Thursday 17 March 2016

मैत्रीच्या प्रवासात उतार चढाव चालतातच गं, किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्यालाच ठरवायचं असतं. आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांनी चांगलंच वागावं, मित्रच असावं असं थोडंच आहे
चालून आलेल्या जाणत्या-अजाणत्या माणसांची, त्यांच्या आपल्या नात्याची
त्या ओळख असलेल्या नसलेल्या लोकांच्या सहवासातल्या वेगळ्या प्रवासाची
वेगळीच कहाणी लिहू शकतो …. त्याचाही इतिहास घडू शकतो. 
पटणारी किंवा न पटणारी , आवडणारी वा न आवडणारी
कुठल्याही वर्गात बसेल न बसेल ….पण कहाणी तर असेल
तेवढंच समाधान !!!

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...