जीवन एक कोडं आहे, कधीही न सुटणार...सुटल्यासारख वाटता वाटता सोडविणाराच

त्यात कसा गुरफटला जातों कसा फरपटला जातो? ते त्यालाही समजत नाही. आणि मागे

फिरण्याचाही मार्ग नसतो......सापशिडीच्या खेळासारखी शिडी मिळालीच तर ठीक,

नाहीतर अजगराशी गाठ पडली कि खेळ संपला समजायचे.....इथे खेळाडूच्या

पात्रतेचा किंवा अपात्रतेचा भेदभाव नाही, शिडी विद्वानालाही वर नेते आणि

बिनडोक माणसालाही नको त्या ठिकाणी नेऊन बसवते....आणि अजगर विद्वानालाही

गिळतो आणि बिन्डोकालाही गीळ्तोच.........


(मना दुर्जना )



Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय