मौन म्हणजे उणीव, उणीव शब्दांची
जशी उजेडाची उणीव अंधार म्हणजे
अंधारात नसतात पण 'सावल्या' दिसतात उजेडात
उजेडात दिसणारी सावली अंधारासारखीच...काळीकभिन्न
तश्या सावल्या असतील का शब्दांना ?
शब्दांना मौनाच्या सावल्या … शांतसुन्न !!
रश्मी..
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...
No comments:
Post a Comment