Sunday 27 August 2017



निरंतर वाचन सुरू असतं..मिळेल तिथे मिळेल तसं, दिवसभरात कितीतरी विषय वाचनात येतात..एखादा प्रगल्भ विषय भावनिक स्पंदनं निर्माण करतो. एखादा संवेदनशील लेख अंतर्बाह्य हलवून जातो. एखाद वाक्यातली कोटीही विचार करायला भाग पाडते... एखादी कथा अंतर्मुख करते. एखादी कविता घोळत राहते मनात. त्यातून अनेक विषय सुचत जातात..आतल्या आत वैचारिक आंदोलनं..लाटांवर लाटा..आवर्तनं.. एकावर एक गाळ साचतो, अख्खा लेख तयार होतो..आतल्या आतच घुसमटत राहतो.. .. काठाशी येतो..बाहेर पडायला तडफडत राहतो...तगमग तळमळ !!!!!

वेळ हवा असतो एकांत हवा असतो..उतरवून टाकायचं असतं सारं शब्दात, मोकळं व्हायचं असतं...नाही जमत...दिवसभरात धावधाव धावून दमून भागून शिणलो कि लेखणीशीच हक्कानं प्रतारणा करता येते.


लेखणी रूसत नाही ...लेखणी समजून घेते.
विचार मात्र हटखोर असतात. आपण हात टेकले की सुचलेले विचार मान टाकतात...
मग पुन्हा नवा दिवस उगवतो, नवे वाचन सुरू होते.... नवे मनाचे मांडे मांडले जातात .. पुन्हा खेळ सुरु होतो.


काही विषय काही विचार लिखाण होण्याआधीच असे संपुष्टात येतात...कत्तल होतात...गाडले जातात.


'अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक मिथ' आहेय .....


रश्मी मदनकर / १५.०८.२०१७

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...