आभाळाशी नाते माझे

धरतीशी बंध सारे

मेघ होते बरसते

गार ओले होते वारे


वाऱ्यावर झुलते मी

ऊन घेते लपेटून

माती अंगी लिंपुनीया

घेते गंध समेटून


बोरी बाभळीची लेक

काट्या फुलात फिरते

रानीवनी जीव वसे 

झाडावेलीत डोलते


डोळी तळा साठवते 

धुंद धुक्याशी बोलते 

अंगोपांगी पानोपानी 

दव होते पाझरते 


संध्याकाळी क्षितिजाशी

मत्त होते तेजाळते

पाश सारे सोडवून

मौन होते मावळते.


रश्मी प म ..




Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय