Monday, 1 June 2015



ऋतू उन्हा पान्हा आला
जळजाळतो तापुन
जीव रापतो आटतो
कारे गेला रे कोपून


कारे गेला रे कोपून
डोळ्या तळे हे साचले
पोटा खळ नाही पाणी
नदी नाले बी आटले


नदी नाले बी आटले
झाडे गेलीत सुकून
वाट पाहतो सरीची
ध्यास जाएना विरून


ध्यास जाएना विरून
रविराजा शांत होना
ढगा पाणी ओत थोडे
धरणी शीतलता देना


धरणी शीतलता देना
रान हिरवे होऊ दे
गार वारे वाहू दे अन्
ऋतू बरवे होऊ दे.



Rashmi / 1 jun 15



Featured post

  एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे प...