जातांना तो म्हणाला..
'तुला मोकळं केलंय, जा जग तुझं जिनं … तू तुझं बघून घे'
ती थांबली गहिवरली, मुसमुसली
सावरून, डोळ्यातले अश्रु आवरून दोन्ही हाताचे तळवे समोर धरून
म्हणाली " हे हात बघतोस ? तुझ्या हाती दिले तेव्हा तू घट्ट धरलेस तुझ्या मुठीत…. अन ओढून घेतलेस मिठीत
ती मुठ म्हणजे माझं जग होतं आणि ती मिठी म्हणजेच जगणं …तुझ्यावर प्रेम कमी होऊ नये हि काळजी घेणं हेच एवढ्या वर्षात 'मी माझं बघणं'
मुठ सोडलीस मिठी तोडलीस तरी तुलाही मोकळं होता येणार नाही ……
माझ्याशिवाय तुला सख्या रे बघ जगताच येणार नाही

Comments

  1. किती छान.ते एकमेकांची सावली आहेत.मग सावलीशिवाय कोणीही कसं राहू शकतील.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय