‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक लष्करी कारवाईचं नाव नाही, तर ते भारताच्या महिला सैनिकांच्या शौर्याचं, जिद्दीचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. या नावात एक गहन अर्थ दडलेला आहे... ‘सिंदूर’ या शब्दात नुसताच सौंदर्याचा नव्हे, तर त्याग, निष्ठा आणि सन्मानाचा अर्थही अंतर्भूत आहे. आणि या संकल्पनेला साजेसं नेतृत्व केलं दोन महिलांनी... विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी.
पहलगाममध्ये ज्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या सहचाऱ्यांना निर्दयपणे मारलं गेलं, ज्यांना ‘महिला आहेत’ म्हणून दुर्लक्षित म्हणून जिवंत ठेवलं गेलं, त्याच महिलांनी हा प्रतिशोध उचलला. "स्त्रियांना केवळ पुढाऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम आहे, त्यांच्यात दुसरी क्षमताच नाही" या अत्यंत हीन समजुतीला त्यांनी खणखणीत उत्तर दिलं. हा फक्त बदला नव्हता, तर एक इशारा आहे की भारताच्या महिला आता मागे राहिलेल्या नाहीत. महिलेच्या वेदनेचा महिलांनीच घेतलेला बदला, महिलांनीच दिलेला संदेश, आणि महिलांनीच मांडलेली कारवाईची रूपरेषा हे सगळं फक्त प्रेरणादायी नाही, तर ऐतिहासिक आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक आणि प्रभावी हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केले. या यशस्वी कारवाईत भारतीय लष्कराच्या शौर्याचं जितकं योगदान होतं, तितकंच महत्त्वाचं होतं महिलांच्या नेतृत्वाचं. या प्रेस ब्रीफिंगमध्ये महिलांनी जे आत्मविश्वासाने सांगितलं, त्याने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय लष्कराची प्रतिष्ठा उंचावली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे सन्मान, शक्ती आणि समतेचा संगम. हे केवळ एक मिशन नव्हतं हे भारताच्या महिला सैनिकांचं धगधगतं उत्तर आहे.
कोण आहेत या दोघी ?
विंग कमांडर व्योमिका सिंग
विंग कमांडर व्योमिका सिंग भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांच्या तपशीलांची माहिती दिली. या ऑपरेशनमध्ये त्यांनी भारतीय हवाई दलाच्या Rafale आणि Su-30MKI लढाऊ विमानांचा वापर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील नौ ठिकाणी सुस्पष्ट आणि प्रभावी हल्ले केले, ज्यात अंदाजे ७० दहशतवादी ठार झाले आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी
कर्नल सोफिया कुरेशी भारतीय लष्कराच्या सिग्नल कोर्प्समध्ये अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेची स्पष्टता दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनमध्येही सहभाग घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय लष्करी अनुभवाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Friday, 9 May 2025
Operation Sindoor!
तुम्हाला माहिती आहे का ? २०१७ पर्यंत भारतात महिलांना थेट युद्धावर जाण्याचा अधिकार नव्हता. युद्धसंबंधी निर्णय घेण्याची संधीही त्यांना दिली जात नव्हती. या विषमतेविरुद्ध त्यांचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू होता. तेव्हा महिलांना लष्करात केवळ सहाय्यक भूमिका, जसे की सैनिकांच्या शस्त्रास्त्रांची तयारी, वैद्यकीय सेवा या क्षेत्रांपुरतीच मर्यादित संधी दिली जात असे. लष्करासारख्या पारंपरिकपणे पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिलांना दीर्घकाळ पूर्णतः वगळण्यात आले होते. मात्र, आता त्या युद्धाच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत, हे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक पाऊल आहे. २०१७ मध्ये भावना कांत ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला ऑपरेशनल फायटर पायलट ठरली. ती युद्धाच्या मोहिमांवर लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक बनली. त्याच वर्षी सब लेफ्टनंट शिवांगी हिने भारतीय नौदलात सर्विलन्स विमान उडवणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला.
२०२० पर्यंत महिलांना लष्करात कायमस्वरूपी नियुक्ती (Permanent Commission) देण्यात येत नव्हती. मात्र २०२० मध्ये भारतीय लष्कर आणि त्यानंतर नौदलामध्येही महिला अधिकाऱ्यांना हे अधिकार मंजूर करण्यात आले. हा निर्णय महिलांच्या दीर्घकालीन संघर्षाचा विजय ठरला. गेल्या दशकभरात महिलांनी लष्करी क्षेत्रात केवळ आपली उपस्थिती सिद्ध केली नाही, तर कर्तृत्व, नेतृत्व आणि सामर्थ्यही प्रभावीपणे सादर केले आहे. आज हा बदल सुरू झाला आहे, आणि 'समान संधी' ही आता केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागली आहे. ही बदलाची सुरुवात आहे आणि ही आशा आता वास्तव होताना दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...
-
फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरु होतो आणि घरोघरी परीक्षेचे वेध लागतात. भरदिवसा वातावरणात एक गूढ गंभीरता भासू लागते, उष्णता जाणवू लागत...
No comments:
Post a Comment