Tuesday 17 July 2018

काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही
काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते ..

आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो ..
पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ...
चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर
त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो ..

दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो ..
सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...