एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे परत येतं, याउलट असेही की जे जे मिळवलेलं असतं...स्वतःच्या कष्टाने, कर्माने किंवा ओरबाडून देखील; ते कधीतरी कुठेतरी कोणत्यातरी रूपात तुम्हाला परत करावं लागतं. त्याच व्यक्तीला करावं लागेल असंही नाही; पण ते परतावं लागतं हे निश्चित. कर्माचा सिद्धांत म्हणा किंवा जगण्याचे नियम. आयुष्य जसजसं पुढं जात राहतं आणि जाणीवा प्रखर होतात तसतसे हे अनुभव अधिकच ठळकपणे प्रखर स्वरूपात जाणवायला लागतात. हल्ली मला एक गोड आठवण सतत येत असते, माझा मुलगा ओम आठ महिन्यांचा असताना आम्ही नागपूरहून मुंबईला शिफ्ट झालो आणि तो दोन अडीच वर्षांचा असताना मी मुंबईत जॉब जॉईन केला होता. माझ्या सिनिअर असणाऱ्या मॅडमचा या अडीच वर्षांच्या ओमवर फार जीव जडला होता. त्याचे त्या लाड पुरवायच्या, फोनवर त्याच्याशी बोलत बसायच्या. त्या कुठेही बाहेर गेल्या की त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायच्या. कधी गिफ्ट्स कधी खाऊ. हा सिलसिला काही वर्षे निरंतर चालू होता. त्यावेळी त्यांचा मुलगा टीनेज होता. आता माझा मुलगा ...
Popular posts from this blog
रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत. गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जिथं प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथंच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामा...
राधा-अनय
शिरीन कुलकर्णी यांचा एक आवडलेला लेख - ' त्रिधा राधा ' या पु.शि. रेग्यांच्या कवितेने मनावर घातलेली मोहिनी किती वर्षं कायम आहे. राधा-कृष्णाच्या अधिकाधिक तरल आणि सखोल होत जाणाऱ्या नात्याचे पदर अजूनही हळुवारपणे उलगडावेसे वाटणारे ! राधा - कृष्णाची जादू अजूनही भारतीय साहित्यावर पसरून राहिलेली ! अरुणा ढेरे यांची 'अनय ' ही कविता वाचली आणि सवयीच्या वाड्यातले एक अनोळखी दालन एकदम उघडावे, तसे काहीसे वाटले. राधेचा पती 'अनय ' याचे कायमच धूसर राहिलेले चित्र उजळून निघाले आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या या अनोख्या दर्शनाने मन चकित आणि हर्षभरित होऊन गेले . राधेला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श जितका उत्कट, तितकीच तीव्र अनयाची तिला समजून घेण्याची क्षमता ! राधा तर नक्षत्रांच्या गावातून अनयाच्या घरात उतरली होती. तिला तो दिव्य निळा स्पर्श लाभलेलाच होता आणि निळेपणाच्या मूर्त रूपावरून आपल्या जिवाची कुरवंडी करण्यासाठीच ती पृथ्वीतलावर अवतरली होती . देवत्वाचे अधिष्ठान म्हणजे आभाळ असे जर म्हटले, तर कृष्णाचा रंग आभाळासारखा मेघश्याम असणेही ही स्वाभाविकच आणि नक्षत्रांच्या गावातून उतरलेल्या राधेच...






Comments
Post a Comment