत अशी हि जीवघेणी का सांग सख्या रे

कशास देतो नित्य नवी तू जुलमी वचने
बंध तोडुनी जातं कुणी का सांग सख्या रे

स्मरते तुजला दिवस रात्र अन भिरभिरते मी
विरह तुला का बोचत नाही सांग सख्या रे

मनात माझ्या व्यापून बसला सगळी जागा
नजर शोधते का तुला मग सांग सख्या रे

नव्हतेच काही तुझ्यात अन माझ्यात तरीही
अश्रुंमधुनी ओघळतोस का सांग सख्या रे

किती छळावे, किती रडावे तुझिया वाचून
येशील का तू द्याया उत्तर सांग सख्या रे

रश्मी मदनकर

Wednesday 10 January 2018

नागपूर मेट्रोचा प्रवास




भारताच्या मध्य भागात स्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे एक प्रमुख शहर म्हणजे 'नागपूर'. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर असले तरी प्राथमिक गरजांपासून ते आवश्यक विकासात्मक कार्यापर्यंतच्या मूलभूत गरजांसाठीही सतत उपेक्षा अनुभवलेल्या संघर्षाचा एक मोठा इतिहास अनुभवलेले हे शहर आहे. १८६७ साली नागपुरात रेल्वे सुरु झाल्यानंतर आठवणीत राहिलेला फार मोठा संरचनात्मक विकास म्हणून १५ जानेवारी १९२५ साली स्थापन झालेले नागपूर रेल्वे स्टेशन होते त्याला देखील आता ९२ वर्ष झाली. त्यानंतर सार्वजनिकक्षेत्रात एवढा मोठा संरचनात्मक बदल घडला नाही. पण 'देर आये दुरुस्त आये' या तत्वावर नागपूर प्रगतीच्या पायवाटेवर मार्गक्रमण करीत आहे. नागपूर मेट्रो या घडणाऱ्या इतिहासाचे जिवंत उदाहरण ठरणार आहे आणि आपण सर्व या इतिहासाचे साक्षी. सध्या शहरात प्रचंड वेगाने आर्थिक वृद्धीच्या माध्यमातून विकासात्मक बदल घडताहेत आणि त्यासोबतच प्राथमिक सुविधा, आरोग्य, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल वाखाणण्यासारखे आहेत. या बदलासोबत आम्हालाही बदलणे क्रमप्राप्त आहे.  शहरातील रहिवासी क्षेत्राची वाढत जाणारी व्याप्ती, आराखड्यानुसार होणार पुनर्विकास आणि रचनात्मक निर्मितीचा आलेख वाढतो आहे. हा विस्तार २१७ वर्ग किलोमीटर पर्यंत पसरतो आहे. सध्या शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथल्या नागरिकांच्या प्रमाणात केवळ ९% आहे. शहरातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि भारत सरकारने नागपूरला 'मेट्रो' प्रकल्पाच्या स्वरूपात वरदानच दिले आहे. शहरातील कमकुवत असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इतर वैयक्तिक वाहनांमुळे वाढत जाणारा पसारा वाहतुकीवर पडणारा ताण, छोट्या रस्त्यांमुळे होणारे अपघात, प्रदूषण, पार्किंग प्रश्न इत्यादींवर उपाय म्हणून, तसेच दळणवळणाच्या वाढत्या जाळ्यामुळे जुळत जाणाऱ्या गावखेड्याच्या सीमा आणि त्यातून  दिवसेंदिवस क्षेत्रफळाची व्याप्ती वाढत जाणाऱ्या नागपूरसाठी 'मेट्रोसेवा' अत्यावश्यक आहे असेच म्हणावे लागेल. या विचारातूनच संपूर्ण नागपूरवासीयांसाठी हि सुंदर भेट आम्ही घेऊन आलो आहे... हा विकास घडतांना याच्या प्रवासातली क्षणचित्रे टिपणे महत्वपूर्ण ठरणार आहेत.



महाराष्ट्र शासनाची विधीवत् मंजूरी २९ जानेवारी २०१४ ला  मिळाल्यानंतर  २० ऑगस्ट २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली व २१ आॉगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.
आणि नागपूर मेट्रोच्या महत्वाकांक्षी कार्याचा शुभारंभ झाला. या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यास (NIT) या
नागपूरच्या विकासासाठी असलेल्या संस्थेची कार्यान्वयन संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०१५ रोजी नागपूर कार्यालयाची स्थापना होऊन कामाला विधिवत सुरुवात झाली.  त्यानंतर सुरु झालेला आजपर्यंतचा नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत अचंभित करणारा राहिलेला आहे. त्याच वर्षी २२ मार्च रोजी वेबसाईटचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. १६ मे ला जिओटेक्निकल सर्वेचा श्रीगणेशा झाला. पुढल्या काही दिवसात फ्रेंच चमूने नागपूर मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली आणि शहरभर 'माझीमेट्रो'चे फलक झळकू लागले. त्यानंतर सुरु झाली रूट ठरवण्याची सत्वपरीक्षा. प्रकल्पातील हा सगळ्यात कठीण काळ आणि काम होते. रूट ठरवण्याशिवायही त्या त्या ठिकाणच्या जागेची उपलब्धता, जमीन अधिग्रहण, रहिवाश्यांच्या अडचणी, जागेचा दर्जा अश्या अनेकानेक कसौटी आणि इतर गोष्टींचे परीक्षण करतांनाच मेट्रो टीमच्या कार्यक्षमतेचा कस लागत होता. या सगळ्या कसोटींना खरे उतरत जाणे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि पुढे मार्ग मिळत गेले. हे सगळे करीत असतांना इथल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेणे महत्वाचे वाटू लागले आणि सोबत सोबत मेट्रो संवाद नावाने नागरिकांशी माहितीपूर्ण चर्चात्मक कार्यक्रमास शहरातल्या वेगवेगळ्या भागात करणे सुरु करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या शंकाचे निरसन आणि सल्लामसलत करण्यास सुरुवात झाली जी आजपावेतो सुरु आहे. या दरम्यान ३१ मे पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.. वित्तव्यवस्थेसाठी जुळलेल्या देशांची, जर्मन बँक, रशिया कंपनी,  ईआईबी, एएफडब्ल्यू टीमची  त्यासाठी भारतात नागपूर प्रकल्पाला भेट देणे सुरु होते. नागपुरात मेट्रोची आवश्यकता आणि दर्जेदार कामाची हमी त्यांना पटवून देणे हे या प्रकल्पाला लागणाऱ्या फायनान्सचे दरवाजे खुले होण्याचे मार्ग होते. एक एक दार उघडत गेले आणि मार्गातल्या अडचणी दूर होत गेल्या हे मा. श्री ब्रिजेश दीक्षित यांच्या कष्टाचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचेच हे फळ आहे. नागपूर मेट्रो रेल्वे जागतिक दर्जाची व्हावी म्हणून देशभरातील मेट्रो रेल्वेचे तसेच भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले गेले. भारत, अमेरिका आणि फ्रान्समधील एकूण चार कंपन्यांचा समूह असलेल्या कंपनीला सल्लागार (GC) म्हणून नियुक्त करण्यात आल्याने तांत्रिक मार्गदर्शनाची मेट्रोची बाजू आणखी भक्कम होत गेली. हि अनुभवी, टेक्नोसॅव्ही, तंत्रज्ञ, तज्ञ् मंडळी नागपूर मेट्रोच्या नवरत्नांपैकी एक महत्वाचा भाग आहे. शिवाय 5D अकादमीने सोन्यावर मुलामा चढवण्याचेच काम कायम ठेवले आहे.



दुसऱ्या बाजूने याच काळात at grade Section च्या खापरी ते एअरपोर्ट येथील प्रत्यक्ष ग्राउंड लेवलच्या कामाला सुरुवात झाली होती. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वर्धा रोडवर देखील बॅरिकेट लावण्याचे आणि मिहान डेपोच्या बॉण्ड्रीवॉलचे काम देखील सुरु झाले. पुढल्या अवघ्या ३ महिन्यात फाऊंडेशन आणि पायलिंगचे काम पूर्ण होऊन वर्धा रोडचा पहिला पिलर उभा राहिला होता. पुढल्या दोनच महिन्यात १ किलोमीटरचे पिलर उभे करण्याचे महत्वाचे काम पूर्ण झाले,  हि गती थक्क करणारी होती..इथे थांबणे नव्हतेच उलट पुढे हि गती अधिकाधिक वाढती राहिली. तिसऱ्या बाजूने पर्यावरणाचं संरक्षणच नाही तर संवर्धन हा नागपूर मेट्रोच्या वचनबद्धतेचा एक महत्वपूर्ण भाग होता, या दृष्टीने प्रयत्नही सुरु झाले, या सुरुवातीच्या काळातच अंबाझरी जवळ 'लिटिल वूड' नावाने सुरु केलेल्या ३० हेक्टरच्या जमिनीवर छोटे जंगल तयार करून निसर्गाला पोषक ठरणारे ५४९६ झाडे लावायचे ध्येय देखील गाठले होते. येथे या वर्षभरातच आता झाडांची उंची चांगलीच वाढली असून झाडांना फुलं-फळं यायलाही सुरुवात झाली आहे. शिवाय मेट्रो उन्नती मार्गाच्या पिल्लरवर साकारलेले व्हर्टिकल गार्डन हा नागरिकांमध्ये आजही आकर्षणाचा विषय आहे.



हि सगळी कामे सुरु असतांना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उभे होणे आणि जिज्ञासा जागृत होणे साहजिक होते. आताशा नागपूर मेट्रो प्रत्येकाला माझी मेट्रो वाटू लागली होती. ती कशी असेल कशी दिसेल याची उत्सुकता शिगेला पोचली होती. शिवाय त्याबद्दल इंथंभूत माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणून आणि नागरिकांच्या मदतीसाठी काही विशेष युनिट उभे करण्यात आले. सोशल मीडियावरून मेट्रो बांधकामाच्या प्रगतीची संपूर्ण माहिती पुरवली जाऊ लागली नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज हळूहळू नागरिकांमध्ये चर्चेचा आणि नंतर आवडीचा विषय होत गेला दीड वर्षाच्या अत्यल्प कालखंडात फेसबुकने ३ लक्ष फॉलोवर्सचा आकडा पार केला जो आजही वाढता आहे.  सहयोग सेंटर, माहिती केंद्र, कंट्रोल सेंटर, QRT हि नागरिकांच्या मदतीसाठी उभारलेले युनीट रात्रंदिवस सेवेत गर्क आहेत. शिवाय मेट्रो संवाद, माझे स्टेशन माझे कॉलेज, आय सपोर्ट माझी मेट्रो या मोहीम, मेट्रो कामगारांना राखी बांधून रक्षाबंधन तर गणेशोत्सवात मंडळांबरोबर माहितीची देवाणघेवाण असे उपक्रम राबवले गेले.


२०१६ संपता संपता चारही रिचच्या कामाला बऱ्यापैकी वेग आला. प्रस्तावित गतीपेक्षाही ४ % पुढे काम चालू असतांना त्याची दखल मा. मुख्यमंत्रींनीं देखी माध्यम समूहासमोर घेतली. या कौतुकाच्या थापेने प्रोत्साहन मिळाले आणि चमू अधिक जोमाने काम करू लागली. २०१७ उजाडले.....मिहान ते खापरी आणि एअरपोर्ट पर्यंत ५.६ किमी रूट बसवण्याचे काम प्रगतीपथावर होते. काँकर वायाडक्टचे सौन्दर्य शहरभर नागरिकात उत्सुकतेचा बिंदू ठरत होता. वर्धा रोडच्या उन्नती मार्गाचे कार्य गतीने पुढे सरकत होते, हिंगणा रोड, सेंट्रल एव्हेन्यू सर्वच विभागात दृश्य स्वरूपात कामाची प्रगती उल्लेखनीय ठरत होती. बघता बघता नागपूर मेट्रोचा दुसरा फाउंडेशन डे उगवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या कसोटीवर खरे उतरत असल्याचा प्रत्यय त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवला...हे पुढल्या कामासाठी उत्साहवर्धक ठरले यात शंका नाही. २०१७ चा एप्रिल उगवताना ट्रायल रन याच वर्षी होणार असल्याचे संकेत अधिक तीव्र होऊ लागले. त्या दृष्टीने मिहान डेपोतही तयारी सुरु झाली. खापरी स्टेशन, एयरपोर्ट आणि न्यू एअरपोर्ट स्टेशनचे काम गतीने पुढे जाऊ लागले. ट्रॅकसाठी जागा तयार झाली, विजेचे खांब उभे झाले, जागतिक दर्जाची मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी सुरु करण्यात आली. हेंद्राबाद वरून याच दरम्यान मेट्रोचे कोच येण्यावर विचारमंथन सुरु होते. ....हे सगळं समांतर सुरु असतांना मुळात संवेदनशील असलेल्या  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित सरांचं लक्ष कामगारांच्या आरोग्यासाठी कळवळु लागलं.  एप्रिल आणि मे महिना ४३ डिग्री तापमान आणि कष्ट करणारे कामगार हा 'हिटशॉक' सरांना साहवेना. मग कामगारांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या. दुपारच्या वेळी काम बंद ठेवून त्यांना विश्रांती देण्यात आली. शिवाय इतर वेळीहि पुरेपूर गार पाणी, लिंबू पाणी, विश्रांतीला कापडी शेड, कामाच्या ठिकाणावर छत्र्या अशी सोय करण्यात आली. आजही कामगारांच्या राहण्या खाण्याची, त्यांच्या आरोग्याची काळजी हा प्रायॉरीटीचा विषय आहे. 


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सिग्नलिंग आणि कास्टिंग यार्डचे भूमिपूजन झाले. १ जूनला लांब पल्ल्याच्या ट्र्कमधून ५५० टन ‘Head Hardened Rail ' - (शीर्ष प्रबलित रूळ) रशिया येथून नागपूरला पोहोचले. हा नागपूरकरांसाठी उत्साहाचा दिवस होता. त्यानंतरच्या एक महिन्याच्या काळात आलेले रूळ बसवून, त्याच्या परीक्षणाचा काळ सुरु झाला. आता प्रतीक्षा होती ती रुळावरून मेट्रो धावतांना पाहण्याची. सगळ्या अडचणींवर मात करून अखेर २९ जुलै रोजी हैद्राबादहुन ३ डब्ब्यांचा मेट्रो संच रवाना झाला आणि नागपूरकरांच्या जीवात जीव आला ३ दिवसांनी २ ऑगस्ट रोजी नागपुरात प्रवेश करणाऱ्या मेट्रो कोचचे नागरिकांनी वाजत गाजत  ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. या दिवशी संपूर्ण शहर उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाले होते. कोच मिहान डेपोत पोचले आणि पुढल्या सगळ्या परीक्षणांना सुरुवात झाली. काही काळ 'बुलंद' इंजिनच्या साहाय्याने कोच आणि रूटची चाचणी झाली. पण प्रस्तावित वेळेच्या अगोदरच काम पूर्ण करून ट्रॅक्शनच्या माध्यमाने नागपूर मेट्रो अत्यल्प काळात ट्रॅकवर धावती झाली..१९ सप्टेंबरला शेवटची चाचणी यशस्वी रित्या पार पडली. २३ सप्टेंबरला नागपूर येथे केंद्रीय मंत्री मा. श्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत नागपूरमेट्रो संबंधीत विविध कामांचा आढावा घेतला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री ब्रिजेश दिक्षीत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली..आणि अखेर नागपूरकरांना प्रतीक्षा असणारा ट्रायल रनचा दिवस उगवला...दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ३० सप्टेंबर २०१७ शनिवार रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझी मेट्रोला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. माझीमेट्रो रूटवरून धावतांना पाहणे हे प्रत्येक नागपूरकरांचे स्वप्न आहे. हे साकारताना आपण याचे साक्षी होत आहोत. नागपूर मेट्रो रेल्वे जागतिक दर्जाची व्हावी म्हणून देशभरातील मेट्रो रेल्वेचे तसेच भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले जात आहे. नागपूर मेट्रो त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात या प्रवासात भरीव योगदान दिले, सहकार्य केले ...नागपूरवासियांना सुरक्षित, विश्वासार्ह, स्वच्छ, स्वस्त, तंत्रज्ञानाने समृद्ध, माहिती संसाधन संपन्न आणि पर्यावरणास पोषक सेवा उपलब्ध करून देण्यास नागपूर मेट्रो वचनबद्ध आहे. 



रश्मी पदवाड मदनकर
३० सप्टेंबर २०१७

Monday 1 January 2018

तुझ्या डोळ्यांच्या कडा भिजल्या कि
माझ मनही ओलं गच्च होतं
तु गाळलेली नुसतीच टिपं …
'मन' पूर होऊन वाहायला लागतं  
तू निघून जातेस नंतर … अन तिथेच
अंशा अंशाने शिल्लक राहतं तुझं अस्तित्व
माझ्या मनातल्या थरथरत्या ओलाव्याचा
मग अपारदर्शी आरसा होतो
तुझ्या भावनांचा मग तोच वारसा होतो. 

तू निघून गेल्यावर झिरपत राहतो
आठवणींचा पाउस… न्हाऊन निघतो गारव्यात
आणि व्यापून राहतो उरात 
शुष्क श्वास, उसासे अन आर्त भाव
सांडून सगळे … पसरलेले असतात घरात
मी वेचत राहतो हे सारे कणाकणाने

 तुझ्या अश्रूंचा ओघ माझ्या नजरेत उतरतो
अवकाळी पावसाला जोर आता चढतो
रिमझिम रिमझिम झिरपत ठिबकत राहतो रात्रभर
भीजल्या मनाचा देह होऊन आखडून बसतो छतावर

तू निघून गेल्यावर … मी माझा उरत नाही
पापण्यांचा भिजका रंग पाठ माझी सोडत नाही
तू येउन पुन्हा एकदा अलगद हसू फुलवून जा
घरात पुन्हा तुझ्या आनंदाचे रंग उधळून जा

सखे एकदा येउन जा … !!

दुसरा अँगल ..


बरेचदा जे कानावर येतंय, जे दाखवलं जातंय तेच सत्य असतं असं नाही काही गोष्टींचा अँगल जरा चेंज करून पाहावा. अनेकदा जी हवा पसरते, जो धुरवडा उडवला जातो, ज्याचा कांगावा होतो तेच खरं असतं असं नाही. किंबहुना मी तर म्हणेन धूर दिसतोय तिथे आग असतेच पण ती लागलीय कि लावली गेलीय हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते. जातीपातीच्या, धर्म-पंथाच्या चक्रव्युहात फसतोय आपण आणि फसवू बघणारे त्यावर त्यांची भाकरी भाजून घेत खुश आहेत. जसे एखादे शेजारी मुस्लिम राष्ट्र 'हितराष्ट्र' नाही म्हणून आपल्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम मित्राकडे शंकेच्या दृष्टीनं पाहणं योग्य नाही तसेच कुठेतरी कुणाची हत्या झाली म्हणून मरणारा एखाद्या विशिष्ट निम्न जातीचा होता फक्त आणि फक्त म्हणूनच मारला गेला असे समजणे सुद्धा योग्य नाही. एखाद्या धर्माकडे जातीकडे सतत शंकेच्या नजरेने पाहणे जसे योग्य नाही तसेच एखाद्या विशिष्ट जातीकडे धर्माकडे सतत बिचारे म्हणून दयाभावनेने पाहणे किती योग्य आहे ??
ज्या समाजाकडे शंकेने पाहिलं जातंय त्यांचा राजकारणासाठी फायदा घेतला जातो आणि ज्यांच्याकडे दयेच्या नजरेने सतत पहिले जाते त्याचाही फायदा घेतला जातो. पण याहून वाईट असतं ते या दोन्ही समाजाच्या विरुद्ध बाजूला उभ्या केलेल्या लोकांकडे त्यांचा दोष असला नसला तरी निर्माण होणार दृष्टिकोन. ते आपसूक आरोपींच्या पिंजऱ्यात उभे होतात आणि आरोप सिद्ध होण्याआत समाजात शिक्षा भोगतात. का? 
प्रत्येक घटनेला तीन बाजू असतात
१. एक अलीकडची म्हणजे जी दिसतेय पण उमजत नाहीये
२. एक जी कुठल्याश्या उद्देशाने दाखवली जातेय.
३ आणि तिसरी या दोहोंपलीकडची म्हणजेच सत्याची बाजू.
आपण बहुतांशी दुसऱ्या नंबरच्या विळख्यात फसतो. एक उदाहरण सांगते.

आमच्या मावशीच्या गावाशेजारचे गाव. मागे तिथे दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला. दोन दिवस दोघीही बहिणी बेपता होत्या आणि तिसऱ्या दिवशी दोघींचाही मृतदेह एका नाल्यात आढळला. मधले दोन दिवस प्रिंट मिडिया, सोशल मिडिया या केसमध्ये अक्षरशः तुटून पडलेला. सगळीकडे शोककळा पसरली होती. त्या दोन मुलींना आधीच वडील नव्हते आणि आता मुलींचाही आधार गमावलेल्या आईचे वृत्तपत्रात छापून आलेले फोटो पाहून जीव कळवळून जायचा. मुलींचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही हे निष्पन्न झाले आणि वेगळ्याच बातम्यांना पेव फुटले.……. बलात्कार नाही म्हणजे मग मारून टाकण्याचा उद्देश काय ?? मग काय दुसऱ्याच दिवशीच्या वृत्तपत्रांमधून मुली आणि मुलींचा परिवार निम्नजातीचा होता आणि म्हणून हे असे करण्यात आले किंवा घडले असे या घटनेला वळसा घालण्यात आला. ज्या गोष्टींचे, घटनांचे उत्तर सापडत नाही त्या सर्वांना चमत्कार, जादूटोणा, करणी नाहीतर जातधर्म अश्या वेष्टनात घालून त्याचे भांडवल करणे हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये फार फार पूर्वापार ते चालत आलंय. एका वर्गाचे दुसर्या वर्गावर आरोप प्रत्यारोप आणि अन्याय … फरक एवढाच कि खेळातले खेळाडू बदलले आहेत, पूर्वी यांच्यावर डाव असायचा आज त्यांच्यावर आहे एवढंच … असो
तर घटनेला आता वेगळं वळण आलं होतं…. काही राजकारणी, लोकप्रतिनिधी, बुद्धीवंतांच्या, विचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या सामाजिक चळवळींनाअचानक पेव फुटले…. अगदी वादळ यावे तसे वैचारिक वारे दूरदूर गतीने वाहू लागले. सर्वदूर तथाकथित उच्चवर्णीयांवर थु थु झाली अनेक दिवस विषय चघळून चघळून चोथा झाला आणि कधीतरी एकदिवस बंद पडला……. मग नवी केस, नवा विषय, नवे विचार आणि नवा चोथा होत राहिला, वारा विरला. इकडे जवळ जवळ चार महिन्यांनी केसचा निकाल बाहेर आला. 'आईच्या अवैध संबंधातून अडचण ठरलेल्या मुलींची हत्या करण्यात आली होती'. परंतु एव्हाना पाणी डोक्यावरून निघून गेलं होतं … प्रकरणाच्या वेळेस राजकीय नेते धरण्यावर बसले होते. मोर्चे निघाले होते. जगासमोर ओरडून ते समाजाचे रक्षक कसे आहेत हे सांगण्यात आले होते आणि पर्यायाने प्रकरण सर्वदूर राज्यभर गाजलं सुद्धा होतं. आता सत्य जगासमोर येणं म्हणजे नाच्चक्कि, गावाची बदनामी आणि प्रकरणामुळे होणार असणारे काही राजकीय फायदे त्यापासून वंचित होणे हे सगळं ओळखून प्रकरण दाबण्यात आले. आजही फ़ाइल मध्ये घटना जातपातीवरून घातपात असेच आहे. परंतु आतले सत्य जाणूनही जाणकारांना बोलताही येणार नाहीये.

अगदी अगदी ह्याच प्रकरणासारखे आणखी एक जागतिक लेवल ला गाजलेले प्रकरण आजही चघळले जाते. राजकारणात आजही हे उदाहरण देऊन त्यांच्यावरच्या अत्याचारांचे, अन्यायांचे पोवाडे गायले जातात पण त्या केसच्या मागे सुद्धा काही छुपी कारणे होतीत. तशी कारणे होतीत म्हणून त्यांना मारून टाकणे योग्य आहे असे नव्हे आणि नसणार कधीच… तसे समर्थन करणे शक्यंच नाही. पण हि केस कायदा हातात घेण्याची होती, कायद्यावर विश्वास न ठेवून स्वतःच सोक्षमोक्ष लावला म्हणून कठोरातली कठोर शिक्षा मिळावी आणि काही जीवांना संपवले म्हणून हत्या अशी कलमे लावली जाणे आणि त्यासाठी मग हवं तर फाशी सुद्धा शिक्षा म्हणून देणे. असे झाले असते तर ते जास्त वैधानिक आणि योग्य ठरले असते पण झाले त्याला जात-धर्माचा मुलामा चढवला गेला. नुसता इश्यू बनवला नाही तर कुठल्या कुठल्या माध्यमातून ते जगभर पसरवण्यात आले…. त्यातून जातीसाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला एवढंच नाही तर त्यावर कुणी कुणी आपल्या राजकीय भाकऱ्या भाजून घेतल्या. जे गेले त्यांना न्याय मिळाला काय? दोषींना शिक्षा मिळाली काय ? माहिती नाही, निर्दोष लोकं त्यातून सुटलेत का याच्याशी संबंध नाही. पण जाती धर्माच्या राजकारणातून संपूर्ण देशातल्या न्यायप्रणालीवर मात्र जबरदस्त दबाव आणला गेला. आजही त्यामागचे सत्य त्या गावच्या वेशीबाहेर निघू शकले नाही. जी लोक जातीच्या नावाने कुठकुठपर्यंत गाजले होते. देश विदेशातून सहानुभूतीच्या लाटा ज्यांच्या दिशेने वाहत होत्या त्या शक्तिशाली आणि प्रभावशाली लाटेत सत्य बोलणारे दोन चार लोक कुठे वाहून जातील जगाला कळणार सुद्धा नाही.

एका वर्गावर अत्याचार होतो म्हणजे ते निव्वळ अन्यायग्रस्त असतात आणि त्यांच्या हातून आरोप घडतंच नसतात असे नसते आणि दुसरा वर्ग मग निव्वळ अन्याय करणाराच असतो, हत्यारा असतो असेही नाही त्यांच्यावरही अन्याय होतो …. दोन्ही वर्गाचे प्रश्न सोडवण्याच्या प्रथांच जर इथे वेगवेगळ्या असतील आणि त्यानुसारच समाजमन पण बनत गेले असेल तर जाब कुठे विचारायचा. सतत पारडे झुक्तेच असायला हवे एकतर इकडे नाहीतर तिकडे. पारडे झुकतेय कि वाकतेय हे बघायला न्याय देवतेचे डोळे उघडे नको का ??
असो … हे होतंच राहणार… मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे खाणारच… राजकारणाची परिभाषाच ती होऊन बसलीय . पण प्रश्न आपला आहे. आपण काय विचार करतोय … पुन्हा वर म्हणाले तेच म्हणेन काही गोष्टींचा एंगल जरा चेंज करून पाहावा. जी हवा उठतेय बहुतांशी लोक जे म्हणताहेत तेच खरं असतं असं नाही.
कुठल्याही जाती धर्मांशी विशेष पुळका नाही किंवा कोणत्याही जाती-धर्माचा द्वेषही नाही पण बऱ्याच घटनांमध्ये नजरेसमोर आलेला दुसरा अँगल जो मला हादरवून गेला तोच इथे तुमच्याही समोर मांडावासा वाटला एवढंच.

एक शख्सियत….. डॉ. राहत इन्दौरी

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

जब से तूने हल्की- हल्की बातें की

यार तबीयत भारी -भारी रहती है

एक शख्सियत…........ डॉ. राहत इन्दौरी

तक़रीबन बीस बरस पहले एक शे'र कहीं पढ़ा :---

हमारे सर की फटी टोपियों पे तन्ज़ न कर

हमारे ताज अजायब घरों में रखे है

और सुनते ही उत्सुकता हुई कि अपनी कौम का ये दर्द काग़ज़ के सीने पे उतारने वाला ये शाइर कौन है ,मालूम हुआ डॉ.राहत इन्दौरी ने कहा है ये शे'र , बस तब से राहत साहब को पढ़ना शुरू किया और आलम ये है कि आज तक उन्हें पढ़ना और रु-बरु सुनना मेरे नसीब के खाते में है।

राहत अरबी ज़ुबान का एक लफ़्ज़ है जिसका एक मआनी आराम भी है। निदा फाज़ली ने सच ही कहा है कि "राहत इन्दौरी ने इस आराम को बे-आराम बनाकर अपनी शाइरी की बुनियाद रखी है"।

राहत इन्दौरी का जन्म इंदौर में मरहूम रिफत उल्ला कुरैशी के यहाँ 01 जनवरी1950 में हुआ। बचपन से ही राहत साहब को पढ़ने -लिखने का शौक़ था। एक मुशायरे के सिलसिले में जाँ निसार अख्तर इंदौर आये हुए थे उस वक़्त राहत दसवीं जमात में थे। राहत साहब उनसे मिलने पहुंचे और कहा कि हुजूर, मैं शाइर बनना चाहता हूँ ,मैं क्या करूँ ? जाँ निसार अख्तर साहब ने कहा कि अच्छे शाइरों का क़लाम पढो ,सौ - दो सौ शे'र याद करो। इस पर पंद्रह बरस के राहत ने जवाब दिया ,हुज़ूर मुझे तो हज़ारों शे'र याद है। उस वक़्त जाँ निसार अख्तर ने सोचा भी नहीं होगा कि ये बच्चा एक दिन उनके साथ मंच से मुशायरे पढ़ेगा और दुनिया का मशहूर शाइर हो जाएगा।

राहत इन्दौरी ने एम्.ए उर्दू में किया , पी-एच.डी. की और फिर सोलह बरस तक इंदौर विश्वविद्यालय में उर्दू की तालीम दी। राहत इन्दौरी ने इसके साथ- साथ तक़रीबन दस बरसों तक उर्दू की त्रैमासिक पत्रिका "शाख़ें" का सम्पादन भी किया।

शाइरी से पहले राहत साहब मुसव्विर(चित्रकार ) थे और ये उनकी शाइरी में साफ़ झलकता है क्यूंकि एक चित्रकार और शाइर ही जानते हैं की रंग और लफ़्ज़ों से काग़ज़ से किस तरह गुफ़्तगू की जाती है।

राहत साहब की शाइरी मुशायरों की बेपनाह कामयाबी के बावजूद भी अदब से अलग नहीं हुई है। उनके ये मिसरे इसकी मिसाल है:---

सिर्फ़ खंजर ही नहीं आंखों में पानी चाहिए

ए ख़ुदा दुश्मन भी मुझको खानदानी चाहिए

मैंने अपनी ख़ुश्क आँखों से लहू छलका दिया

इक समन्दर कह रहा था मुझको पानी चाहिए

राहत साहब की शाइरी का एक मिज़ाज कलंदराना भी है। उनके ये अशआर इस बात की तस्दीक करते हैं :--

एक हुकुमत है जो इनाम भी दे सकती है

एक कलंदर है जो इनकार भी कर सकता है

ढूंढता फिरता है तू दैरो - हरम में जिसको

मूँद ले आँख तो दीदार भी कर सकता है

**

फ़क़ीर शाह कलंदर इमाम क्या क्या है

तुझे पता नहीं तेरा ग़ुलाम क्या क्या है

ज़मीं पे सात समन्दर सरों पे सात आकाश

मैं कुछ भी नहीं हूँ मगर एहतमाम क्या क्या है

राहत इन्दौरी ख़ूबियों का दूसरा नाम है तो उनमें ख़ामियाँ भी है। मुनव्वर राना ने सही कहा है कि "एक अच्छे शाइर में ख़ूबियों के साथ साथ ख़राबियाँ भी होनी चाहिए ,वरना फिर वह शाइर कहाँ रह जाएगा ,वह तो फिर फ़रिश्ता हो जाएगा और फरिश्तों को अल्लाह ने शाइरी के इनआम से महरूम रखा है "।

राहत साहब के शे'र मुशायरे में उनसे सुनना एक सुखद अनुभव होता है पर उनको पढ़ना भी सुकून देता है। आम बोलचाल के लफ़्ज़ों को राहत इन्दौरी एक मंझे हुए पतंगबाज़ की तरह अपने कहन की चरखी में ऐसे चढाते हैं कि उनके अशआर आसमान की बलंदियों में ऐसे पतंग की तरह उड़ते हैं जिनकी कोई काट नहीं होती। राहत साहब के कुछ शे'र इस बात का प्रमाण है :----

मैं लाख कह दूँ आकाश हूं ज़मीं हूं मैं

मगर उसे तो ख़बर है कि कुछ नहीं हूं मैं

अजीब लोग है मेरी तलाश में मुझको

वहाँ पे ढूंढ रहे है जहाँ नहीं हूं मैं

***

तूफ़ानों से आँख मिलाओ, सैलाबों पर वार करो

मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो

फूलों की दुकानें खोलो,ख़ुश्बू का व्यापार करो

इश्क़ ख़ता है तो, ये ख़ता एक बार नहीं, सौ बार करो

***

हमसे पूछो के ग़ज़ल मांगती है कितना लहू

सब समझते हैं ये धंधा बड़े आराम का है

प्यास अगर मेरी बुझा दे तो मैं मानू वरना ,

तू समन्दर है तो होगा मेरे किस काम का है

***

अगर ख़याल भी आए कि तुझको ख़त लिक्खूँ

तो घोंसलों से कबूतर निकलने लगते हैं

***

लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में

यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है

मैं जानता हूँ के दुश्मन भी कम नहीं लेकिन

हमारी तरहा हथेली पे जान थोड़ी है

**

ज़िन्दगी क्या है खुद ही समझ जाओगे

बारिशों में पतंगें उड़ाया करो

***

न जाने कौन सी मज़बूरियों का क़ैदी हो

वो साथ छोड़ गया है तो बेवफ़ा न कहो|

राहत इन्दौरी की अभी तक ये किताबें मंज़रे आम पे आ चुकी है :---

धूप धूप (उर्दू),1978 ,मेरे बाद (नागरी )1984 पांचवा दरवेश (उर्दू) 1993 ,मौजूद (नागरी )2005 नाराज़ (उर्दू और नागरी) , चाँद पागल है (नागरी ) 2011

राहत साहब ने पचास से अधिक फिल्मों के लिए गीत लिखे हैं जिसमे से मुख्य हैं :-प्रेम शक्ति ,सर ,जन्म ,खुद्दार , नाराज़, रामशस्त्र ,प्रेम -अगन ,हिमालय पुत्र , औज़ार ,आरज़ू ,गुंडाराज, दिल कितना नादान है, हमेशा, टक्कर, बेकाबू , तमन्ना ,हीरो हिन्दुस्तानी, दरार,याराना, इश्क, करीब ,खौफ़,मिशन कश्मीर , इन्तेहा, श.... ,मुना भाई एम् बी बी एस ,मर्डर, चेहरा ,मीनाक्षी ,जुर्म और बहुत से ग़ज़ल और म्यूजिक एल्बम भी।

राहत इन्दौरी को अनेको अदबी संस्थाओं ने नवाज़ा है जैसे :-ह्यूस्टन सिटी कौंसिल अवार्ड ,हालाक -ऐ- अदब -ऐ -जौक अवार्ड, अमेरिका, गहवार -ए -अदब ,फ्लोरिडा द्वारा सम्मान ,जेदा में भारतीय दूतावास द्वारा सम्मान, भारतीय दूतावास ,रियाद द्वारा सम्मान ,जंग अखबार कराची द्वारा सम्मान ,अदीब इंटर-नेशनल अवार्ड ,लुधियाना, कैफ़ी आज़मी अवार्ड ,वाराणसी ,दिल्ली सरकार द्वारा डॉ ज़ाकिर हुसैन अवार्ड ,प्रदेश रत्न सम्मान, भोपाल ,साहित्य सारस्वत सम्मान , प्रयाग,हक़ बनारसी अवार्ड ,बनारस , फानी ओ शकील अवार्ड ,बदायूं , निश्वर वाहिदी अवार्ड ,कानपुर ,मिर्ज़ा ग़ालिब अवार्ड ,झांसी .निशान- ऐ- एज़ाज़ ,बरेली।

ये सच है कि राहत इन्दौरी की शाइरी गैस से भरा हुआ वो गुब्बारा नहीं है जो पलक झपकते ही आसमान से बातें करने लगे। राहत इन्दौरी की शाइरी अगरबत्ती की ख़ुश्बू की तरह आहिस्ता -आहिस्ता फैलती है और हमारे दिल के दरवाज़े खोलकर हमारी रूह में उतर जाती है। आख़िर में राहत साहब के इसी मतले के साथ :---

ज़िन्दगी की हर कहानी बे-असर हो जाएगी

हम न होंगे तो यह दुनिया दर ब दर हो जाएगी

Vijendra sharma

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...