Monday, 31 October 2016

मिसाल-ए-हिम्मत - नादिया मुराद

 ब्रिटनने इराकवर युद्ध लादले तेव्हा 'ती' केवळ 8 वर्षांची होती. देशावर संकट कोसळलंय पण आपल्यासाठी पुढे आणखी काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही तेव्हा तिला आला नसावा. 2014 - दिवसेंदिवस अस्थिर होत कोलमडून पडलेल्या इराकी शासन व्यवस्थेचा सोयीस्कर गैरफायदा घेत धर्माच्या भ्रामक कल्पनेवर जगणाऱ्या 'इसिस' सारख्या खुंखार आतंकवादी संघटनेने तेथे आपले पाय पसारायला सुरुवात केली. हळूहळू कित्तेक भागावर जोम बसवला, तेथील दुर्बल घटकांवर विशेषतः गैरमुस्लिम याझिदी वंशाच्या लोकांवर अत्याचार होऊ लागले. अनेक यजिदी देशोधडीला लागले, अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. अजूनही इराकमध्ये रक्ताचे पाट वाहतच  आहेत. ज्या लोकांनी जीव वाचवून पळ काढला ती नशीबवान ठरली, पण जी माणसं त्यांच्या तावडीत सापडली  ती एकतर जीवे गेली किंवा या अतिरेक्यांच्या क्रौर्याचे शिकार झाले. २०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना आयसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. अश्याच इसिसच्या तावडीत सापडलेल्या आणि नरकयातना भोगून परत आलेल्या एका 23 वर्षांच्या साहसी तरुणीची नादिया मुरादची हि चित्तथरारक कथा! ती ऐकतांना कुठल्याही पापभिरू माणसांचा कंठ दाटला नाही तरच नवल.

तिचा जन्म इराकमधल्या जिंजर प्रांतातला. अवघ्या हसण्या खेळण्याच्या वयात नादियाने जगाचा भेसूर चेहेरा अनुभवला. त्या भोगलेल्या यातनांना धाडसाने तोंड देतांना ती स्वतः मात्र प्रगल्भ होत गेली. आज ती याझिदी वंश हक्क कार्यकर्ती म्हणून नावाजली जाते आहे. तिचे नोबेल पारितोषिक व साखारोव पुरस्कारासाठी नामांकन देखील झालेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाची सदिच्छादूत म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा एकदा ती प्रकाश झोतात आली. नादिया सोबत झालेल्या भयावह अत्याचारांबद्दल तिने 2015 च्या यूएन सेक्युरिटी कौन्सिलमध्ये खुलासा केला होता. याझिदी महिलांवर बळजबरी, छळवणूक आणि लैंगिक शोषण करत क्रौर्याच्या सर्व सीमा लंघून पाशवी अत्याचार केले जातात. गैरमुस्लिम असल्याने याझिदी समाजाच्या महिलांना मरणयातना दिल्या जातात. असे ती ओरडून जगाला सांगते आहे.

तिची करुणकहाणी ऐकतांना अंगावर शहारे येतात. इसिसचे प्रस्त कायम व्हावे म्हणून या अतिरेक्यांनी दंडुके वापरून निर्दोषांचा हकनाक बळी घेऊन उच्छाद मांडला होता. त्या काळात तिच्या संपूर्ण कुटुंबाला घरात घुसून घेऊन जाऊन गुलामगिरीत ठेवण्यात आले होते. 300 पुरुषांसमोर तिलाही ताब्यात घेण्यात आले, काही दिवसांनी तिच्या डोळ्यादेखतच तिच्या आईवडिलांना मारून टाकण्यात आले. तिच्या आठपैकी सहा भावांना ठार करण्यात आले. नंतर दोन बहिणी,  दोन चुलत बहिणी व पुतणी यांना आयसिसच्या दहशतगरदांची वासना शमवत, बलात्कार करतच मोसुलला पाठवण्यात आले. तिच्यावर एकेक दिवसात अनेकानेक पुरुषांनी कित्तेकदा पाशवी बलात्कार केले, तिच्या शरीराचे लचके तोडले जायचे, मारहाण सहन करावी लागायची. बलात्कार केलेल्या पुरुषांची ओळख तिला कधीही पटू दिली नाही. तीन महिने ती इसिसच्या तावडीत सेक्स स्लेव्ह (लैंगिक गुलाम) म्हणून राहिली. तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला पण ती पकडली गेली. शिक्षा म्हणून सहा सुरक्षा रक्षकांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला, आणि नंतर तिच्यावर होणारे अत्याचार अधिकच वाढत गेले. एकदा ती एकटी असतांना तिने तिथून पळ काढला. मोसूलच्याच एका मुस्लिम परिवाराच्या मदतीने ती कुर्दीस्थानात पोचली. शरणार्थी शिबिरातही न्याय मिळवायला ती लढत राहिली. कित्तेक महिन्यांनी जर्मन सरकारने या शरणार्थीपैकी 1000 लोकांची मदत करण्याचे घोषित केले. नादिया त्यापैकी एक नशीबवान ठरली आणि तिने जर्मनीची शरणागती पत्करली. तिच्यावर उपचार होत असतांना तिथल्याच एका स्वयंसंघटनेने तिला यूएन मध्ये जाऊन आपबिती सांगण्याचा सल्ला दिला आणि नादिया जगासमोर बोलती झाली.

इसिसच्या माजोरड्या दहशतवादी थैमानाच्या कथा सांगून सारे विश्वच असुरक्षित असल्याचा संकेत देत नादियाने संयुक्त राष्ट्राला यावर कार्यवाही करण्यास चेतवले आहे. नादियाच्या जिद्दी, चिकाटी अन साहसी प्रवृत्तीचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. तिच्या भाषणाचाच असर कि काय कि, 'इराकवर आम्ही लादलेल्या युद्धामुळेच इसिससारख्या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला' अशी धडधडीत कबुली ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिली आहे. टोनी ब्लेअर यांनी इराकवरील हल्ल्याची केवळ चूकच कबूल केली नाही तर इराकवर लादलेल्या युद्धाबद्दल सपशेल माफीही मागितली आहे....
नादिया आज ब्रिटनमध्ये राहते आहे आणि तिच्यासारख्याच पीडित अत्याचारग्रस्तांसाठी धैर्याने कार्य करते आहे..




Monday, 24 October 2016

काही नाण्यांची खणखण अन काही नोटांची फडफड
खिशात होत राहावी म्हणून अक्ख आयुष्य वनवन करतो माणूस
सगळं जग भटकून अखेर हातात उरतं काय ... तर निव्वळ ओंजळभर रान  

शब्द ..

मनाशी मनाचं बोलत राहतात शब्द
इकडे तिकडे डोलवावेत
तसे डोलत राहतात .....

गच्चं रानात आढळावी एखादी
अनवट पायवाट आणि
वाटेचे शेवटचे टोक शोधत
अंधारात चाचपटत
चालत जावे सरळ,  तसे
चालत राहतात विचार रात्रभर
बरसत राहतात, अनंत जुने संदर्भ
आठवणीच्या सरींनी भिजून
पाझरत राहतात आत बाहेर
थेंब थेंबाने ओथंबून वाहू लागतात

दूर कुठेतरी क्षितिजावर
शुक्रतारा चमकत राहतो
तसा मग एखादाच विचार
गहिवरून येतो स्मृतीपटलावर
तरंग उठवतो मनाच्या तळ्यात
अन अखंड लुकलुकत राहतो तेथेच
रात्रभर ….

डोळे टक्क उघडे
नजर छताकडे
ध्यान शून्यात ….
अपरिहार्य …. अटळ
हा विचारांचा डोलारा…. मनभर

रात्र सरते ... हळूच मग
विचारांना पंख फुटतात, 
अन भिरभिरतात ... शब्द
मनाशी मनाचं बोलत राहतात
इकडे तिकडे डोलवावेत
तसे डोलत राहतात …शब्द !!

Sunday, 23 October 2016

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||


बघ, वाच, ठरव !

माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन.
01) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
02) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
03) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!

04) माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.
तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

05) जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

06) आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

07) प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

08) अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

09) माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.

10) आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

- युवर डॅड

( एका हॉँगकॉँगच्या टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र असं म्हणतात  हे इंग्रजी पत्र सध्या व्हॉट्सअॅपवर फिरतंय. त्याचा हा मराठी अनुवाद.)

Saturday, 22 October 2016

Rj Shubham We will miss u ..



'हाय नागपूर' अशी हाक मारणारा शुभम अकस्मात नाहीसा झालाय, त्याचा आवाज गहाळ झालाय आता तो कधीच ऐकायला येणार नाही हि बातमी सर्वच नागपूरकरांसाठी धक्कादायक आहे. सकाळी सकाळी 7 वाजता  ‘रेडिओ मिरची ९८.३’ ट्यून केले कि नागपुरी लहेजा असणारा एक बिंदास आवाज ऐकायला यायचा हा आवाज म्हणजे कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि सवयीचा भाग झाला होता. हा आवाज होता आरजे शुभमचा. 'लाईफ में हो झोलझाल तो शुभम को बोल डाल' असं ठणकावून सांगणारा 24 वर्षांचा शुभम, . रोज नागपूरकरांच्या हृदयाचे स्पंदने वाढविणारा शुभम इतक्या कमी वयात हृदयआघाताने जाईल अशी कल्पनाही करवत नाही. Shubham We will miss u ..
शुभमच्या दुःखातून सावरण्याची ताकद त्याच्या परिवाराला दे प्रभू. इतकेच मागणे


Wednesday, 19 October 2016

महाश्वेतादेवी कि कविता

Beautiful lines by Mahadevi verma !          

आ गए तुम?
द्वार खुला है, अंदर आओ..!

पर तनिक ठहरो..
ड्योढी पर पड़े पायदान पर,
अपना अहं झाड़ आना..!

मधुमालती लिपटी है मुंडेर से,
अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..!

तुलसी के क्यारे में,
मन की चटकन चढ़ा आना..!

अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..!

जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..!

बाहर किलोलते बच्चों से,
थोड़ी शरारत माँग लाना..!

वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है..
तोड़ कर पहन आना..!

लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो..
तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..!

देखो, शाम बिछाई है मैंने,
सूरज क्षितिज पर बाँधा है,
लाली छिड़की है नभ पर..!

प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है,
घूँट घूँट पीना..!
सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

सोंग


जगण्याचाच शाप झालाय
मृत्यू पावलय सगळंच
संवेदनेचा मृत्यू
सहिष्णुतेचा मृत्यू
जगण्यासाठी लागणाऱ्या
संभावनेचा मृत्यू

मृत्यू पावलाय माणूस
माणसातलं माणूसपण
मरण पावलंय जगणं
जगण्यातलं मीपण

विचार मेलेत, आचार मेलेत
मेलेत सगळे संस्कार
मेलीय ओळख, मेलाय संवाद
उरलाय केवळ अंधार

मेली मैत्री मेलंय प्रेम
नातीही मृत्यू पावली
मेला जिव्हाळा नि मेली माया
उरलीय केवळ काया

आता जगतायेत अर्थहीन सुरावटी
रंगरंगोटी चढवलेला मुखवटा
आयुष्य सरकत राहते 
जिवंतपणाची खून शोधत
उंची गाठता गाठता
हरवलेली खोली शोधत

उडण्याचे स्वप्न पाहत
मरण्याआधीची कन्हती आत्मा
त्याच त्याच वर्तुळात भटकत राहते
वांझोट्या अपेक्षांचे बोचके कोंबत
प्राणहीन शरीर सोंग वठवत राहते



Rashmi  / 19/10/2016









Friday, 14 October 2016

कहो - अमृता प्रितम

वह कहता था,
वह सुनती थी,
जारी था एक खेल
कहने-सुनने का।

खेल में थी दो पर्चियाँ।
एक में लिखा था *‘कहो’*,
एक में लिखा था *‘सुनो’*।

अब यह नियति थी
या महज़ संयोग?
उसके हाथ लगती रही वही पर्ची
जिस पर लिखा था *‘सुनो’*।

वह सुनती रही।
उसने सुने आदेश।
उसने सुने उपदेश।
बन्दिशें उसके लिए थीं।
उसके लिए थीं वर्जनाएँ।
वह जानती थी,
'कहना-सुनना'
नहीं हैं केवल क्रियाएं।

राजा ने कहा, 'ज़हर पियो'
*वह मीरा हो गई।*

ऋषि ने कहा, 'पत्थर बनो'
*वह अहिल्या हो गई।*

प्रभु ने कहा, 'निकल जाओ'
*वह सीता हो गई।*

चिता से निकली चीख,
किन्हीं कानों ने नहीं सुनी।
*वह सती हो गई।*

घुटती रही उसकी फरियाद,
अटके रहे शब्द,
सिले रहे होंठ,
रुन्धा रहा गला।
उसके हाथ *कभी नहीं लगी वह पर्ची,*
जिस पर लिखा था, *‘कहो'*।

-Amrita Pritam

Tuesday, 27 September 2016

स्मिताच्या स्मृतीने दरवळणारा पुरस्कार

उत्कृष्ट अभिनयाचं कौशल्य हे नुसतेच सुंदर दिसण्यावर कसे भारी पडू शकते ह्याचे सर्वात जिवंत उदाहरण कायम केले ते स्मिता पाटील हिने. हिरोईन व्हायचं असेल तर गोरं चामडं आणि रूपवती असलंच पाहिजे हे भारतीय चित्रपटांचं शतकात चोख बसलेलं सूत्रच बदलवून टाकणारी मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणारी हि गुणी लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील.
 या अभिनेत्रीने हिंदी- मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटील यांना जाऊन आज 30 वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव अग्रगण्य ठरते. तिच्या नंतरही कित्तेक हिरोईन आल्या अन गेल्या पण भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवलेली स्मिता कधीच सिनेरसिकांच्या विस्मरणात जाऊ शकली नाही.

दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या स्मिता पाटीलची आत्ता इतकी ठळक आठवण येण्याचे कारण म्हणजे हल्लीच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिला 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. तिला या पुरस्काराची घोषणा झाल्यापासूनच नेटिझन्स सोशल नेटवर्किंग साईटवरून तिला ट्रॉल करीत तिची खिल्ली उडवत आहेत. आपल्या मनात असणाऱ्या स्मिता पाटीलची अजरामर छबी कतरिनाच्या रूपात पाहणे रसिकांना मान्यच नसल्याचे यावरून लक्षात आले.

पण हे सगळे कतरिनाच्याच वेळी का घडावे हा प्रश्नही उभा राहतो. यापूर्वी हा पुरस्कार तन्वी आझमी, श्रीदेवी, मनीषा कोयराला, उर्मिला मातोंडकर, तब्बू, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पण कतरिनाला या पुरस्काराने सन्मानित करण्याच्या निर्णयावर मात्र वादंग सुरु झाले. कतरिनाला बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन तब्बल दहा वर्ष झालीत. सध्य स्थितीत आघाडीची अभिनेत्री असूनही कतरिनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही छाप सोडू शकले नाही. गेल्या दहा वर्षात चित्रपट सृष्टीला तिने दिलेले योगदान कलेच्या अनुषंगाने पाहिल्यास फार वाखाणण्यासारखे जरी नसले तरी, तीने वारसाहक्काने इथे प्रवेश केला नव्हता. डोक्यावर हात धरणारा कुणी नसतांनाही इथे टिकण्यासाठी, तग धरून धैर्याने पाय रोवत स्वतःला सिद्ध करत राहणे यासाठी तिने घेतलेले कष्ट नाकारता येणार नाही. यापुढेही ती काम करणार आहे तेव्हा तिच्याकडून चांगल्या चित्रपटांची अपेक्षाही इथे संपत नाही.


समांतर चित्रपटातील अभिनयातून रसिकांच्या मनामनात अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिताचे 'मंथन' 'अर्थ' 'भूमिका' 'आक्रोश' तसेच मराठीतले 'उंबरठा'  'जैत रे जैत' सारखे चित्रपट सिने इतिहासात अजरामर ठरले.ज्या चित्रपटांनी समांतर आणि मनोरंजनाचा योग्य समतोल साधला. तिने स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. व्यावसायिक चित्रपट तिची प्राथमिकता कधीच होऊ शकले नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले. तिच्या याच सामाजिक बांधिलकीचे आणि भारतीय चित्रपटांना दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी सन्मान म्हणून 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' प्रियदर्शनी अकॅडमीतर्फे देण्यात येतो.

अभिनयासोबतच सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजच्या काळातल्या प्रत्‍येक अभिनेत्रीने जपावा. कतरिना सारख्या महेनती कलाकाराने तसेच आजतागायत या पुरस्काराने सन्मानित इतर अभिनेत्रींनीं देखील स्मिता पाटीलचा हा वारसा पुढे चालवावा. पुरस्कार घेतांना ती तंतोतंत तशीच छबी असावी, तसेच योगदान दिलेले असावे, तीच प्रतिष्ठा प्राप्त असावी असा त्याचा अर्थ होत नाही. तर योगदानाबरोबरच भविष्यात तशी जाणीव निर्माण व्हावी, तसा आदर्श घडवणारा प्रयत्न केला जावा, त्यासाठी प्रोत्साहन मिळावे ह्याच हेतूने हा पुरस्कार देण्यात येतो. कतरिनाला ह्यासाठी हा पुरस्कार मिळालाय असे गृहीत धरले तर आता वाटतेय तसे आश्चर्य वाटणार नाही. आणि  'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण सर्व तिचे अभिनंदनच करू. 




 

हाक - बलुचिस्थानची

 लुचिस्थान मधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष करीमा बलोच हिने नुकतंच एका विडिओद्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भावुक करणारा संदेश पाठविला होता. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ संदेश मोदींपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करीमाने केला त्यात तिने म्हंटले होते कि, 'बलुचिस्थान मधल्या महिला तुम्हाला भाऊ मानतात, पाकिस्तानच्या चांगुल मधून स्वतंत्र करण्यास आपण पुढे येऊन आमची मदत करावी.' मोदींना भाऊ संबोधून बलूचमध्ये सध्या सुरु असलेल्या नरसंहार, अपराधीक घटना, अत्याचार विरुद्ध त्यांच्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी करावी. त्यांच्या पाठी उभे राहावे असे आवाहन तिने केले होते. नरेंद्र मोदी दर महिन्याला देत असणारा संदेश 'मन कि बात' चे प्रसारण आता बलुचिस्तानात बलूच भाषेतही होणार यासाठी केंद्र सरकारने आता परवानगीही दिली आहे. 

भारताने पाकिस्तानसाठी नीतीत अचानक काही बदल घडवून आणले आणि पाकिस्तानात खळबळ माजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या भाषणातून पाकिस्तानमधील अधिकृत काश्मीर आणि बलुचिस्थान मधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आवाज उठवला आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन असल्याचे बोलून दाखवले आणि बलुचिस्थान मधील नागरिकांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वेगवेगळ्या संस्था संघटनांमधून मोदींना मदतीसाठी आव्हान करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांचे अत्याचार अधिकच तीव्र झाल्याच्या झळा उठू लागल्या. बलूच रिपब्लिकन पार्टीचे नेते अब्दुल नवाज बुगती यांच्यानुसार पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या लोकांवरील अत्याचारात वाढ केली आहे. पाक लष्कराद्वारे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे बुगती यांनी सांगितले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बलुचिस्तानच्या बोलन क्षेत्रातून 40 पेक्षा अधिक महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. पाकिस्तान बलुचिस्तानात सातत्याने आपले अत्याचार वाढवत आहे. बलुचिस्तानात मानवाधिकार उल्लंघनाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पाककडून तेथे ‘मारा आणि फेका’ धोरण अवलंबिले जात असल्याचा दावा बलूच कार्यकर्त्या फरजाना मजीद बलूच यांनी केला.

पाकिस्तानासारख्या देशात रुढीपरंपरावादी लोकांमुळे महिलांची परिस्थिती फारच वाईट आहे. मानवाधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्या फर्जाना मजीद बलूच हिनेतर सध्या बलुचिस्तानमध्ये महिलांवर केले जाणारे अत्याचार, नरसंहार आणि मानवाधिकार उल्लंघनाची तुलना 1971 साली झालेल्या बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संग्रामसोबत केली. पाकिस्तानी सैनिकांद्वारा बलूच महिलांना लक्ष्य करून सूड उगवणे हे 1971 मध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराएवढे पाशवी असल्याचे त्या बोलल्या. बलूच मधून विद्यार्थी नेते जाकीर माजिदच्या बहिणीने मजीद बलुचने डूरा बुगतीच्या वेगवेगळ्या भागातून महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर पाशवी अत्याचार होत असल्याचा गौप्य स्फोट केला. राजकीय दृष्ट्या पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या किंवा स्वान्त्र्यासाठी आवाज उठविणाऱ्याव महिलांचे वर्चस्व संपुष्ठात आणण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने येथे अभियानाचा राबवले असल्याची माहिती अब्दुल नवाज बुगती यांनी दिली.

14 ऑगस्ट या पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी कला दिवस मनावणाऱ्या बलूच लोकांनी 15 ऑगस्ट हा भारतीय स्वतंत्रता दिवस अतिशय हर्षोल्लासात साजरा केला होता. बानूक झरीना बलूच या बलुची महिलेने 15 ऑगस्टला एका छोट्या मुलाचा हात ज्यावर भारतीय झेंडा रंगवला होता आणि त्यात आई लव्ह इंडिया असे लिहिलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता म्हणजेच लहानमुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोदींकडून अपेक्षा असल्याचे त्यातून संदेश देण्याचा हा प्रयत्न होता.



  • बलुचिस्थान मधील उइगर नेता डोल्कुन ईसा हिला भारताने हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे राहणाऱ्या तिब्बतींचे  सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा ह्यांना भेटण्यासाठी वीजा मान्य केला आणि पाकिस्तानसकट चीनमध्ये सुद्धा भारतविरोधी सूर उमटू लागले. डॉकुन इसा हि चीन मध्ये आतंकवादी प्रमुख म्हणून प्रतिबंधित आहे. याआधीही भारताने बलूच नेता नीला कादरीला व्हिजा दिला होता तेव्हा त्यावर पाकिस्तानातही असाच विरोधाचा स्वर उमटला होता. 


  • बलुचिस्थान पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ते पाकिस्तानचे सर्वात मोठे राज्य आहे. पाकिस्तानचे जवळ जवळ 44% क्षेत्रफळ बलुचिस्तानने वेढले आहे. येथील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 7% म्हणजेच जवळ जवळ 1.3 करोड एवढी आहे. इथे राहणाऱ्या नागरिकांना बलूच नागरिक असे संबोधिले जाते. या प्रदेशाला 'ब्लैक पर्ल' किंवा 'काला मोती' देखील म्हणतात. तेल, गॅस, सोने, तांबे अश्या नैसर्गिक संपत्तीने हा प्रदेश संपन्न आहे.




Monday, 19 September 2016

वैनगंगा ..

भंडाऱ्या जिल्ह्यातील लाखनी वरून परतीच्या रस्त्यावर, धावत्या गाडीतून सूर्यास्ताच्यावेळी घेतलेले हे वैनगंगा नदीचे  चित्र 







Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...