Thursday, 28 January 2021

 आभाळाशी नाते माझे

धरतीशी बंध सारे

मेघ होते बरसते

गार ओले होते वारे


वाऱ्यावर झुलते मी

ऊन घेते लपेटून

माती अंगी लिंपुनीया

घेते गंध समेटून


बोरी बाभळीची लेक

काट्या फुलात फिरते

रानीवनी जीव वसे 

झाडावेलीत डोलते


डोळी तळा साठवते 

धुंद धुक्याशी बोलते 

अंगोपांगी पानोपानी 

दव होते पाझरते 


संध्याकाळी क्षितिजाशी

मत्त होते तेजाळते

पाश सारे सोडवून

मौन होते मावळते.


रश्मी प म ..




No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...