Posts

संस्कृती पतनाचा महोत्सव !!

भारतीय संस्कृतीचा विचार करायला लागलो कि मनात अनेक भाव निर्माण होतात. अनेकविध संस्कृती तसे अनेक भाव. विविधतेत एकता शोधणारा म्हणून साऱ्या विश्वात आपण ओळखले जात असलो तरी खरच अनेकतेत एकता आहे का हा अभ्यासाचाच विषय आहे. संस्कृती म्हणजे नेमके काय ? संस्कृती हा शब्द एखाद्या समाजाला उद्देशून उद्गारला जातो ती जबाबदारी त्या समाजातील त्या गटातील म्हणजेच देशातील सर्वांची समान आहे कि मग धर्मप्रदाय, जातनिहाय ती ज्याने त्याने आपआपली सांभाळायची असते. हे मला तरी अजून समजलेले नाही. आणि संस्कृती जपणे म्हणजे तरी काय ? पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या, ग्रंथ-साहित्यात नोंदवून ठेवलेल्या गोष्टींचा नोंदींचा तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीनुरूप विचारही न करता आजच्या आपल्या शिक्षणातून मिळालेल्या दृष्टीला गृहीतही न धरता डोळे झाकून केलेल्या अनुकरणाला धर्म किंवा संस्कृती जपणं म्हणता येईल का ? दिवसेंदिवस आपल्या संस्कृतीचे आपल्या सणांचे बदलत जाणारे रूप पाहिले कि कसनुसंच होतं. धर्मांचे होत चाललेले विघटीकरण किंवा माणसांच्या भावविश्वातून नाहीसं होत चाललेलं संवेदन-माणूसपण कुठेतरी संस्कृती जपण्याऐवजी तिला विकृत रू...

महिला अपमानाची "पाळी"

योगायोगानेच वाचनात आलेला निरेन आपटे यांचा अप्रतिम लेख ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ महिला अपमानाची "पाळी" -निरेन आपटे. एक अतिशय गरीब कुटुंब होतं. घरात खायला दाणा शिल्लक नव्हता. जेव्हा घरावर संकट येतं तेव्हा पहिला फटका घरातल्या स्त्रीला बसतो. चिलापिलाना पोटभर खाता याव म्हणून ती उपाशी राहते. नवर्याला कपडे मिळावेत म्हणून स्वतः एका साडीवर अनेक महिने ढकलते. आणि कधी bulb चे सुट्टे भाग जोडण्याच काम मिळवून दिवसाला ५० रुपये कमावते, कधी भाजी विकते तर कधी जे पडेल ते काम करते. जेव्हा त्यातूनही घर चालत नाही तेव्हा शरीर विकायला सुरुवात करते. ह्या कुटुंबातील महिलेनेही तोच मार्ग स्वीकारला. शरीर विकायला सुरुवात केली... तिला ग्राहक मिळाले सभ्य लोकांच्या वस्तीत. तिथे राहणारे सर्व प्रतिष्ठित होते. एक MBA होता, दुसरा डॉक्टर आणि तिसरा बँक Manager ....अशी शिकवू मंडळी जिथे राहते तिथे नगरसेवक तयार होतोच. त्याला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचायचं असतं. तो समाजकार्याची संधी शोधत असतोच....त्याला ह्या महिलेची माहिती मिळाली. समाजसेवेची संधी चालून आली. एके दिवशी ती भर वस्ती...

कुठेतरी काहीतरी चुकतंय का ?

पकडायला गेलं कि सुटतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? मनात असतं खूप काही बोलायला मात्र शब्दच नाही शब्दांच्या वाटेने अश्रूंच्या लाटेने काहीतरी कुठेतरी भिजतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? हळूच काहीतरी डोकावून जाई स्वप्नात पाहण्याची नुसतीच घाई वाट तुझी पाहून रात्र जागी राहून स्वप्नंच कुठेतरी तुटतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? विचारांना आताशा दिशाच नाही अविरत कुठेतरी भटकत राही सांधायचा प्रयत्न करतेय तरी कुठेतरी काहीतरी हुकतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? अलवार येतो भावनेचा आवेग अश्रूंच्या बांधाला सुटतो वेग कुठेतरी मनात आत आत गाभ्यात कुठेतरी काहीतरी सलतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? (c) रश्मी / २०/०५/२०१३

एक क्षण !!

आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला सुटला, आणि पुढ्यात येउन बसला म्हंटला … काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ?? तुही घे विश्रांती एकाच क्षणाची होऊन दे जरा शांती मनाची क्षण हा क्षणाने वाहून जाईल क्षणभर जरी विसावून जाईल दुसऱ्याच क्षणात शिरशील तू वेडे, मला विसरशील तू नव्याने पुन्हा जगायला शिक विसरून मला जगाला जिंक बघेन तुला याच धर्तीवर यशवान होतांना कीर्तीवर मी हळहळले, मुसमुसले हात धरून क्षणाला... म्हणाले क्षणा आयुष्य क्षणांनी जगतेय मी सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी क्षणात सारे विखरून जाईन तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे जगण्याचं गणित मांडणार आहे. आयुष्याचा क्षणही भागला तरी जगणंच माझं थांबणार आहे . (c) रश्मी / ५ जून २०१४ (प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !

Image
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते. ‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता, पण वाती भिजलेल्या नसतील, धुपारतीची वेळ होईल लवकर अन् माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’ असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्...

लव कि जिहाद ?

लव जिहाद - मागल्या काही महिन्यांपासून प्रचंड उहापोह होणारा विषय चावून चावून चोथा झालेला पण अजूनही चर्वित चर्वण सुरूच असलेला. चर्चा, वाद, संवाद आणि काय काय पण अजूनही विषयाला खरा संदर्भ न लाभलेला  गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलं आणि सर्व देशात जरथंड झालेल्या धार्मिक चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. पण प्रश्न निर्माण होतो तो हा कि कुठून पेव फुटलं या विषयाला आणि किती सत्यता आहे त्यात ?  ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि गट यात सामील असल्याचे निदर्शनात आले तसेच ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सॉफ्ट टार्गेट ठरतात . त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. …. यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्ता...

सोशल मिडीया आणि आमच्या अस्मिता !!

Image
प्रत्येक तंत्रज्ञानाचा शोध हा गरजेतून लावला जातो. जगणे सोपे व्हावे हा खरा उद्देश. उर्जेची बचत, वेळेची बचत आणि कमी श्रमात अधिक कार्य या गरजा लक्षात घेता त्यासाठी लागणारी सोय म्हणून नवनवीन शोध लावले जातात आणि त्यानुसार नवनवीन तंत्रज्ञान आमच्या दिमतीला तयार होत असतात. आजचे युग म्हणजे 'सोशल मिडिया'चे युग. आजची पिढी या स्वप्नील विश्वात पुरती डुंबून गेली आहे. इलेक्ट्रॉनिक जगातली हि एक नवीच कम्युनिटी तयार झाली आहे. इथेंच सगळं जग आणि हेच आमचं जगणं असं काहीसं होऊन बसलं आहे. सोशल मीडियाच्या भिंतीत गाडून घेतोय आपण सर्व स्वतःला, न दिसणारा पिंजराच पण इतकं गुरफटले जातोय कि     आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने वाहवत जातोय ह्याचं भानही उरलेलं नाही. मागल्या काही दिवसात जे काही घडलं, घडतंय ते पाहता खरतर काळजीपोटी भीतीच वाटू लागली आहे. तळागाळाला गेलेलं राजकारण, दुषित होत चाललेलं समाजकारण आणि विकृत ध्येयानं वखवखलेला अन त्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार असणारा, वैचारिक घाणीनं माखलेला एक विशिष्ट समाज. सोशल मीडियावर आपल्या वागण्याची, भाबड्या भावना, बिनबुडाच्या अस्मिता अश्या मूर्खपणाच्य...