Thursday, 28 January 2021

 आभाळाशी नाते माझे

धरतीशी बंध सारे

मेघ होते बरसते

गार ओले होते वारे


वाऱ्यावर झुलते मी

ऊन घेते लपेटून

माती अंगी लिंपुनीया

घेते गंध समेटून


बोरी बाभळीची लेक

काट्या फुलात फिरते

रानीवनी जीव वसे 

झाडावेलीत डोलते


डोळी तळा साठवते 

धुंद धुक्याशी बोलते 

अंगोपांगी पानोपानी 

दव होते पाझरते 


संध्याकाळी क्षितिजाशी

मत्त होते तेजाळते

पाश सारे सोडवून

मौन होते मावळते.


रश्मी प म ..




No comments:

Post a Comment

Featured post

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...