Thursday, 29 March 2018

हे बघ ऐक, 

फक्त निभवायचंय म्हणून येऊ नकोस, निभावाव लागतं म्हणून निभावणारे नाईलाज आणि कुचंबणेला त्रासून परत फिरतात..

तेव्हा तू जा .. 
जिथे कुठे तुझ्या मनाचं समाधान असेल, जिथे प्रेमाची आस असेल तू जा. 
मी नाही घालणार हाक तुला .. 

पण काळाच्या ओघात आलीच आठवण तर .. माझ्या प्रेमाची जाणीव झालीच प्रखर तर 
विश्वासाच्या सोबतीची गरज तीव्र होईल .. अन डोळे ओथंबून वाहू लागतील ...तेव्हा 
तेव्हाच ये परत .. 

साथ निभवायचीय म्हणून येऊ नकोस 
प्रेम जगवायचंय म्हणून ये ,,, 
इतकंच ..

No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...