Friday, 2 April 2021

#अष्टाक्षरी

 वाट पाही रखुमाई

चंद्रभागेच्या तिराशी 

डोई उन्ह पायी माती 

हितगुज किनाऱ्याशी


किती आठवे विठ्ठला

किती अगतिक वेळा

व्याकुळले तन मन

तिला साहवेना पिडा


विठू उभा‌ विटेवरी 

मग्न भक्तांच्या भेटीत

युगे अठ्ठावीस गेली 

अजुनी नाही भानात


कुठे घालावे साकडे 

कुण्या देवाला पुजावे

काय नवस करावा 

कसे सांग बोलवावे 


आळवावे किती देवा 

सारा जन्म जाईल का ?

भेटीसाठी जीव तीचा 

कासावीस राहील का ?

No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...