Thursday, 29 March 2018

हे बघ ऐक, 

फक्त निभवायचंय म्हणून येऊ नकोस, निभावाव लागतं म्हणून निभावणारे नाईलाज आणि कुचंबणेला त्रासून परत फिरतात..

तेव्हा तू जा .. 
जिथे कुठे तुझ्या मनाचं समाधान असेल, जिथे प्रेमाची आस असेल तू जा. 
मी नाही घालणार हाक तुला .. 

पण काळाच्या ओघात आलीच आठवण तर .. माझ्या प्रेमाची जाणीव झालीच प्रखर तर 
विश्वासाच्या सोबतीची गरज तीव्र होईल .. अन डोळे ओथंबून वाहू लागतील ...तेव्हा 
तेव्हाच ये परत .. 

साथ निभवायचीय म्हणून येऊ नकोस 
प्रेम जगवायचंय म्हणून ये ,,, 
इतकंच ..

No comments:

Post a Comment

Featured post

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...