Sunday 6 July 2014

२४/७ ऑनलाईन



पिढी दर पिढी बदलत जाणारे विचार, वृत्ती, बुद्धीमत्ता ....कधी कधी अचंभित करणारे असतात . पूर्वी Generation gap मध्ये खरच Gap असायच. मग त्यातले बदल सुद्धा साहजिक आणि समजण्यासारखे होते ....पण हल्ली जस जशी टेक्नोलॉजी अपडेट होत जाते तस तशी आत्ताच येऊन गेलेली मागची टेक्नोलोजी मागच्या पिढी सारखी गणली जाते ....अगदी आत्ता आत्ता च आमच्या पिढीला कम्प्युटर पिढी म्हणून 'हुश्शार' असे काहीसे संबोधन मिळाले तेव्हा ऐकून अशी कॉलर वर यायची....पण आजच्या कोलेज मुलांना पाहून कम्प्युटर युग सुद्धा खूप मागे पडले असे वाटू लागले.....आजचे युग हे 'सोशल नेट्वर्किंग' चे. २४/७ एकमेकांशी जुळून राहण्याचे. खूप नशीबवान आहेत आजच्या पिढीतली मुलं खरतर . नुसते कम्प्युटर युग नाही तर आजच्या पिढीने तंत्रज्ञानातील अत्युच्च मजल गाठलेले सगळे टेक्निक्स डोळ्यासमोर पाहिलेत, बदल अनुभवलेत आणि प्रत्यक्षात त्या सर्वांचा उपयोग करून घेतला ......कोणतेही बदल हे चांगल्या उद्देशाने घडून आलेले असतात...सर्व प्रथम नजरेसमोर असते ती एकमेव मानव जात आणि तिची सोय. पूर्वी बदल सोयीसाठी व्हायचे. नवीन इंन्वेन्षण सुद्धा सोयीसाठी केले जायचे....आजही तसेच आहे खरतर, पण बदल झालाय तो आपल्या मानसिकतेत..गरज किंवा सोय यापेक्षा जास्त भौतिक सुख, मज्जा, आणि देखावा या गोष्टींनी आपल्या मानसिकतेची कमाल जागा व्यापून धरली आहे....भौतिक सुख मिळवणं किंवा एन्जोय, लग्जरी या गोष्टी चुकीच्या आहेत असे माझे अजिब्बात म्हणणे नाही.....मात्र आयुष्य हे फक्त याचसाठी आहे असे समजणे मात्र चुकीचे.

आजच्या पिढीला मिळालेल्या सर्व सुखसोयी या त्यांच्या गरज पूर्ततेसाठी आहेत....खरतर गरजेपेक्षा जास्तच आहे त्याचा उपयोग सोयीसाठी व्हावा हि किमान अपेक्षा....पण होतं काय कि प्रत्येक गोष्टीकडे सुखवस्तू आणि मज्जा म्हणून बघण्याचा आपला दृष्टीकोन कधीतरी आपल्यालाच भारी पडू शकतो हि दूरदृष्टी मात्र दूर दूर पर्यंत नसणारी हि आजची पिढी. आपल्याला लक्षात न येणाऱ्या काही गोष्टी सहज चालता बोलता लक्षात आणून देण्याच्या छोट्याश्या प्रयत्नात इथे काही उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करते.


आज सगळ्यात जवळच वाटणारं काही असेल ते आहे 'सोशल नेटवर्क साईट्स'. जवळच्या-दूरच्या मित्रांशी जुळून राहायचं उत्तम साधन, व्यक्त व्हायला एक सर्वोत्तम Platform...रोजच्या घडामोडी सांगायला आणि मित्रांच्या घडामोडी जाणून घ्यायचे जवळचे ठिकाण. इथे रडता येतं-हसता येतं ..रुसवा-फुगवा आणता येतो आणि घालवता देखील येतो...माहितीची देवाण घेवाण, तुमच्या अंगी असलेल्या कलात्मक गुणांचे प्रदर्शन देखील येथे करता येते. तुम्ही आहात तसे इथे दिसू शकता किंवा यापेक्षा वेगळे देखील...दिवसातला किती काळ काय काय करता याचं सगळं गणित आपल्या कळत-नकळत इथे उमटत असतं ....आपल्या खऱ्या आवडी-निवडी, आपली भाषा शैली, आणि सगळ्यात ठळक उभारून बाहेर पडते ते आपले विचार आणि आपला स्वभाव......हे सगळं कळत असतं आपल्याला पण इथे कोणाला कशाची काळजी नाही.....सगळं कसं बिंदास...हे सगळं घडत असतांना आपलं भविष्य घडवायची आपली कसरत देखील चालू असते....शिक्षण, त्यासाठी कोलेज क्लासेस , रात्र रात्र जागून केलेला अभ्यास, दूर दूर धावत पळत पूर्ण केलेले क्लासेस, टेस्ट, एक्जाम, सन-उत्सव त्याग करून हि सर्व खटाटोप असते भविष्याच्या तरतुदीची...भविष्याची तरतूद सफल ठरली तर आयुष्य सुखाचं जाणार असतं .....हि जाणीव मनात ठाण धरून असते....ते स्वप्न, ती आकांक्षा फोल ठरू नये म्हणून वाटेल ते करायला तयार असलेले आपण .....कधीतरी असेच एखाद्या intarview ला जातो, महत्वाची आहे हि नौकरी मिळाली तर आयुष्य बदलणार सगळी स्वप्न पूर्ण होणार असे सगळे दिवास्वप्न डोळ्यात साठवून आपण खुर्चीत बसतो आणि …आणि …

उत्तर देण्याची गरजच पडत नाही.… आपली मुलाखत घेण्यास समोर बसलेल्या महोदयांना आपल्या बद्दल इंथभुत माहिती आहे.  तुम्हाला सतत फिरायला आवडतं, मागल्या वर्षीचे दोन विषय निघायला त्रास झालेला, अमका कि तमका विषय साला डोक्यातच शिरत नाही, आठवड्यात कितींदा पिक्चर बघता, सलमानसाठी किंवा कटरिना साठी रात्रंदिवस झुरता, वडिलांशी खटका उडाला, कामाचा अभ्यासाचा प्रचंड कंटाळा येतो. रिलेशनशिप स्टेटस सतत बदलता दिवसातले २४/७ ओन्लाइन असता अगदी अर्ध्या रात्री सुद्धा… हुश्श्…


अस सगळं माहिती असणाऱ्याने तुम्हाला का म्हणून नौकरी वर ठेवावं ?? नाहीच ठेवणार तो  … सगळ्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली ना? कुठून बरे कळले हे सर्व त्यांना …. जादू बिदू येते कि काय? उम्म्म्म्ह ,,,, तुम्ही स्वतःच सांगितलय ते त्यांना अगदी स्पष्ट किंवा जरा जास्तच लाउड.….

सोशल नेटवर्क वर आपण वावरत असतांना आपले सगळे सिक्रेट्स उघड करून ठेवत असतांना आपल्या भावितव्याचे भान असायला हवे. लग्न ठरतांना सुद्धा आपले सोशल नेट्वर्किंग तपासले जाऊ शकते. नौकरी आणि लग्न हा जन्माचाच प्रश्न असतो. आणि तुटपुंज्या, थिल्लर सोशल नेट्वर्किंग सारख्या टाईमपास साईट मुळे यावर परिणाम होऊ नये हि काळजी घेतली गेलीच पाहिजे. …शेवटी आयुष्य म्हणजे वर्च्युवल जग नव्हे आपल्या आयुष्याचे सुख दुःख प्रत्यक्षच समोर वाढलेले दिसणार आहेत आणि ते तसेच प्रत्यक्ष फेसही करावे लागणार आहेत …तेव्हा जरा विसावू या वळणावर आणि विचार करूया थोडं भान राखूनच आयुष्याला पुढे जाऊ या. पटतंय का बघा ……




(प्रस्तुत लेख सकाळ वृत्तपत्राच्या 'युवा' या विशेष पानावर प्रकाशित झाला आहे)


No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...