Sunday, 12 March 2017

बुज़ुर्गों के कमरे से होता हुआ
सीढ़ियों से गुज़र के ,
दबे पाँव छत पे चला आया था मैं ,
मैं आया था  तुमको जगाने
चलो भाग जायें ,
अंधेरा है और सारा घर सो रहा है,
अभी वक़्त है
सुबह की पहली गाड़ी का वक़्त हो रहा है !!
अभी पिछले स्टेशन से छूटी नहीं है !
वहाँ से जो छूटेगी तो गार्ड इक लम्बी सी कूक देगा !!
इसी मुँह अंधेरे में गाँव के "टी-टी"से बचते बचाते ,
दोशालों की बुकल में चेहरे छुपाये
निकल जायेंगे हम
मगर तुम
बड़ी मीठी सी नींद में सो रही थीं,दबी सी
हँसी थी लबों के किनारे पे महकी हुई ,
गले पे इक उधड़ा हुआ ताँगा कुर्ती से निकला हुआ,
साँस छू छू के बस कँपकपाये चला जा रहा था ,
तर्बे साँसों की बजती हुई हल्की हल्की,
हवा जैसे सन्तूर के तार पर मींढ लेती हुई,
बहुत देर तक मैं सुनता रहा
बहुत देर तक अपने होंठों को आँखों पर रख के
तुम्हारे किसी ख़्वाब को प्यार करता रहा मैं,
नहीं जागीं तुम
और मेरी जगाने की हिम्मत नहीं हो सकी लौट आया !!
सीढ़ियों से उतर के बुज़ुर्गों के कमरे से होता हुआ
मुझे क्या पता था कि मामू के घर से उसी रोज़ ,
वह तुमको ले जायेंगे
तुम्हें छोड़कर
ज़िन्दगी इक अलग मोड़ मुड़ जायेगी !!

गुलज़ार

किताबें झाँकती हैं...

किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से
बड़ी हसरत से तकती हैं
महीनों अब मुलाकातें नहीं होती
जो शामें उनकी सोहबत में कटा करती थीं
अब अक्सर गुज़र जाती है कम्प्यूटर के पर्दों पर
बड़ी बेचैन रहती हैं क़िताबें
उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है
जो कदरें वो सुनाती थी कि जिनके
जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधरे-उधरे हैं
कोई सफा पलटता हूँ तो इक सिसकी निकलती है
कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं
बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो अल्फ़ाज़
जिनपर अब कोई मानी नहीं उगते
जबां पर जो ज़ायका आता था जो सफ़ा पलटने का
अब ऊँगली क्लिक करने से बस झपकी गुजरती है
किताबों से जो ज़ाती राब्ता था, वो कट गया है
कभी सीने पर रखकर लेट जाते थे
कभी गोदी में लेते थे
कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर
नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से
वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी
मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल
और महके हुए रुक्के
किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नही होंगे!!

*गुलजार*🍃

Thursday, 9 March 2017

आओ की कोई ख्वॉब बुने...!

शेखर पाटिल यांचा एक आवडलेला लेख...

***************************

आज साहिरचा जन्मदिवस. आपले आयुष्य समृध्द करणार्‍यांपैकी हा एक. कविता आणि गीत या दोन्ही प्रकारांमध्ये समान ताकदीने सृजन करणारा अन् याहूनही महत्वाची बाब म्हणजे आयुष्य आपल्याच धुंदीत जगणारा एक मनस्वी, कलंदर.

उर्दूतील ‘तरक्कीपसंद’ अर्थात प्रगतीशील लेखकांच्या चळवळीत साहिरचे नाव कधी काळी आघाडीवर होते. अर्थात विचारांमधील मार्क्सवाद हा त्याच्या सृजनात नक्कीच उमटला तरी तो पोथिनिष्ठ नव्हता. प्रचारकी थाटाचे काव्य कधी त्याने स्त्रवले नाही.  मात्र ‘जला दो इसे, फुंक डालो ये दुनिया...’ सारख्या जळजळीत शब्दांत शोषितांविषयीचा कळवळा त्याच्याइतक्या समर्थपणे कुणी मांडलाही नाही. त्याने जीवनाचे विविध रंग आपल्या सृजनातून इतक्या कुशलतेने चित्रीत केलेय की कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. गुरूदत्त हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले एक स्वप्न होते. त्यांच्या यशात साहिरचा वाटा कुणी नाकारू शकणार नाही.

साहिरच्या जन्मदिवसालाच ‘जागतिक महिला दिवस’ असल्याचा योगायोगही किती अफलातून आहे बघा. पुरूषाच्या जीवनात स्त्री ही माता, भगिनी, प्रेयसी, सहचारिणी आदी विविध रूपांमध्ये येत असते. साहिरच्या काव्यात ही रूपे अत्यंत विलोभनीय स्वरूपात आली आहेत. याला त्याच्या आयुष्यातील घटनांचीही किनार आहे. अत्यंत खडतर स्थितीत साहिरला त्याच्या आईने वाढवले, शिकवले. याचमुळे आपल्या जमीनदार बापाविषयी त्याच्या मनात कायमची अढी तर राहिलीच पण तो मातृभक्त बनला. आईची त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. प्रेयसी म्हणूनही त्याच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. एके काळी अनेक स्त्रीयांसोबची त्याची मैत्री गावगप्पांना आमंत्रण देणारी ठरली. मात्र खरे प्रेम मिळविण्यात तो अपयशी ठरला. साहिरवर जीवापाड प्रेम करणार्‍या अमृता प्रितम यांनी आपल्या या नात्याला विलक्षण हळूवारपणे जगासमोर मांडले आहे. कुणी महिला आपल्या अयशस्वी प्रेमाला इतक्या आसुसलेपणाने दर्शवत नाही. मात्र हा बंडखोरपणा अमृताजींकडे होता. दुर्दैवाने एका सुंदर वळणावर हे नाते संपले. यानंतर साहिरचे नाव गायिका सुधा मल्होत्रा यांच्याशी जुळले. खरं तर हे त्याचे एकतर्फी प्रेम होते. सुधा मल्होत्रा यांनी कधी याला प्रतिसादही दिला नाही. हीच व्यथा जणू काही त्यांच्या ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला...’ या गीतातून व्यक्त झाली.

मेरे ख्वाबों के झरोकों को सजाने वाली
तेरे ख्वाबों में कहीं मेरा गुज़र है कि नही
पूछकर अपनी निगाहों से बतादे मुझको
मेरी रातों की मुक़द्दर में सहर है कि नही

या प्रश्‍नाचे उत्तरही कदाचित साहिरला आयुष्यात कधी मिळाले नाही. हे वैफल्य त्याने सृजन, सिगरेट आणि मद्यात विसरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याचमुळे तो तसा अकालीच गेला.

साहिरची एक नितांतसुंदर कविता ही कविच्या मनोदशेचे समर्थ चित्रण करणारी आहे. यातील-

आओ कि कोई ख़्वाब बुने कल के वास्ते
वरना ये रात आज के संगीन दौर की
डस लेगी जान-ओ-दिल को कुछ ऐसे कि जान-ओ-दिल
ता-उम्र फिर न कोई हसीं ख़्वाब बुन सकें

या प्रारंभीच्या ओळी भयाण वास्तवावर मात करण्यासाठी संवेदनशील मनाची धडपड व्यक्त करणार्‍या नव्हेत काय? अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उज्ज्वल उद्याची आस बाळगत स्वप्नांची साथसंगत करतच असतो. नेमकी हीच बाब साहिरच्या शब्दस्पर्शाने अजरामर झाली आहे.

आज साहिर जाऊन ३५ वर्षे झाली असली तरी मानवी मुल्यांचा जयघोष करणारे त्याचे काव्य आजही टवटवीत वाटते. ते काळाच्या कठोर कसोटीवर टिकणारे ठरले आहे. खुद्द साहिरने ‘कभी कभी’त ‘मै पल दो पल का शायर हू’ म्हणत सृजनाच्या क्षणभंगुरतेची कबुली दिली होती. मात्र काळ बदलला...वेळ बदलली...समाजमुल्येही बदललेत तरी साहिरची सर कुणाला नाही हीच त्याची महत्ता.

आज जागतिक महिला दिनानिमित्त साहिरची अत्यंत गाजलेली कविता-

औरत ने जनम दिया मर्दों को,
मर्दों ने उसे बाजार दिया
जब जी चाहा कुचला मसला,
जब जी चाहा धुत्कार दिया॥

तुलती है कहीं दीनारों में,
बिकती है कहीं बाजारों में
नंगी नचवाई जाती है,
ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज्जत चीज है जो,
बंट जाती है इज्जतदारों में ॥

मर्दों के लिये हर जुल्म रवां,
औरत के लिये रोना भी खता
मर्दों के लिये लाखों सेजें,
औरत के लिये बस एक चिता
मर्दों के लिये हर ऐश का हक,
औरत के लिये जीना भी सजा॥

जिन होठों ने इनको प्यार किया,
उन होठों का व्यापार किया
जिस कोख में इनका जिस्म ढला,
उस कोख का कारोबार किया
जिस तन से उगे कोपल बन कर,
उस तन को जलील-ओ-खार किया ॥

मर्दों ने बनायी जो रस्में,
उनको हक का फरमान कहा
औरत के जिन्दा जल जाने को,
कुर्बानी और बलिदान कहा
किस्मत के बदले रोटी दी,
उसको भी एहसान कहा ॥

संसार की हर एक बेशर्मी,
गुर्बत की गोद में पलती है
चकलों में ही आ के रुकती है,
फाकों में जो राह निकलती है
मर्दों की हवस है जो अक्सर,
औरत के पाप में ढलती है ॥

औरत संसार की किस्मत है,
फिर भी तकदीर की हेती है
अवतार पैगंबर जनती है,
फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो,
बेटों की सेज पे लेटी ॥

औरत ने जनम दिया मर्दों को,
मर्दों ने उसे बाजार दिया
जब जी चाहा कुचला मसला,
जब जी चाहा धुत्कार दिया ॥

Monday, 13 February 2017

खुणा

सख्या
तू येतोस ... तुझे सळसळणारे चैतन्य शिंपत फिरतोस
उत्साहाच्या चंदेरी सुमनांची पखरण करतोस
मनमोकळे हसतो ... जीव गुंतवत रमतो
अन मन भरण्या आत निघून जातो
जातांना तुझ्या येण्याच्या सगळ्या खुणा वेचून नेतोस

तुझ्या असण्याच्या खुणा मात्र तिथेच सांडून जातोस
तुझ्या असण्यात माझ्या गुंतण्याच्या खुणा लपत नाहीत
आणि ... तू येऊन गेल्याचा अंदाजही लोकांचा मग चुकत नाही. 

कुंपण



माझ्या क्षितिजात चंद्राची शीतल काया तेवत असते
अंगणात चंदनफुलांचा शिंपावा 
गार गंधित वाऱ्याची झुळूक तुला स्पर्शाला हवी असते
म्हणून तू  दुपारचे उन्ह अंगभर लपेटून
रात्री भेटायला येतोस

मला तू पौर्णिमा म्हणतोस

उन्हात कोरड्या करपून गेलेल्या
तुझ्या भावनांना माझ्या ओलाव्याची उब हवी असते
तुझा हात हाती घेते
पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरते
तू शांत होत हळव्या कुशीत विसावतो

मला तू माया म्हणतोस...

तुझे बाळबोध उमाळे कुशीत रिचवताना
माझ्या मातृत्वाचा पान्हा फूटतो
तू तुझे उदरभरण करून घेतोस
तृप्तीची ढेकर देऊन
कुशीतच गाढ झोपी जातो.....

तू मला पूर्णा संबोधतो...

पुन्हा उजाडतं... तुला उडायचं असतं
दूर गगनात तुझ्या स्वप्नांचं क्षितिज गाठायचं असतं
तुझ्या पंखांवर मी माझं आभाळ धरते
झेप घेऊन थकलास कि तुला विश्रांतीला
पंखांखाली ओंजळही सरकवते

तू मला धारिणी म्हणतोस....

जगणं-जागवणं, रुजवणं - निभावणं.
तुला देत राहते अखंड  ...
तुझे तप्त उन्ह मनभर गोंदून
रापल्या जीवाचा दाह सोसून कोंडून घेते आत
वरवरच्या कायेवर चंदनाचा लेप देते... शृंगार करते
रात्री तुझ्या गरजेची शीतलता दिवसभर पेरत जाते.

 मला तू स्वरूपा पुकारतो...

माझे हे नभव्यापी मन मात्र तू जिंकावस असं वाटत असतं
तेही तुला देऊन टाकता येतं खरतर ...पण
ते तूच घराच्या चौकटीत कुठल्याश्या कुपीत नाही का बंदिस्त करून ठेवलय
आठवतं ?

मग मीच स्वतःला कुंपण म्हणते...





रश्मी पदवाड मदनकर
१२/०२/२०१७

Friday, 3 February 2017

प्रजासत्ताक आणि स्त्रीस्वातंत्र्य


प्रजासत्ताक दिन जवळ आलाय. १९५० पासून देशात अधिकार आणि कर्तव्य याशिवाय स्वातंत्र्य या विषयांवर प्रचंड उहापोह होत आलाय. अनेक आंदोलनं, संघर्ष उलथापालथी याच काही कारणास्तव घडत गेले.. संपूर्ण स्वातंत्र्य हि अजूनही एक कल्पनाच वाटते. स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट झाली तर इतर अनेक प्रश्नांना आपोआप वाचा फुटू शकेल पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर कधीच स्पष्ट देता आलेले नाही. आपलं आत-बाहेर असलेलं अमर्याद अस्तित्व आणि ते मुक्तपणे स्वीकारण्याची अन तसेच वागण्याची आपली ताकद म्हणजे खरे स्वातंत्र्य असे माझे स्पष्टच मत आहे.  व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय पुढे आला म्हणून स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला. सहज शब्दकोश उचलून बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत. स्त्रियांच्या दृष्टीने पाहायला गेले कि यातला कुठला शब्द तिच्या अनुषंगाने चपखल बसतो हे व्यक्तिसापेक्ष असू शकेल कदाचित प्रतिनिधिकहि असू शकेल. सामाजिक चौकटीच्या साच्यात घालुन आपलं अस्तित्व आपण आकारात आणु पहातो,त्याला मर्यादित करु पहातो आणि मग स्वातंत्र्याच्या कल्पना सुद्धा मर्यादित होत जातात, त्यांनाही भिंती येत जातात. प्रत्येकाची असामान्यत्वाची व्याख्या बहुधा वेगळी आणि सतत बदलत रहाणारी असते.हे झालं व्यक्तिमत्व स्वातंत्र्याविषयी.

 सामाजिक स्वातंत्र्याचा विचार केल्यास स्त्रीही शिक्षणानं स्वावलंबी बनते आणि आर्थिक स्वावलंबन जिला लाभतं तिच्यावर  इतरांना फारसा अन्याय करता येत नाही. शिवाय निर्णयाचं स्वातंत्र्यही या दोन कारणाने हळूहळू मिळू लागतं. स्वत:च्या भविष्याचा विचार करता येतो. पण सर्वप्रथम हे तिला स्वतःला समजायला हवंय ती जाणीव होणे गरजेचे आहे कारण शेवटी  स्वातंत्र्य हा समजून घेण्याचा नाही तर निश्चितच अनुभवण्याचा विषय आहे. महिलांचं स्वातंत्र्य हा वादाचा मुद्दा असला तरी ही सुसंस्कृत समाजाची गरज आहे आणि विकासाची पहीली अट सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेत कुठेही स्त्री-स्वातंत्र्य असा शब्द आलेला नाही.  पण एक नागरिक, एक व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीला सर्व स्वातंत्र्ये पुरुषांच्या बरोबरीने उपभोगता येऊ शकतात. असे असूनही स्त्री अधिकारांची गळचेपी होत राहिली आहे यात शंका नाहीच. देश स्वातंत्र्याच्या ६७ व्य वर्षात पदार्पण करतांना देशाच्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतांना स्त्रियांच्या स्वतंत्र अधिकारांची चर्चा दुय्यम ठरावी हि अर्ध्या जगाची शोकांतिका आहे. अर्ध्या जीवांवर अन्याय आहे. लोकशाहीने स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारल्याचे कुठेही दिसत नाही. ही गोष्ट भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे हे ताठ मानेने सांगणार्‍या आम्हा भारतीयांचीही शोकांतिका आहे. 

लोकशाहीत श्रद्धा, मूल्य, विश्वास यांचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल करण्यात आले. परंतु या सैद्धांतिक चौकटीलाच नाकारून छेद देण्याचे प्रयत्न आजही होतांना दिसत आहे. आजही महिला कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, लैंगिक शोषण, अँसिडहल्ले, बलात्कार इत्यादींची बळी ठरत आहे. भारत स्वतंत्र झाला असे म्हणतांना सामाजिक अन सांस्कृतिक बेडगी रूढी परंपरेच्या, बिनबुडाच्या नीतिमत्तेच्या पारतंत्र्यातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही. अर्धे जग पारतंत्र्य उपभोगत असतांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचा खोटा आव कुठल्याही समाजाला कुठल्याही देशाला आणता येणार नाही. भविष्यात खऱ्या स्वातंत्र्याचा पायवा रचण्याची सुरुवात आतातरी व्हावयास हवी हीच या ६७ व्या प्रजासत्ताकदिनी शुभेच्छा !!

चौकट :-
 राज्यघटनेतील कलम १४ नुसार स्त्री-पुरुष यांना समान हक्क प्रदान करण्यात आले आहेत. घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला आहे. राज्यघटनेच्या कलम ३०० (क) अ नुसार स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कांपासून वंचित करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र आजही वडिलोपार्जित संपत्तीचे हिस्से करताना कुटुंबातील मुलांना जास्त हिस्सा व मुलींना कमी हिस्सा देण्याचे प्रकार घडतच असतात. घटस्फोटित, विधवा महिलांनाही या जाचाला सामोरे जावे लागते. वस्तुत: वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीचाही समान हक्क असतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिला होता. तो निकाल त्याचवर्षीपासून लागू झाल्याने त्या वर्षाआधीच्या संपत्तीवाटप प्रकरणांसाठी हा निकाल लागू होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले होते. वडिलोपार्जित संपत्ती व्यतिरिक्त विवाहित स्त्रीला पोटगीच्या रूपातही स्थावर वा जंगम मालमत्ता मिळत असते. पोटगीच्या रूपाने स्त्रीला मिळालेल्या मालमत्तेवर आयुष्यभर तिचाच अधिकार असेल. ही मालमत्ता आपल्या मृत्यूनंतर कोणाला द्यावी याचा निर्णय ती मृत्युपत्रात तशी नोंद करून घेऊ शकते. स्त्रीला पोटगीरूपात मिळालेल्या मालमत्तेवर तिच्या मृत्यूनंतरही सासरच्या मंडळींना हक्क सांगता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. हिंदू विवाह कायद्यातील तरतुदीप्रमाणे नवऱ्याने आपल्या पत्नीचा प्रतिपाळ करणे बंधनकारक असून, पतीच्या मालमत्तेत तिचाही वाटा असतो. तो नाकारणे हे कायदाबाह्य आहे. स्त्रीधन असो वा पोटगीरूपात मिळालेल्या मालमत्तेवरील स्त्रीचा अधिकार या दोन्ही बाबींबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दोन्ही स्वतंत्र निकाल हिंदू स्त्रीला तिचे हक्क शाबित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. तलाक किंवा पतीने केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे मुस्लिम महिलांशी होत असलेल्या भेदभावाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक जनहित याचिका स्वत:हून दाखल करून घेतली. राज्यघटनेने हमी देऊनही मुस्लिम महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागत असेल तर ते अयोग्य आहे, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. या जनहित याचिकेच्या तीन आठवड्यानंतर होणाऱ्या सुनावणीत न्यायालय जी काही भूमिका घेईल ती महत्त्वाची ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त निकालांमुळे स्त्रीच्या हक्कांबाबत अधिक जागृती होण्यास साहाय्यच होईल याबाबत शंकाच नाही. 




रश्मी पदवाड मदनकर
23/01/2017

(नागपूर सकाळ 'मी' पुरवणीत प्रकाशित लेख)

Thursday, 19 January 2017

विसर्जन


सगळे हिशेब संपवायला जरा उशीरच झाला
रात्र पालथी पडून ... जरा उजेडायला आले होते
किर्र्र्र अंधार चिरत बारीकशी किरणे डोकावू पाहत होती ... पण
अजून अंधार कायम होता.
अंगावरच्या सगळ्या चिघळट खाणाखुणा,
भळभळणाऱ्या जखमा, खदखदणारी व्रण, ठसठसणारे स्पर्श  
तिनं पदरानं रगडून पुसून काढलीत.
त्या पदराची झोळी केली न खोचली कंबरेत
दोन्ही हाताच्या तळव्याने वाहते डोळे पुसले अन
साठवून घेतले ते अश्रू ओंजळीतच.

उंबरठा ओलांडला ....

चालत राहिली रस्ता नेईल तिकडे
आकाशात मेघ दाटून यायला लागले होते.
तिच्या मनातले मेघ आज धो धो बरसून साठले होते .. तिच्या तळव्यात. रिमझिम रिमझिम सुरु झाली तशी ओंजळ अधिक पुढे केली तिनं
पावलागणिक पाऊस ओंजळीत साठत होता... ती मात्र, ... ती मात्र
ओंजळ ओसंडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेत, ठार कोरडी होत चालली होती. 
ओलाव्याच्या सगळ्या खुणा पुसून टाकायच्या होत्या तिला... शरीराच्या अन मनाच्याही

चालता चालता ध्यानात येणाऱ्या ..
उरात उचंबळणाऱ्या लाटा, आयुष्यातल्या उभ्या आडव्या सरी,  डोळ्यातला पूर, मनातला पाऊस
भावनांचा ओघळ, नात्यांची ओल, आठवणीतला पाझर सगळं साठवून थेंब थेंब झोळीत ओतत राहिली . ...तळे तळे साठत राहिली ..

पोचली समुद्र किनारी ...

जरा शांत केलं स्वतःला .. दूरवर नजर फिरवली .
लाटा पायाशी घुटमळू लागल्या ... तशी अंगभर शिसारी आली तिला
सगळी घाण वेचून तिच्या तळाशी आणून टाकणाऱ्या अन तरी कुठलेच वैषम्य न बाळगता अथांग तोरा मिरवणाऱ्या;  क्षणात फसफसून क्षणात नाहीश्या होणाऱ्या अस्तित्वहीन लाटेच्या ओल्या-खाऱ्या स्पर्शाची.... शिसारी आली तिला...
दुसऱ्या उचंबळून आलेल्या लाटेत एका श्वासासरशी ओंजळ रिक्त केली तिने...
पदराची झोळीही ओतली तिथेच  ... पिळून काढली गच्चं
अन होतं नव्हत ते सगळं दिलं समुद्राच्या स्वाधीन करून ...

विसर्जन
समर्पणाचं विसर्जन ...

वाहून जाऊ दिले सारे सारे ...डोळ्यादेखत ... नजरेआड होईपर्यंत
भंपक ओलाव्याचा समस्त भार शिरवून टाकला होता...
पुढल्या लाटेसरशी तिनं जोरात किंकाळी फोडली .. धायमोकलून रडून घेतलं
तसे कानाकोपऱ्यात अडकलेले उरले सुरले शिंतोडेही मोकळे झाले.....हलकं हलकं झालं सारं

डोळे गच्चं मिटून, हात पसरून लांब श्वास घेत आकाशाकडे पहिले तिने आणि वळली ... निघाली नव्याच प्रवासाला
तिच्या वाटेत अडथळुन बसलेल्या धोंड्याला टेचात उडवून लावला अन शीळ वाजवत चालत राहिली रस्ता दाखवेल त्या वाटेवर..

लक्ख उजाडलं होतं आता .... बाहेर अन आतही !! 

Friday, 13 January 2017

इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं..!





दुपारचे १२.. . सगळे आपापल्या कामात व्यस्त. कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो हल्ली. आम्ही चहा घेऊन जरा पाय मोकळे करायला पुढे आलो आणि काहीसे स्तंभित करणारे चित्र नजरेस पडले. एक पंचविशीतला तरुण रस्त्याच्या वळणावर एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच; कोपऱ्यात झाडाखाली बसलेला दिसला. त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केलेली.. तिथं तो दिवसभर बसून असतो. राजासारखा.... नव्हे, एखाद्या कलावंतासारखा! त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या चपला, काही किरकोळ सामान. जमिनीवर पडलेला कागदांचा खच, फाटक्या बॅनरचे, पॅम्पलेटचे एकत्र जोडून ठेवलेले कागदी चिटोरे. त्या चिटोऱ्यांवर त्यानं चितारलेली अनाकलनीय चित्रे. बरीच चित्रं त्यानं झाडांच्या फ़ांदीला अडकवलेली . जणू चित्रांचे प्रदर्शन मांडलेले. तो नेमकं काय करतोय याचा अदमास येईना, पण हे काहीतरी वेगळं आहे हे ध्यानात यायला वेळ लागला नाही.

तो वेडा असावा . सगळे तसंच सांगत होते..वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले. फाटलेले सुद्धा असतील. त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब-राठ. आंघोळ नसणारच करत कधी. शहाणी माणसं असं थोडीच करतात? छान छान कपडे घालून, पावडर लावून बाहेर पडतात. चेहेऱ्यावर सदाच स्मित घेऊन वावरत असतात. हे जग म्हणजे एक धर्मशाळा आहे. येथे रोज माणसे येतात जातात येणारी लोकं एकसुरी जगतात. धावत राहतात मिळेल त्या वाटेने. समजूतदारपणे वाट्याला आलेलं जगणं सोसणं आणि तरीही हसत जगत राहणं ह्यालाच शहाणपण म्हणत असावेत. या चाकोरीबाहेरचे उर्वरित वेडेच तर असतात ना सगळे.


त्याच्यासमोरून हजारो माणसं येत-जात असतील. कुणी गाडीतून, कुणी पायी.. कुणी घासत रडत, कुणी थकुन चूर, कुणी हसत खिदळत! कुणीच त्याची दखल घेत नसतील का? कुणी दखल घ्यावं असं तोही काही करत नसावा. त्याला जगाशी संबंध नाहीये. तो कुणाच्याच मागे फिरत नाही. कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची कणभरही गरज नाकारणारं त्याचं अद्भुत अफाट तरिही क्षुल्लक अस्तित्व! तो जगतोय त्याच बेदखल राजेपण अन कुठेही सोडून जाता येण्यासारखे स्वनिर्मित सार्वभौम साम्राज्य!
आणि आम्ही ..आम्ही हिंडतोय त्याला शोधत, आमच्या जिज्ञासा तृष्णेच्या अपेक्षा त्याच्यावर सोपवून आमची प्रश्नांकित कुतुहलं सोडवण्यास आतुर.

का करतोय तो असं? काय घडलं असेल त्याच्यासोबत नेमकं? त्याच्या अनेक चित्रांपैकी एका चित्रावर कन्नड भाषेतल्या काही ओळी रेखाटलेल्या. काटोलच्या नृत्य शिक्षिका पी पद्मा यांच्या मदतीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तर धक्काच बसला. बऱ्याच गोष्टी असंबंध, पण एका वाक्यावर मात्र आपसूकच लक्ष केंद्रित झालं 'तुझ्या केसांच्या आंबाड्यात मी मोगऱ्याचा गजरा माळतोय' असे रोमँटिक शब्द त्याने का रेखाटले असतील? त्याच्या मनातल्या कल्पना असतील कि खरंच प्रेमभंग झाल्याने मनावर आघात होऊन भूतकाळ विसरून भरकटला असेल तो. कि मग मुद्दामच सगळं मागचं मागे टाकत, बंधनाचे सगळेच पाश सोडून, दुःखाच्या खुणा खणून काढून विरक्ती उगवायला निघालाय तो. विचारांना किती किती फाटे फुटू लागले.

मला मंगेश डबरालच्या ओळी आठवल्या...

''पागल होने का कोई नियम नहीं है
इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं
वे भूल चुके होते हैं कि पागल होने से
बचे रहने के कई नियम हैं..
..''


या मानसिक अवस्थेतून बाहेर पडणे आवश्यक वाटू लागले. तर्काचे तारे कुठवर तोडणार. त्याच्या बैठकीच्या आसपास विचारपूस केली. काही तरुण मंडळींनी त्याला रोजच पाहत असल्याच सांगितलं. त्यातील कित्तेक जण त्याला पोटासाठी लागणारे अन्न कधीतरी पुरवायचे. जातायेता त्याला रोज पाहणाऱ्या, जवळच गर्ल्स होस्टेलवर राहणाऱ्या परप्रांतीय धनलक्ष्मी सीलम आणि हुमैरा भेटल्या. कुठल्यातरी आघातानं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असावं., असं त्यांना वाटतं . पण यश अग्रवाल म्हणाला तो वेडा वाटत नाही आत्ममग्न मात्र आहे. प्रत्येकाचं विश्लेषण वेगळं. त्याचं स्वतःचं विश्लेषण आणखी वेगळं असेल कदाचित! विश्लेषणाचा विषय आला म्हणून मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांना विचारणा केली त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून त्याने काढलेले चित्र, चुरगाळलेले कागदं आणि एकूणच अवस्थेचे काही फोटो त्यांना पाठवले. हा 'डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर'चा रुग्ण आहे. हा राजा आकाश यांचा निर्वाळा. एखाद्या आघातानं किंवा अचानक उद्भवलेल्या मानसिक आजारानं विस्मृती येऊन तो भरकटला असावा. तो काढत असलेले चित्र वास्तवदर्शी किंवा काल्पनिकही असू शकतात, असही ते म्हणतात. अशा अवलियांच्या वर्तनाचं कोडं बऱ्याचदा सुटत नसतं. अशी माणसं प्रश्नांसारखी उद्भवतात आणि मागं आणखी प्रश्नचिन्ह सोडून निघून जातात.

तोही नाहीसा झाला अचानक. त्याचं सिंहासन तिथंच टाकून. झाडावर प्रदर्शित केलेली चित्रंही नेली नाहीत त्यानं सोबत. कधी भेटलाच परत तर मिळतीलही काही प्रश्नांची उत्तर... पण त्याच्या वेदनेचा जरासाही अदमास येण्याची असोशी छळत राहणार कदाचित. वेडी माणसं स्वतःला नि जगाला छळतात तशी. 
मानसी गढे तिच्या कवितेत मांडते तशी ...

''गडद होत जाणार्‍या अंधाराच्या नसानसांत
भळभळणार्‍या, ठसठसणार्‍या अदृष्य चिघळट जखमेसारखे...
चौकातल्या नागड्या भिकार्‍याच्या कंबरेवर फडफडणार्‍या एकमेव चिंधीत गुंडाळून ठेवलेल्या
विश्वातल्या समस्त भंपक लज्जेसारखे...
.एक दु:ख हवे माणसाला... कायम...
त्याच्याच पायाशी घुटमळणार्‍या... त्याच्याच काळ्या सावलीसारखे!
''







रश्मी पदवाड मदनकर
१२/०१/२०१७





(सकाळ १३ जान. १७ ला मुख्यांकात प्रकाशित झालेली बातमी)

Wednesday, 28 December 2016

२०१६ वर महिलांची मोहोर







चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा, बघता बघता हे वर्षही सरले. दरवर्षी नेमाने येणारा क्षण पुन्हा जवळ आलाय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. सरत्या वर्षात काय गमावले, काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. नव्या वर्षात पदार्पण करताना भूतकाळाची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते. सरते वर्ष अनेक घडामोडींनी भरलेले राहिले अनेक मार्गाने उल्लेखनीय ठरले. कुठे सामाजिक बदलांची नांदी कानी आली तर कुठे भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं वाचनात आलीत. जातीय आरक्षणासाठी पुकारले गेलेले आंदोलन, नोटा बंदीने पिडला गेलेला सामान्य नागरिक, सत्तापक्ष-विरोधी पक्षाचे अटीतटीचे राजकारण आणि त्यात ढवळून निघालेला देश. अश्या अनेक घटनांच्या खुणा गोंदल्या जात असतांना वर्षभर महिलांच्या संबंधित देश-विदेशातून चांगल्या वाईट बातम्यांची धूळही उडत राहिली. कुठे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्न झाले. नेतृत्व गुणांना वाव मिळाला, मोठ्या पदांवर ती आरूढ झाली तर कुठे बलात्कार, अत्याचाराच्या घटनाही गाजत राहिल्या. अश्याच काही मुख्य घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटा प्रयत्न.

वर्ष २०१६ महिलांना मिळालेल्या पुरस्कारांसाठी विशेष ठरले. भारतीय पत्रकार मालिनी सुब्रमण्यम हिला नक्सल प्रभावित 'बस्तर' क्षेत्रात तिने केलेल्या पत्रकारितेसाठी 'इंटरनॅशनल प्रेस फ्रिडम अवॉर्ड-२०१६' ने सन्मानित करण्यात आले. तिच्या व्यतिरिक्त हा पुरस्कार तुर्की, मिस्र आणि अल सल्वाडोर या राष्ट्रातील पत्रकारांना मिळाला. मानवाधिकारसाठी दिला जाणारा युरोपीय संघाचा प्रतिष्ठित 'सखारोव पुरस्कार-२०१६' दोन यजीदी महिला नादिया मुराद आणि लामिया अजी बशर यांना देण्यात आला. इस्लामिक स्टेट आतंकवादी संघटनेने या दोघींचे यौन उत्पिडन केले होते. त्या वेदनादायी घटनेतून बाहेर पडून या दोघीही आज पीडित महिलांसाठी समाजसेवेत कार्यरत आहेत. या वर्षीचा 'राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल हिला देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना सांप्रदायिक शांती आणि सद्भावना वाढविण्याच्या दृष्टीने दिलेल्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. मद्रास संगीत अकादमीद्वारा दिला जाणारा 'संगीता कलानिधी पुरस्कार' व्हायोलिन वादक अवसारला कन्याकुमारी हिला देण्यात आला. अवसारला गतवर्षीच्या पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित आहे. वर्ष २०१६ मध्ये १० पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये यामिनी कृष्णमूर्ती आणि गिरीजा देवी या दोन महिला शामिल आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'साऊथ एशियाई लिटरेचर पुरस्कार' भारतीय लेखिका अनुराधा रॉय हिला तिच्या 'स्लीपिंग ऑन ज्युपिटर' साहित्यासाठी देण्यात आला. बंगळुरूच्या सुभाषिणी वसंत हिला संकटात लोकांची मदत करण्यासाठी तसेच सैनिकांच्या विधवांना सक्षम करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी 'नीरजा भनोत' पुरस्काराने नावाजण्यात आले. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदावर डॉ. मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली. मंजुला या दुसऱ्या महिला मुख्य न्यायधीश ठरल्या.


गेले वर्ष सिनेक्षेत्रातल्या घटनांचाही बराच गाजावाजा होता. ऐश्वर्या, प्रियांका आणि दीपिका यांचा हॉलिवूड प्रवेश आणि अभिनयावर चर्चा झडल्याच पण अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांच्याबरोबर प्रियंकाने घेतलेले डिनर, कतरिनाला मिळालेला 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' ऐश्वर्याचे जांभळे लिपस्टिक आणि दीपिकाचा रेड कार्पेटवरचा ड्रेस हे विषय नेटिझन्सने बराच काळ चघळले. यात एक भूषणावह होते ते हे कि 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' जिंकणारी प्रियांका चोपडा हि पहिली भारतीय नागरिक ठरली.


महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका तृप्ती देसाई यांचे विविध धार्मिक क्षेत्रात महिलांच्या प्रवेशासाठी चालवलेले आंदोलन तर दुसऱ्या बाजूने मुस्लिम महिलांनी तीन तलाक विरोधात पुकारलेला एल्गार वर्षभर लोकांचे लक्ष वेधत राहिले. बंगाली सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेतादेवी ह्यांनी तसेच संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून भूमिका वठवणाऱ्या 'व्यापक अणुचाचणी प्रतिबंध करारावर' (सीटीबीटी) भारताची बाजू मांडण्यात महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अरुंधती घोष आणि १९५० पासून तब्बल ३० वर्ष आपल्या गायकीने सिनेरसिकांचे मन मोहनारी पार्श्वगायिका मुबारक बेगम तसेच वर्ष जाता जाता अम्मा म्हणून प्रसिद्ध तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या चौघींनी यावर्षात पृथ्वीतलावरचा त्यांचा प्रवास संपवला. गोव्याला परफ्युम मलिका मोनिका घुरडे तर चेन्नईत इन्फोसिसमध्ये काम करणारी आयआयटीयन स्वाथीची सर्वांदेखत झालेली हत्या आणि महाराष्ट्राच्या कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या हि काही प्रकरणं घडली, संतप्त नागरिकांच्या जखमा पुन्हा भळभळायला लागल्या, जनता रस्त्यावर उतरली, प्रकरणं चव्हाट्यावर आलीच आणि पुन्हा एकदा देशाच्या प्रतिष्ठेवर डाग लावणारी ठरली.

एकंदरीतच महिलांच्या पदरी गेले वर्ष नेहेमीप्रमाणेच संमिश्र फळ देणारे ठरले. कुठे घवघवीत यश मिळाले तर कुठे निराशा हाती लागली. जे काही घडले ते मात्र अनुभव देणारे, जाणिवा जागृत करणारे अन धडा शिकविणारे ठरेल हीच अपेक्षा.
चला तर या गुलाबी थंडीत सोनेरी प्रकाशात. नव्या स्वप्नांची नवी लाट आणूया
नवे प्रयत्न ,नवा विश्वास ...नव्या यशाचा नवा ध्यास घेऊया.
चला सख्यांनो, हसत खेळत दंगा करत नूतन वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होऊया .


रश्मी मदनकर
२८/१२/२०१६


(सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)
http://epaper1.esakal.com/28Dec2016/Normal/Nagpur/Me/index.htm

Sunday, 11 December 2016

शब्द




शब्द सुचत नाहीत सुचावे तेव्हा
अन पंक्तीतही बसत नाही बसवावे तेव्हा 
मनमानी करून घेतात 
वाटेल तिथे जाउन येतात 
हळूच जागल्या रात्री मग 
उशाशी येउन विसावतात   

शब्द येत  नाहीत बोलवावे तेव्हा 
स्वरातही खुलत नाही खुलवावे तेव्हा
भावूक होऊन हिरमुसतात
मुसमुसतात धुस्फुसतात
हळूच ओल्या रात्री मग
कंठाशी येउन गुणगुणतात

शब्द शब्दाला जागतातही
शहाण्यासारखे वागतातही
शब्दांचा तोरा बदलला तर मग
मौनात  जाऊन बसतातही

शब्दांचे ऐकावे, शब्दांना सांगावे
शब्दांचे चित्र शब्दांनीच रंगावे
शब्दांशी भांडावे, शब्दांनीच मनवावे
शब्द शब्द गोंजारून
कवितेत मांडावे ....


रश्मी मदनकर
११/१२/२०१६










मोगरा फुलला ...


माझं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर लागलेलं. काहीतरी छान वाचत होती. तंद्री लागलेली, गालातल्या गालात हसणं सुरु होतं. तेवढ्यात काच वाजली. ती काचेबाहेरून काहीतरी बोलत होती. हातवारे करत होती.
तिशीतली असेल, नाकीडोळी नीटशी पण जरा मळलेली. रापलेला चेहेरा. ठिगळ लागलेली साडी. विस्कटलेले केस. फारसे लक्ष न देता सिग्नल सुटायची वाट बघत मी पुन्हा मान खाली करत नजर फोनमध्ये घातली. तिने पुन्हा काच वाजवली, आवाज डोक्यात गेला ..रागच आला जरा. काच खाली ओढत ठणकावलेच मी.

''क्या है, दो मिनिट का सिग्नल लगा नही कि आ जाते हो भीक मांगने..शरम नही आती, निकलो यहांसे''

''नाही ताई भीक नग, गजरा हाये.. घ्या कि दहाला तीन लावते.. छान दिसेन तुमास्नी'' ती

मी बघत राहिले तिच्याकडे .. तेवढ्यात सिग्नल सुटले. ड्रायवरने गाडी पुढे घेतली. मागे वळून पहिले. ती धावत होती शेजारी लाल झालेल्या दिव्यात थांबलेल्या  गाड्यांच्या दिशेने, कुठल्याश्या गाडीचा काच खणखणत 'छान दिसेन तुमास्नी' म्हणत होती.  तिचे शब्द कानात घोळत राहिले... माझे मलाच गिल्ट आले. घराच्या प्रशस्थ खोलीत किंवा एअरकंडिशन ऑफिसात बसून टाईमपास करायला पाठवलेले जोक, सुविचार, फॉरवर्ड मेसेजेस वाचण्यात दंग आपल्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून भिकारी आणि काय काय बोलून गेलोय आपण तिला, या गजऱ्याच्या सुगंधावर कुणास ठाऊक कुणाकुणाची पोटं भरतेय ती'

''सचिन, गाडी वळ्व .. युटर्न घे जरा'' 

त्याच सिग्नलला पोचले. गाडी कडेने लावायला सांगितली. उतरले अन चालतच गेले तिच्याजवळ.
ओळखल्याचा संकेत एक छानसं स्मित देऊन दिला तिनं..

''धाचे देऊ का ताई? बांधून देऊ का लावता हितच ''

मी तिच्या टोपलीतले ३ गजरे उचलले, माझ्या केसांची क्लिप काढली, अन तिच्या पाठी जाऊन तिच्या अस्ताव्यस्त बांधलेल्या केसात माळले. तिच्या केसात मोगरा अधिकच फुलून आल्याचा भास झाला.

''हे काय करता ताई, अव मी गजरे लावून काय करू?'' 

हातात काढलेली १०० ची नोट तिच्या हातात कोंबली

'लाव गं, छान दिसते तुमास्नी' म्हणत तिला स्मित दिले अन गाडीकडे वळले.

अजून हाताला घमघमाट येतोय तेव्हापासून ....






--

Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...