Saturday, 2 May 2020

कुणीतरी हाक घालतं
 मनाच्या बांधावरच हात घालतं
बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात
आणि भीती दाटून येते

कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित
मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून
टाळे लावून घेतलेले असतात
आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात
अंतर आखले अंतर राखले असतात ..

मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत
पण अंतरं मन मोडतही नाहीत
मनांचा मनाशी संवाद घडत राहायला
हरकत नाही एकवेळ ..
पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना
मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..
 
  

No comments:

Post a Comment

Featured post

  एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे प...