Monday 20 April 2020

काही गाण्यांचे किस्से बनतात, काही किस्स्यांची गाणी.



काही गाणी किती मनाचा ठाव घेतात... नाही ? इतके आत आत उतरतात की दिवसाच्या-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी ते कितींदाही ऐकता येतात आणि फक्त ऐकता येत नाहीत तर त्यात गुंग होऊन तादात्म्य प्राप्तीच्या स्तरापर्यंत जाता येतं. तुम्हाला आलाय कधी असा अनुभव ?? मला आलाय .. येतो आजही कितीदातरी. 
काही गाण्याच्या धून नुसत्या वाजायला लागल्या की आपण वेगळ्याच विश्वात तरंगत पोचतो. अशीच एक धून आहे जॅकी आणि मीनाक्षीच्या हिरो सिनेमातली बासरी (फ्ल्यूट मेलोडी) आठवते ? ह्याच बरोबर त्यातलच 'निंदिया से आई बहार ऐसा मौसम देखा पहेलीबार' या धून लागल्या की आजही मनात काहीतरी कालवाकालव होते. ह्याच्याच उलट काही गाणी आहेत जी ऐकावीच वाटत नाहीत.. ती लागलीत कि तिथून पळून जावंसं वाटतं. अर्थपूर्ण शब्दांची गाणी ही माझी पहिली पसंती, त्यानंतर गायक संगीत किंवा इतर सगळ्या गोष्टी. दिवसभरातला माझा आवडता वेळ कुठला असतो सांगू, ऑफिस संपल्यानंतर ऑफिसमधून निघून घरी पोचेपर्यंतचा ५०-६० मिनिटांचा वेळ. कुठेतरी खूप घाईत पोचायची धावपळ नसते काम संपवून निघाल्याच समाधान असतं म्हणून रिलॅक्स मनानं मी गाणी ऐकत घरी पोचते. गेल्या काळातल्या काही गाण्यांनी माझ्या आयुष्याची खूप जागा व्यापली... वारंवार तीच तीच गाणी ऐकायला मी खूप वेळ दिलाय. ह्या गाण्यांनी माझे जगणे सोपे आनंददायी केले.
''फिर ले आया दिल मजबूर क्या कीजे?
रास आया ना रहना दूर क्या कीजे?''
इतकच ऐकलं कि कान आणि मनही ताब्यात राहत नाही, या गाण्याचे संगीत आपल्याला खेचत पार कुठल्या कुठे घेऊन जातं
''करते है हम आज ये कुबुल क्या कीजे?
हो गयी थी जो हमसे भूल क्या कीजे?
दिल कह रहा उसे मुकम्मल कर भी आओ
वो जो अधुरीसी चाह बाकी है .....!''
अरिजित गायलाय छान पण रेखा भारद्वाजच्या आवाजात ऐकलं कि मात्र भान हरपत जातं..
वारंवार ऐकायला आवडणाऱ्या गाण्यांमध्ये
'तुझ संग बैर लगाया ऐसा तुझ संग बैर लगाया ऐसा
रहा ना मैं फिर अपने जैसा.. मेरा नाम इश्क़, तेरा नाम इश्क़'
किंवा 'ये तेरी और मेरी मोहब्बत हयात है
हर लम्हा इसमें जीना मुक़द्दर की बात है...  तुझे याद कर लिया है आयत की तरह',
 'मै रहू या ना रहू तुम मुझमे कही बाकी रहेना' वझीरचे 'तेरे बिन', यहाँ फिल्मचं 'नाम अदा लिखना' किंवा मग काईटचं 'दिल क्यू ये मेरा शोर करे' अशी अनेक गाणी आहेत. 

असेच आम्ही मुंबईला राहत असतांना 'जब वी मेट' फार गाजला होता. रोज हार्बर लाईनने पनवेल ते अंधेरी पर्यंतचा प्रवास असायचा या काळात गाणी ऐकायला प्रवासातला भरपूर 'मी टाइम' मिळायचा. या काळात ऐकलेले 'आओगे जब तुम ओ साजन अंगांना फुल खिलेंगे' गाण्यानं बुद्धी अन मनाचा इतका ताबा घेतला होता की आजही ''नैना तेरे कजरारे हैं
नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने
वादे किए कई सारे हैं
साँसों की ले मद्धम चलें, तोसे कहे
बरसेगा सावन…''
संगीत , शब्द , लय , ताल ऐकले कि ते दिवस, लोकल, प्रवास, तेव्हाच्या घटना, ते क्षण तेव्हाची सोबत असणारी माणसे सगळं सगळं नकळत डोळ्यासमोर उभे राहते खूप व्याकुळ व्हायला होतं. लव आजकलचं
 'यह दूरियाँ.. इन राहों की दूरियाँ
निगाहों की दूरियाँ, हम राहों की दूरियाँ
फ़ना हो सभी दूरियाँ..'
असेल किंवा 'मै जहाँ रहू मै कहीं भी हुं, तेरी याद साथ है' शिवाय '' नहीं सामने ये अलग बात है'' किंवा 'बिन तेरे बिन तेरे बिन तेरे कोई खलीश है हवाओ में बिन तेरे' या दिवसातली कितीतरी गाणी अशीच फार फार वेगळीच अनुभूती देणारी. याच काळात रणबीरचे चित्रपट आले आणि त्याचे अनेक गाणे अश्याच कुठल्याश्या निमित्ताने कुठल्याश्या प्रसंगामुळे मनात घर करू लागले. आम्ही तेव्हा मुंबई सोडणार होतो, मुंबईचे कितीतरी मित्र-मैत्रिणी आम्हाला आमच्या निर्णयापासून फिरविण्याचा प्रयत्न करीत होते. निर्णय घेण्यापासून ते सगळी आवरासावर होण्यास दोनेक महिने लागले असतील. इतकी वर्ष मनाचं घर झालेली मुंबई सोडायची .. जावं तर आवडीचं शहर सोडायचं दुःख आणि आपल्या शहरात आपल्या लोकांजवळ जाऊ नये म्हंटलं तर अडचण. खूप घालमेल होत होती जीवाची अश्यात 
'कैसी तेरी खुदगर्ज़ी, ना धुप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्ज़ी, किसी ठोर टीके ना पाव ,,, रे कबिरा मान जा''
गाणं जावं तिकडे चालू असायचं आणि डोळ्याला धारा लागायच्या. सर्वात जास्त त्रास दिला तो रॉकस्टारच्या गाण्यांनी. या काळापर्यंत रणबीर अत्यंत आवडता कलाकार झाला होता. रॉकस्टार मात्र मुंबईतल्या मित्र मंडळींना आवडला नव्हता. रिव्यू ऐकून आम्हीही तो थिएटरला पाहिला नाही. लोकलच्या प्रवासात डोळे बंद करून आजूबाजूचा चाललेला सगळा गोंधळ विसरून मन शांत करत
  'जब कहीं पे कुछ नहीं, भी नहीं था
वही था, वही था, वही था, वही था
वो जो मुझमें समाया
वो जो तुझमें समाया
मौला वही-वही माया
कुन फायाकुन...'
हे खूप सुकून द्यायचे. त्याहून अधिक 'तुम हो पास मेरे, साथ मेरे हो तुम यूँ, जितना महसूस करूँ तुमको उतना ही पा भी लूँ' ऐकून. या फिल्मच्या सगळ्या गाण्यांच्या  प्रेमात पडून सिनेमा पाहिला आणि इतर सर्व मित्रांना वेडगळ वाटणाऱ्या या सिनेमाच्या मी मात्र प्रचंड प्रेमात पडले तो आजतागायत आहे. काही चित्रपटाचा अंतर्भाव हळूहळू कळू लागतो, मग आपण तो कितींदाही पाहू शकतो इथवर प्रवास जातो आणि नंतर तो आत भिनतो त्यातलाच माझ्यासाठी हा एक.. असाच रणबीर दीपिकाच्या तमाशा सिनेमाबद्दल  -  
'पल भर ठहर जाओ
दिल ये संभल जाए
कैसे तुम्हें रोका करूँ... अगर तुम साथ हो
' हे गाणं मात्र व्हिडिओसह पाहावं. संपूर्ण सिनेमाची समरी या गाण्यातून उलगडतेच पण दोघांच्या सिनेमातल्या पात्रांएवढेच फीलिंग या गाण्यातही उतरवले आहे. ती आर्तता आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. 

काही गाण्यांचे किस्से बनतात, काही किस्स्यांची गाणी. काही गाणी पुन्हा त्याच त्याच दुःखात पाडतात तर काही गाणी दुःखातून बाहेर काढण्यास मदत करतात. या गाण्यांमुळे अनेक स्मृती जगवता येतात...जपता साठवता येतात. कधी कधी वाटतं गाणी हा प्रकारचं नसता तर कसे जगलो असतो आपण ? हि कल्पना हे गाण्यांसह जगण्याचे अनुभव घेतल्यानंतर तरी करता येणे शक्यच नाही. माझ्यासाठी तरी गाणी हे इसेन्शिअल गरजांपैकी एक आहे... असणार आहे.  

https://www.youtube.com/watch?v=AAZGOKMs_Fk










No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...