ऋतू उन्हा पान्हा आला
जळजाळतो तापुन
जीव रापतो आटतो
कारे गेला रे कोपून


कारे गेला रे कोपून
डोळ्या तळे हे साचले
पोटा खळ नाही पाणी
नदी नाले बी आटले


नदी नाले बी आटले
झाडे गेलीत सुकून
वाट पाहतो सरीची
ध्यास जाएना विरून


ध्यास जाएना विरून
रविराजा शांत होना
ढगा पाणी ओत थोडे
धरणी शीतलता देना


धरणी शीतलता देना
रान हिरवे होऊ दे
गार वारे वाहू दे अन्
ऋतू बरवे होऊ दे.



Rashmi / 1 jun 15



Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय