Monday 4 April 2016

स्वसंवाद 

प्रिय स्व 

लक्षात आलंय बघ माझ्या, सगळं कस ना विरोधाभासी असतं माणसाचं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या गोष्टीतून, एखाद्या विचारापासून स्वतःला दूर करून घेण्याचा, विसरण्याचा त्यातून बाहेर पडण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत असतो ना तेव्हा जरा जास्तच अडकले जातो, आत आणखी आत ओढले जातो. नको नको म्हंटले कि त्याच गोष्टींसाठी आसुसतं मन. जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकेच जवळ खेचले जातो. जवळच्या गोष्टींच अप्रूप नसतं अन अख्त्यारीबाहेरील गोष्टींची ओढ लागून राहते. काहीतरी मिळत नाही तोपर्यंत असोशी असते अन मिळाले कि किंमत राहत नाही. जवळची माणसं जवळची वाटत नाहीत आणि जवळ नसणारी खुणावत असतात. वर्तमानात जगता येत नाही आणि भविष्याच्या स्वप्नातले मनोरे बांधत बसतं ..असं कसं ना ?? 
 हे मन नावाचं चाप्टर लैच चाप्टर असतं बघ.     

तुझीच स्व ..

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...