आमच्या संवेदना न मरो ...


नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्तेक ठिकाणी लहान मुले भिक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा जखमा झालेले अंग..वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलीकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले हि माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भिक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली, स्वतः पळून आलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?? कि रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?
कित्तेक आई-बाबा याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत.. पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना .. 




Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय