Thursday 23 April 2015

खरतर आपण काहीतरी लिहितो यात अप्रूप असं काहीच नाही ते तेव्हाच जेव्हा आपण अंतःकरणातून लिहिलेलं काहीतरी, कुणीतरी 'मनापासून' वाचत असेल. आपण जीवओतून  रचलेली कविता मनलावून ऐकत असेल. एखादं आवडत असलेलं पुस्तक एवढं का आवडतं सांगतांना रटाळ होत चाललेलं आपलं बोलणं सुद्धा कंटाळा न करता समजून घेत असेल. एखाद्या पुस्तकातला नेमका परिच्छेद वाचून दाखवतांना आपल्या इतकाच तल्लीन होत असेल. आपल्याला आवडत असलेलं गाणं, गझल आपल्याला का आवडतं हे जाणून घ्यायला म्हणून मुद्दामहून ऐकून बघत असेल मग त्यावर आपण रमून बोलतांना हिरीरीने चर्चेत सहभागी होत असेल. आपल्या समाजसेवेच्या आस्थेपोटी मनाला स्पर्शलेल्या घटना हळव्या होऊन सांगतांना तोही गुंगून जात असेल. आपण खुश असतांना तो सुद्धा खुश होत असेल. फार नको पण असा एखादाच अगदी एखादाच मित्र/मैत्रीण जवळ असेल तर … या जगात येउन भरून पावलो असं समजावं आणि या मैत्रीला जिवापलीकडे जपावं.

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...