Saturday, 18 March 2017

जातांना तो म्हणाला..
'तुला मोकळं केलंय, जा जग तुझं जिनं … तू तुझं बघून घे'
ती थांबली गहिवरली, मुसमुसली
सावरून, डोळ्यातले अश्रु आवरून दोन्ही हाताचे तळवे समोर धरून
म्हणाली " हे हात बघतोस ? तुझ्या हाती दिले तेव्हा तू घट्ट धरलेस तुझ्या मुठीत…. अन ओढून घेतलेस मिठीत
ती मुठ म्हणजे माझं जग होतं आणि ती मिठी म्हणजेच जगणं …तुझ्यावर प्रेम कमी होऊ नये हि काळजी घेणं हेच एवढ्या वर्षात 'मी माझं बघणं'
मुठ सोडलीस मिठी तोडलीस तरी तुलाही मोकळं होता येणार नाही ……
माझ्याशिवाय तुला सख्या रे बघ जगताच येणार नाही

2 comments:

  1. किती छान.ते एकमेकांची सावली आहेत.मग सावलीशिवाय कोणीही कसं राहू शकतील.

    ReplyDelete

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...