Posts

Image
मागल्या पानावरून पुन्हा पुढल्या पानावर मनातल्या प्रश्नांच्या शोधाची तडफड कथेमागून कथा संपतात ग्रंथांमागून ग्रंथ नाहीच सापडत उत्तरे मनातली कथा राहते तशीच अपूर्ण ... संदर्भाविना.... कथेतल्या कथेच्या शोधाची तडफड अन कथेच्या पानांची फडफड मागल्या पानावरून पुन्हा पुढल्या पानावर ….

ग्लोरिफिकेशन - आत्महत्यांचे उदात्तीकरण

Image
' आ त्महत्या' खरतर गंभीर विषय. कायद्याने म्हणाल तर गुन्हाच. कुठल्याही माणसाला जसा जन्म कुठे घ्यायचा हा अधिकार नसतो तसे प्रत्येक जन्मलेल्या माणसाला स्वतःला संपवण्याचे अधिकारही न्यायालयाने, शासनाने दिलेले नाहीत. जन्म घेतलाय तर जगावेच लागते मरण येत नाही तोपर्यंत. हे सगळे खरे असले तरी आत्महत्या होत नाही असे नाहीच. रोज अगदी रोज आत्महत्या होतात आणि शेकड्याने होतात. माणूस हा अगम्य प्राणी आहे. ज्या गोष्टींकडे जाण्यास त्याला आळा घालाल त्याच गोष्टींकडे तो जास्त आकर्षित होतो खेचला जातो. आकर्षणाच्या नियमात हे सटीक बसत असले तरी आत्महत्या हा डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही. सध्या देशात जे काही चाललंय ते फार खेदजनक आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि दलितांची आत्महत्या हा देशातील सध्य:स्थितीत सर्वात गाजत असलेला विषय. परिस्थितीने गांजलेल्या कुणीही आत्महत्या करणे हे संवेदनशील मनाला त्रासदायकच आहे. असा कुठलाही मनुष्य नसेल ज्याला अश्या घटनांचे, या परिस्थितीचे वैषम्य वाटणार नाही. पण अशी परिस्थिती उद्भवली असेल तर तिला तेवढ्याच संवेदनशीलतेणे आपण हाताळतोय का हाच मुळात कळीचा मुद्दा आहे...
मैत्रीच्या प्रवासात उतार चढाव चालतातच गं, किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्यालाच ठरवायचं असतं. आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांनी चांगलंच वागावं, मित्रच असावं असं थोडंच आहे चालून आलेल्या जाणत्या-अजाणत्या माणसांची, त्यांच्या आपल्या नात्याची त्या ओळख असलेल्या नसलेल्या लोकांच्या सहवासातल्या वेगळ्या प्रवासाची वेगळीच कहाणी लिहू शकतो …. त्याचाही इतिहास घडू शकतो.  पटणारी किंवा न पटणारी , आवडणारी वा न आवडणारी कुठल्याही वर्गात बसेल न बसेल ….पण कहाणी तर असेल तेवढंच समाधान !!!

स्त्रीची आत्मिक सौंदर्यापर्यंतची वाटचाल !!

सृ जनशीलता आणि सर्जनशीलता या दोन भिन्न पारिभाषिक संज्ञा आहेत.सृजन म्हणजे उत्पत्ती आणि सर्जन म्हणजे निर्मिती. प्रतिभेने सर्जनशीलता अंगात भिनवता येऊ शकेनही कदाचित पण सृजनशील असणे किंवा होणे कठीणच. म्हणूनच पु. भा. भावे म्हणतात ... ''दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे'' जन्मदात्री असणाऱ्या मातेचे म्हणजेच स्त्रीचे म्हणूनच सृजनशील म्हणून सर्वात मानाचे स्थान आहे. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी हे सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी अन अपरिहार्य अशी उदाहरण आहेत. आई नवा जीव जन्माला घालते. सृष्टी पर्यावरणात नवजागृती करते अन पृथ्वी उत्पन्न करते. म्हणून निसर्गाने निर्मिलेल्या या तिन्हीचे सृजनाशी हे असे शाश्वत नाते आहे. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वात्सलतेचा उपजतच वारसा मिळाला असला तरी या सर्वांपलीकडे ती स्वतःही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे विसरून कसे चालेल?? 'स्त्री' हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कधी आकर्षणाचा तर कधी वादाच...

स्वतःस पत्र (स्व-संवाद)

Image
प्रिय स्व, तुला आठवत का गं  .. मागल्या पहिल्या पावसातली ती पहिलीच संध्याकाळ,  एक अनामिक हुरहूर घेऊन आलेली बघ … अनोळखी उदासीन सांज. नुकतच ऑफिस मधून आले होते आधीच सकाळ पासून शांत झालेलं  मन अधिक शांत होत गेलं . खिडकीच्या बाहेर अवेळी दाटलेला अंधार खिडकीच्या ओट्यावर बसून बघतांना बाहेर आज वेगळंच चित्र रंगलंय असा आभास होत होता, कुंपणा पलीकडचा रोज दिसणारा चाफा गडद हिरव्या पाणावल्या रंगात डोलत होता.  काळेभोर आभाळ सांजेच्या सूर्याच्या छटा झाकोळून डोकावले आणि मन अजाणत्या विचारांच्या हिंदोळ्यावर आसीन झालं, कुठेतरी दूर बघत राहावं वाटत राहिलं, बाहेर निसर्ग सौंदर्याची लयलूट करत असूनही माझी नजर मात्र शून्यात कुठेतरी लांब विसावली होती. घरातली कामं खुणावत असूनही इच्छाच झाली नाही उठायची आतले दिवे पेटवायची. बाहेरच्या अंधारल्या मंद प्रकाशात सुरु होता 'शोध'  माहिती असल्या-नसलेल्या कसलातरी. खिडकीच्या अल्याड बसून मनातल्या खिडकीच्या पल्याडचा शोध. खिडकीकडलं अर्ध शरीर ओलं होतांना मनाच्या आतही काहीतरी ओलावत होतं…त्या ओल्या गारव्यात तरी हरवलेल्या पण रुखरुख लावून गेलेल्या, मनात रुतून ब...

संघर्ष दारूबंदीसाठी !!

Image
 दारूचा विषय आला की बव्हंशी पुरुषांची त्यावर एकछत्री मक्तेदारी असते. महिलांचा त्याच्याशी संबंध आलाच तर तो संघर्षाचा, दुःखाचा. दारूने आयुष्य उध्वस्थ होतात, संसार पणाला लागतात हे कितीही ओरडून सांगितले तरी त्याचा परिणाम नेहमी शून्यच. निव्वळ प्रबोधनाने बदल घडत नाही त्यासाठी लढा द्यावा लागतो, संघर्ष करावा लागतो, वेळ पडलीच तर त्यागही करावे लागतात. आणि असा लढा देणे सगळ्यांनाच शक्‍य होत नाही. नागपुर शहरालगतच्या हिंगण्यामध्ये निलडोह-डीगडोह परिसर आहे. तसे सुखासुखी जगणारी लोकं. भांडणतंटा नाही किंवा फार मोठ्या अडचणी नाहीत. एकदिवस मात्र अचानक मिळालेल्या एका बातमीने हादरला. गजानननगर मध्ये रहिवासी भागात जिथे सभ्य लोकांची वस्ती आहे, तिथेच शेजारी प्रार्थनास्थळ, शाळा आहे. अशा ठिकाणी दारूदुकान लागणार असल्याचे कळले आणि गावातील महिलांसमोर मोठा प्रश्‍न उभा ठाकला. सुखासुखी चाललेल्या आयुष्यात चटकन कुणीतरी मिठाचा खडा टाकावा, अशी स्थिती झाली. कुणालाच हे दुकान नको होते. पण पुढे होऊन लढणार कोण हा मोठाच प्रश्न होता. अशावेळी रचना कन्हेर पुढे सरसावल्या. रचना मागील तीन वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ...
मौन म्हणजे उणीव, उणीव शब्दांची जशी उजेडाची उणीव अंधार म्हणजे अंधारात नसतात पण 'सावल्या' दिसतात उजेडात उजेडात दिसणारी सावली अंधारासारखीच … काळीकभिन्न तश्या सावल्या असतील का शब्दांना शब्दांना मौनाच्या सावल्या … शांतसुन्न !!