Friday, 2 April 2021

#अष्टाक्षरी

 वाट पाही रखुमाई

चंद्रभागेच्या तिराशी 

डोई उन्ह पायी माती 

हितगुज किनाऱ्याशी


किती आठवे विठ्ठला

किती अगतिक वेळा

व्याकुळले तन मन

तिला साहवेना पिडा


विठू उभा‌ विटेवरी 

मग्न भक्तांच्या भेटीत

युगे अठ्ठावीस गेली 

अजुनी नाही भानात


कुठे घालावे साकडे 

कुण्या देवाला पुजावे

काय नवस करावा 

कसे सांग बोलवावे 


आळवावे किती देवा 

सारा जन्म जाईल का ?

भेटीसाठी जीव तीचा 

कासावीस राहील का ?

No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...