Posts

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे  कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात  आणि कवितेतच माणसं शोधलीस  माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा ..  इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास ..  माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस ..  अरे कविता अश्रू पुसत नाही तिच्याजवळ खांदा नसतो रडायला  ती कुशीत घेऊन जोजवत नाही  मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही  कवितेला आई होता येत नाही  तिला बहिणीची माया देता येत नाही  प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही  तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही .. तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास  ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास  तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते  आत आत हेलावून क्षणभर सुखावते  सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते..  तिच्याकडून घेता येत नाही रे काही  तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी तिला सतत देत रहावं लागत असतं.. सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या न...
 आला आला रे डोंबारी त्याच्या हाती काठी दोरी पोरीसंगे तो दाखवतो फुटक्या जगण्याची लाचारी दोर टांगतो आकाशाला   तालावर पोरं नाचवतो टिचकीभर या पोटासाठी जीव दावणीला आंथरतो एकाएका पैशासाठी हात पसरतो दारोदारी  चिंध्यांचा संसार मांडतो उघड्यावरती भर बाजारी किती यातना सोसत जातो भोग कशाचे मोजत जातो सोस कशाचा नसे बापुडा बिनबोभाटा भोगत जातो रश्मी पदवाड  २३.११.२०

'स्वभान' जपणारी ग्रामीण स्त्री !

Image
 १८ व्या शतकाच्या शेवटी घडून आलेल्या औद्योगिक क्रांती, शहरी विकास आणि पुनर्जागृतीमुळे समाजात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल घडू लागले. त्यानंतरच्या काळात पश्चिमी देशांशी तुलना करत विकसनशील देशामध्ये जे परिवर्तन घडू लागले त्यालाच आधुनिकरण असे म्हंटले जाऊ लागले. हळूहळू तंत्रज्ञानाचा शोध, निर्मिती आणि वापर जसजसे वाढू लागले तसतसे जग अधिक जवळ येऊ लागले. सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या  वापरामुळे जगणे अधिक सुलभ सोप्पे होऊ लागले. भारतासारख्या विकसनशील देशात ह्याचे जास्त महत्व होते कारण एकतर पारतंत्र्याचा काळ भोगल्यानंतर शेकडो वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले म्हणून शून्यातून सुरुवात करून वैयक्तिक प्रगती आणि देशाचा निदान मूलभूत विकास या दोन्ही गोष्टी कमावणं काही खायचं काम नव्हतं. एका बाजूने हे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीला भुलून तरुण पिढी भौतिक सुखाकडे आकर्षिले जाण्याकडे कल वाढत होता. भारतीय समाजाच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या एकूण सांस्कृतिक जडणघडणीतच मुळात फरक असल्याने ह्याचे परीणाम वेगवेगळ्या स्तरावर होऊ लागले. एकंदरीत सर्व बाजूने गतीने बदल हो...

विस्मृतीचा श्राप ...

 अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे  आणि एक एक पाऊल पुढे चालतांना  घुप्प अंधार गवसत राहावा ...  आकाश, जमीन, प्रकाश  आणि सजीवांचे भास-आभास  सगळंच दूर-दूर पुसट होत,  ठिपका होत नाहीसे होण्यापर्यंत येऊन पोचावे ..  नाव, गाव ओळख मिटू लागावी,  भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये  माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या कथा  कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा  घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या.. आणि  यासर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या प्रथा  विघटित होऊन उडून जाव्या  ..    रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी वैचारिक भूमिका, बौद्धिक- मानसिक आंदोलनं गहिवरलेली स्पंदन विरावीत .. इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी   अनोळखी होत जावे सारे ..  अंधाराच्या पटलावर दूर चमकताना दिसेल काहीतरी धाव घेऊ नये मृगजळ असेल ते .. काळा कभिन्न परिसर, फसव्या दिशा  अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती  अनासक्त प्रवास ... आणि  अनवट भिवतीच्या अंधार वाटा ..  कुठे घेऊन ...
 जन्माच्याच वेळी सटवाई लिहिते तिच्या माथी - 'बाई' मग ती होते लेक, बहीण, बायको.. आई गात राहते आयुष्यभर पीडेतून उठलेली जीवनगर्द अंगाई .. गुणगुणते तटतटत्या वेदनेतून भावसमेवर आलेल्या अंतर्लयी .. ती छेडत राहते प्राणाच्या वीणेवर अम्लान सुखाची तान  पानगळीतही शोधत बसते मनाचे लसलसते हिरवे रान  उजवते चैतन्याची कूस अन शिवून घेते उसवलेले काळीजभान   चिंब ओल्या सांजपावसातही फुलवते जाणिवांचे विवर्त विराण  ती घेते नात्यांना खोल काळजात रुजवून  प्रत्येक कणाला भावओल देऊन देते मायेने भिजवून  रात्र रात्र पाहते स्वप्न - ठेवते सगळे जागवून आकांक्षांच्या उडत्या पाखरांना ठेवते पदरात निजवून  ती आणते रखरखत्या उन्हातून शीतल गारवा चोरून  वाटत फिरते प्रेम-जिव्हाळा ओंजळ भरभरून फाटक्या तुटक्या मोडक्या विटक्या गोष्टी ठेवते झाकून बोलते हसते रमते खेळते ..मुखवटा घेते ओढून.  रश्मी..
आयुष्यभर धावून धावून दमलेला असतो जीव .. त्यात तुम्ही नोकरी करणारे, घरचं बाहेरचं सगळंच सांभाळणारे असाल तर दमून, कावून, रापून गेलेला असतो जीव.. घरातल्या, गणगोतांच्या, संबंधातल्या, नात्यातल्या, माहितीतल्या, मैत्रीतल्या, भोवतालच्या सगळ्यांच्या फर्माईशी, इच्छा, अपेक्षा.. त्यांच्या त्यांच्या आपल्याबाबतीतच्या आकांक्षा पूर्ण करत राहणे, सगळ्यांची मर्जी सांभाळत जगणे .. अपरिहार्य असतं आॅफिस, तीथली कामं, कामाचा ताण, आॅफिस पाॅलिटीक्स, विवीध प्रकारची वृत्तीची माणसं सगळ्यांना फेस करणं, शिकणं शिकवणं, समजणं- समजावणं-समजून घेणं.. सतत गोतावळ्यात राहणं, सतत सगळं आणि सगळ्यांना ऍडजस्ट-मॅनेज करत राहणं .. पर्यायच नसतो तब्येतीच्या कुरकुरी तर कोपऱ्यातच ढकलायच्या .. या सगळ्यात मन दुखू द्यायचं नसतं .. दुखलं तरी दाखवायचं नसतं.. हसत राहायचं, सतत आनंदी दिसायचं .. या सगळ्यांवर उपाय म्हणून 'सुकून के पल' शोधत चार मित्र-मैत्रिणी शोधायच्या, एकत्र आणायच्या .. पण बरेचदा (नेहेमी नाही) इथंही फार वेगळं काही घडत नाही. माणसं कधी स्वार्थी असतात किंवा फार फार जजमेंटल निघतात.. कुठूनतरी कसेतरी पाठीत वार तरी होतात .. ...
तू गेल्यावर इथे सांडले गंध तुझ्या श्वासाचे तू गेल्यावर घट्ट जाहले बंध तुझ्या ध्यासाचे कातरवेळी तू स्वप्नांना हळुच जागर देतो अलगद येतो ओढून ऊब घट्ट मिठीची देतो तुझ्या भोवती फेर घालती माझ्या गंधित वेळा तू असण्याने शितल झाल्या तप्त उन्हाच्या ज्वाळा तव स्पर्शाची ओढ अनामिक व्याकुळ करते छळते मखमल शेजेवर दरवळते धुंद अशी तळमळते सहवासाच्या सुरम्यवेळी सांज सुखाची फुलते विरहामधली ओढ घेऊनी रात्र उशाशी झुरते तू गेल्यावर मन बावरते पापण ओले करते आठवणींची वेडी सर मग, श्रावण होत बरसते रश्मी पदवाड मदनकर ३०जुलै २०