Thursday, 17 March 2016

मैत्रीच्या प्रवासात उतार चढाव चालतातच गं, किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्यालाच ठरवायचं असतं. आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांनी चांगलंच वागावं, मित्रच असावं असं थोडंच आहे
चालून आलेल्या जाणत्या-अजाणत्या माणसांची, त्यांच्या आपल्या नात्याची
त्या ओळख असलेल्या नसलेल्या लोकांच्या सहवासातल्या वेगळ्या प्रवासाची
वेगळीच कहाणी लिहू शकतो …. त्याचाही इतिहास घडू शकतो. 
पटणारी किंवा न पटणारी , आवडणारी वा न आवडणारी
कुठल्याही वर्गात बसेल न बसेल ….पण कहाणी तर असेल
तेवढंच समाधान !!!

No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...